घराणेशाहीचे राजकारण!
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील संस्थाने खालसा झाली आणि देशात लोकशाही व्यवस्था लागू झाली. म्हणजे राजेशाही गेली आणि लोकशाही व्यवस्था आली. खालसा झालेल्या संस्थानातील काही राजे-महाराजे पुढे भारतीय राजकारणात उतरून लोकशाही व्यवस्थेचे अंग बनले. या राजघराण्यांमधील वारसदारांवर देशाच्या सर्वच भागांतील नागरिकांनी मोठा विश्वास ठेवला. काही मोजक्या राजघराण्यांनी जनता आणि राजा यांच्यातील अंतर कधी वाढू दिले नाही. आपला राजा आपल्यासाठीच झटणार, हा सामान्यांच्या मनातील विश्वास काहींनी वर्षानुवर्ष टिकवून ठेवला व त्यातूनच त्यांच्या कार्याची ओळख अधोरेखित होत गेली; परंतु देशभरातील बहुतांश राजे-महाराजे आणि त्यांचे राजकीय वारसदार यांचा शाही थाट पाहिला, त्या राजाच्या कार्यक्षेत्रातील प्रजेचे दुर्दैवाचे दशावतार पाहिले की, राजा आणि प्रजा यांच्यातील अंतर प्रकर्षाने नजरेस भरते.
राजघराण्यांचे ...