Friday, April 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राजकीय

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणूकीत निळ्या झेंड्याचा वापर, कुणाला विचारून निवडणूकीत वापरले जात आहेत…निळे झेंडे

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणूकीत निळ्या झेंड्याचा वापर, कुणाला विचारून निवडणूकीत वापरले जात आहेत…निळे झेंडे

राजकीय
काँग्रेसची अवस्था आजही जुन्या जमिनदारासारखी आहे पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/स्वातंत्र्याच्या 75 वर्षात काँग्रेसनेच अधिक काळ देशात व महाराष्ट्रात सत्ता उपभोगली आहे. देशातील व राज्यातील बहुजन समाजाला सत्तेत येऊ दिले नाही. यांनीच राज्य केलं. त्यामुळेच राज्यात 3/4 वेळेस काँग्रेसला जनतेने सत्तेतून बाहेर फेकले आहे. सत्तेतून बाहेर फेकले गेलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आता देखील बहुजन समाजाला सत्तेपर्यंत पोहोचू देत नाहीत. आंबेडकरी समुह व बहुजन समाजाची या पक्षांना मते हवीत परंतु या समाजांना सत्तेत वाटा दयायचा नाहीये. पुण्यातील कसबा व पिंपरी चिंचवड येथे पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गळयात आणि गाडीवर निळे झेंडे लावुन फिरत आहेत. दोन्ही काँग्रेसवाले कुणाला विचारून निळे झेंडे वापरत आहेत असा सवाल आंबेडकरी जनता विचारत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ...
कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचित आघाडीची भूमिका काय? बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं,

कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचित आघाडीची भूमिका काय? बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं,

राजकीय
नाशिक/दि/पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहेत. तर लवकरच महाविकास आघाडीकडूनही उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची नेमकी काय भूमिका आहे, याबाबत बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, आमची शिवसेनेची युती आहे. आम्ही शिवसेनेला विनंती केली होती की, त्यांनी या दोन्ही जागा लढवाव्या. कारण कसब्याच्या जागेवर काँग्रेसचा पराभव झाला आहे आणि राष्ट्रवादीने इथे उमेदवारच जाहीर केला नव्हता, अशी परिस्थिती आहे. ...
नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण ? ॲड.बाळासाहेब आंबेडकर

नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण ? ॲड.बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/नोटबंदीचा निर्णय वैध असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत असून आता बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण? असाही सवाल उपस्थित केला आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिनांक 10 मार्च 2017 रोजी त्यांच्या प्रकाशनामध्ये नोटाबंदीचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर विपरीतपणे झाला आहे असे म्हटले आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाने 2016 च्या नोटबंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना अचानकपणे घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. कोणत्याही सिरीजच्या नोटा रद्द करणे किंवा त्या पुन्हा चलनात आणणे किंवा नोटबंदी करणे यामध्ये केंद्र सरकारने काय भूमिका घ्यावी याविषयीच्या संवैधानिक मुद्यावर अ...
दलितांवरील अत्याचाराबाबत पुणे शहर पोलीसांचे कर्मठ जातीयवादयांसोबत संगनमत, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात दलित- पिडीतांना न्यायासाठी आंदोलन करावे लागत असल्याची दुर्देवी बाब…

दलितांवरील अत्याचाराबाबत पुणे शहर पोलीसांचे कर्मठ जातीयवादयांसोबत संगनमत, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात दलित- पिडीतांना न्यायासाठी आंदोलन करावे लागत असल्याची दुर्देवी बाब…

राजकीय
पुणे/दि/ नॅशनल फोरम/स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देखील अनु. जाती, जमाती, अर्थात दलित व आदिवासी पिडीतांना पोलीस न्याय देत नाहीत. उलटपक्षी कर्मठ जातीयवादयांबरोबर संगनमत करून, अत्याचाराला उत्तेजना देण्याचे काम केले जात आहे. पुणे शहर पोलीस दलातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दोन जातीय अत्याचाराच्या घटना घडलेल्या असतांना देखील पोलीस त्यांचे कायदेशिर कर्तव्य पार पाडत नाहीत. शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे कर्मठ जातीयवादी श्री. रमेश खामकर याचे विरूद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होवून, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळुन देखील श्री. खामकर यांना सपोआ विश्रामबाग अटक करीत नाहीत. तर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे श्री. राकेश विटकर यांच्या विरूद्ध ॲट्रॉसिटीची फिर्याद दाखल होवूनही गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. थोडक्यात पोलीस त्यांचे कायदेशिर कर्तव्य बजावित नसल्याने, आजही आम्हाल...
पुणे महापालिकेवर नॉन-स्टॉप 28 व्या दिवशीही कडाक्याच्या थंडीत बेमूदत धरणे आंदोलन सुरू

पुणे महापालिकेवर नॉन-स्टॉप 28 व्या दिवशीही कडाक्याच्या थंडीत बेमूदत धरणे आंदोलन सुरू

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेश व्दारावर संविधान परिषदेच्या वतीने आजच्या आंदोलनाचा 28 वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीत आणि अवकाळी पावसातही धरणे आंदोलन सुरू आहे. पुणे महापालिकेतील विधी विभाग, कामगार कल्याण विभाग, सामान्य प्रशासन आणि बांधकाम विभागात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांची चौकशी मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य सरन्यायाधिशांमार्फत होत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार संविधान परिषदेच्या वतीने करण्यात आलेला आहे. दि. 1 नोव्हेंबर 2022 रोजी पासून पुणे महापालिकेच्या प्रवेश व्दारावर हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान पुणे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने देखील ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या होत्या, त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे. बहुतांश कर्मचारी त्यांच्या बदलीच्या जागी रूजु होत असल्याचे खात्रीला...
पुणे महापालिकेच्या बाहेर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा इफेक्ट

पुणे महापालिकेच्या बाहेर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा इफेक्ट

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumपुणे महापालिकेच्या बाहेर संविधान परिषदेच्या वतीने बेमूदत तीव्र धरणे आंदोलन मागील 20 दिवसांपासून सुरू आहे. या धरणे आंदोलनामुळे नेमकं काय साध्य झालं आहे किंवा होणार आहे… महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. सर्व अधिकारी गेंड्याच्या कातड्याचे आहेत, त्यामुळे त्यांच्यात काहीच सुधारणा होणार नाही असे अनेक कार्यकर्ते आपले मत व्यक्त करीत आहेत. तथापी पुणे महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माहिती आमच्या समोर आणली आहे.या सर्व आंदोलनामुळे 1. कामगार कल्याण विभाग व मुख्य कामगार कल्याण अधिकारी श्री. दौंडकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण बालगंधर्व येथे घेतले असून, कंत्राटी कामगारांना किमान वेतन, ईपीएफ, ईएसआय यांचा लाभ कसा दयावा तसेच 2015 साली ज्यासाठी समिती नियुक्त केली, त्याच्या शिफारशीनुसार ह्या मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. काल श...
उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर पहिल्यांदाच एकाच मंचावर; राज्यात पुन्हा नवी समीकरणे?

उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर पहिल्यांदाच एकाच मंचावर; राज्यात पुन्हा नवी समीकरणे?

राजकीय
नांदेड/दि/ वृत्त/उद्धव ठाकरे गट आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती होण्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आंबेडकरांनी तर शिवसेनेकडे युतीचा प्रस्तावही दिला आहे. मात्र, शिवसेनेने या प्रस्तावावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे वंचित आणि ठाकरे गटाची युती होणार का? अशी चर्चा सुरू असतानाच आता बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकचा मंचावर येणार असल्याचं वृत्त आहे. हे दोन्ही नेते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार असून त्यामुळे राज्यात पुन्हा नवी समीकरणं जुळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. येत्या20 नोव्हेंबरला शिवाजी मंदिरमध्ये प्रबोधन डॉट कॉम या संकेतस्थळाचं लोकार्पण होणार आहे. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते काय बोलतात ...
अंधेरी विधानसभा पोटनिवडूकीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचितचा पाठींबा कुणाला?

अंधेरी विधानसभा पोटनिवडूकीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचितचा पाठींबा कुणाला?

राजकीय
बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचितचा पाठींबा कुणाला? मुंबई/दि/नॅशनल फोरम/शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे शिवसेनाच्या दोन्ही गटांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. दरम्यान शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारी ऋतूजा लटके यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठींबा दिला आहे. तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना पाठींबा जाहीर केला आहे. त्यापार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडी कुणाला पाठींबा देणार? असा सवाल बाळासाहेब आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ॲड. आंबेडकर म्हणाले, ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्वाची आहे. मात्र आम्ही सध्यातरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. कारण एकनाथ शिंदे यांच्या गटाने उ...
प्रभारी उप कामगार अधिकारी, कामगार अधिकारी व मुख्य कामगार अधिकारी यांच्या विरोधातील भ्रष्टाचार व अनियमिततेच्या तक्रारींची चौकशी पूर्ण होऊन दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपकामगार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया थांबवावी: आम आदमी पक्षाची मागणी

प्रभारी उप कामगार अधिकारी, कामगार अधिकारी व मुख्य कामगार अधिकारी यांच्या विरोधातील भ्रष्टाचार व अनियमिततेच्या तक्रारींची चौकशी पूर्ण होऊन दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपकामगार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया थांबवावी: आम आदमी पक्षाची मागणी

राजकीय
भाजपच्या सत्तेच्या काळात पुणे मनपाचा कामगार कल्याण विभाग बनला ठेकेदार कल्याण विभाग! कामगार अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करा. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर ED ची कारवाई करावी. पुणे/ गेल्या पाच वर्षात भाजपच्या कार्यकाळात पुणे महानगरपालिकेचा कामगार कल्याण विभाग हा "ठेकेदार कल्याण" विभाग बनला असून या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. कंत्राटदारांना दिल्या जाणाऱ्या कामांमध्ये कामगारांची संख्या फुगवून वाढवणे, त्याची खोटी बिले काढणे, कंत्राटी कामगारांचे शोषण करणे, कंत्राटी कामगारांचे पीएफ, इएसआय वेळेवर न भरता देखील कंत्राटदारांना खोटे अभिप्राय देऊन कंत्राटदारांची बिले काढण्यास संमती देणे, किमान वेतन न देणे, कामगारांचे वेतन महिनो न महिने रखडवणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई न करणे या अशा किती तरी पद्धतीने पुणे मनपा कामगार विभाग हजारो कामगारांची आणि लाखो पुणेकरांची फसव...
महाराष्ट्रातील सरकार राहते की जातये हा प्रश्न न्यायालयाच्या निकालनंतर, निकाली निघेल – ॲड. बाळासाहेब आंबेडकर

महाराष्ट्रातील सरकार राहते की जातये हा प्रश्न न्यायालयाच्या निकालनंतर, निकाली निघेल – ॲड. बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
Adv. Balasaheb Ambedkar पुणे/दि/ प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडीची परवा पुण्यात कार्यकर्त्यांशी थेट संवाद कार्यक्रम डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का चौक येथे आयोजित करण्यात आली होती. त्याच वेळी राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले, तर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असं व्यक्तव्य कोश्यारी यांनी केलं. या व्यक्तव्यानंतर महाराष्ट्रातून राज्यपालांवर टीकेची झोड उठू लागली आहे. राज्यपालांच्या या विधानावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनीही त्यांचं मत व्यक्त केलं. तसेच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. काय म्हणाले बाळासाहेब आंबेडकर - शिंदे - फडणविसांचे सर्व निर्णय बेकायदा -घटनेच्या तरतुदीप्रमाणे बारा जण जोपर्यंत कॅबिनेट मंत्री होत नाहीत तोपर्यंत ती कॅबिनेट ठरल्या जात नाही ः-एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत याबद्...