भारती विद्यापीठ वाहतुक विभाग, काहीही करा- हम सुधरेंगे नही म्हणे नहीच…
Bharti-Vidyapeeth-Police
पुणे/ दि/ प्रतिनिधी/
भारती विद्यापीठ वाहतुक विभागाच्या कृत्य व अकृत्यांमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळ आणि एस.टी. महामंडळाचे अतोनात नुकसान होत आहे. या गैरवाजवी आर्थिक नुकसानीस एस.टी. महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तसेच भारती विद्यापीठ वाहतुक पोलीस जबाबदार असून, दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांनी केली आहे.
दरम्यान भारती विद्यापीठ वाहतुक पोलीसांच्या दुष्कृत्यांचा पंचनामा प्रसिद्ध होवून दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेलेला आहे. तरीही त्यात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. आजही नवीन पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर पांढर्या पिवळ्या रंगाची चार चाकी आठ ते दहा आसनी कार संव...