प्रस्थापित प्रसार माध्यमांकडून वंचित बहुजन समाजातील उमेदवारांच्या बातम्या देणं बंद ५०० लोकांच्या सभेचं उदोउदो… ५ लाखांच्या सभेची चार ओळीची बातमीही नाही… वाऽऽ रे माध्यमं
wanchit aghadi pune
पुणे/दि/ प्रतिनिधी/ भारतातील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडीया हा जातीयवादी स्वरूपाचा होता आणि आहे यात तिळमात्र शंका घेण्याचे कारण राहिले नाही. संपूर्ण देशात लोकसभेच्या निवडणूका सुरू आहेत. महाराष्ट्रात कॉंग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी सेना या प्रस्थापित व घराणेशाहीच्या पक्षा व्यतिरिक्त या देशात इतरही तुल्यबळ पक्ष संघटना आहेत. परंतु जशी निवडणूक जाहीर झाली आहे, त्या दिवसांपासून प्रस्थापित पक्षांव्यतिरिक्त कोणत्याही पक्षांच्या प्रचार सभांची बातमी इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडीयातून दिसून येत नसल्याची बाब दिसून येत आहे. प्रस्थापित पक्षांच्या निवडणूक सभेला काही ठिकाणी अवघे पाचशे ते पाच हजारापर्यंत लोक हजर असतांना त्याची मोठ मोठ्याला कॉलमची बातमी केली जात आहे, परंतु वंचित बहुजन आघाडीच्या सभेला दोन लाख, पाच लाखांच्या सभा होत असतांना, त्यांची एक कॉलमचीही बातमी कुठे आढळुन येत नाही क...