Saturday, April 27 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सामाजिक

तळेगाव दाभाडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा उद्या वर्धापन दिन, बाबासाहेबांनी 1947 साली 41 एकर जमीन विद्यापीठ स्थापन करण्यासाठी खरेदी केली होती

तळेगाव दाभाडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा उद्या वर्धापन दिन, बाबासाहेबांनी 1947 साली 41 एकर जमीन विद्यापीठ स्थापन करण्यासाठी खरेदी केली होती

सामाजिक
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1947 साली वडगाव मावळ व कातवी या ठिकाणी एक मोठे शैक्षणिक संकुल, विद्यापीठ स्थापन करण्यासाठी 41 एकर जागा बंगल्यासह खरेदी केली होती. परंतु भारतीय राज्यघटनेची महत्वाची जबाबदारी बाबासाहेबांवर येवून ठेपल्याने त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. परंतु 26 एप्रिल 2012 रोजी तळेगाव दाभाडे येथील रंजनाताई भोसले, माजी नगराध्यक्षा व ज्येष्ठ विधिज्ञ, मुंबई उच्च न्यायालय यांनी अथक प्रयत्न करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तळेगाव दाभाडे येथील बंगला शोधुन काढला आणि तो सर्वांसाठी खुला केला. आज त्या घटनेला 12 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्याचा 13 वा वर्धापन दिन उद्या तळेगाव दाभाडे, ता. मावळ जि. पुणे येथे संपन्न होत असल्याची माहिती ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. सुरेंद्र जानराव यांनी नॅशनल फोरमला दिली आहे. याबाबत विश्वरत्न डॉ. बाब...
महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही- आंबेडकर

महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही- आंबेडकर

सामाजिक
नॅशनल फोरम/अकोला/दि/ वृत्त/डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत समूहांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याबाबत व्यापक भूमिका मांडली. भेदाभेद संपवून सर्वांना समतेची वागणूक मिळावी असे अपेक्षित होते. पण आजही प्रस्थापितांच्या डोक्यातील बहिष्काराची भावना संपलेली नाही, असेच दिसते. महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही आणि यावर प्रसार माध्यमे देखील गप्प का आहेत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीने अद्याप एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. महाविकास आघाडीला भाजपप्रमाणे मुस्लिमांना वगळायचे असेल, तर दोघांमध्ये काय फरक आहे? प्रस्थापित राजकीय पक्ष मुस्लिमांना निवडणुकीच्या राजकारणात प्रतिनिधित्व देत नाहीत, त्यांच्यावर बहिष्कार घालतात याबाबत प्रसार माध्यमे गप्प का? असा सवाल आंबेडकर ...
नाना पटोलेंनी खोटं बोलण्याचा पराक्रम केला; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची टीका !

नाना पटोलेंनी खोटं बोलण्याचा पराक्रम केला; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची टीका !

सामाजिक
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आमची बाळासाहेब आंबेडकरांसोबत चर्चा सुरू आहे, जागावाटप अजून ठरलेलं नाही, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय हा दिल्लीत होईल अशी माहिती नाना पटोले यांनी एका वाहिनीला दिले. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विट करत हे खोटे असल्याचे सांगितले. कदाचित बातम्यांमध्ये झळकत राहण्यासाठी नाना पटोले खोटं बोलत आहेत, हे काय पहिल्यांदा घडत नाही तर खोटारडे पणाचा हा पराक्रम झाल्याचे आंबेडकरांनी यात म्हटले आहे. इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या संदर्भात अजून कोणताही कार्यक्रम सुरू झाला नाही, इंडिया आघाडीत किंवा महाविकास आघाडीत आमंत्रित करण्याबाबत काँग्रेस हायकमांडकडून अजून कोणताही संवाद झाला नाही. तर, मग निमंत्रण न देताच जागावाटपाची कोणतीही चर्चा कशी होणार ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सह...
भिडे वाड्यासाठी पैसे लावणारा मोठा बिल्डर असतात तर ती कोर्ट केसही पुणे मनपा हरले असते-aniruddha chavan

भिडे वाड्यासाठी पैसे लावणारा मोठा बिल्डर असतात तर ती कोर्ट केसही पुणे मनपा हरले असते-aniruddha chavan

सामाजिक
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा पुण्यातील भिडे वाडा येथे सुरू केली. वर्षानुवर्ष हा भिडेवाडा नेमका कुठे आहे याची पुणेकरांनाच माहिती नव्हती. परंतु रिपब्लिकन पक्ष, भारीप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीसह फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांनी भिडे वाडा वाचविण्याची मोहीम सुरू केल्यानंतर, देशातील पहिली मुलींची शाळा ही पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती समोरच असल्याचे समजले आहे. मोडकळीस आलेली इमारत म्हणजेच ही मुलींची पहिली शाळा अर्थात भिडे वाडा असल्याची माहिती पुणे शहरातील नागरिकांना समजली. त्याच्यानंतर देशातील मुलींची पहिली शाळा वाचविण्यासाठी विविध संस्था आणि संघटना पुढे आल्या. दरम्यान मागील दहा ते पंधरा वर्षांपासून भिडे वाड्याचा प्रश्न न्यायालयामध्ये प्रलंबित होता. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यक...
तामिळनाडू मंत्रीमंडळातील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासंदर्भात ब्राम्हण धर्मावर विधान, म्हणाले…

तामिळनाडू मंत्रीमंडळातील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासंदर्भात ब्राम्हण धर्मावर विधान, म्हणाले…

सामाजिक
राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आमंत्रित न करण्यासंदर्भात उदयनिधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. स्टॅलिन यांनी, द्रौपदी मूर्मू या विधवा आहेत आणि त्या आदिवासी समाजातून येतात म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं असं म्हटलं आहे. यालाच आपण ब्राम्हण धर्म असं म्हणायचं का? कारण भारतातील ब्राम्हणवादी धर्म हा जातीयवाद व धार्मिकवाद करत आहे हे सिध्द झाले आहे. व असा भारतात जातीयवाद व धार्मिवाद वाद वाढवणारा व राज्यात व भारत देशात भेदाभेद करणारा , वंशवाद करणारा , जातीधर्मावर भांडणे लावणारा , वर्णवाद करणारा असा भारतातील ब्राम्हणांचा धर्म आहे का? असा सवालही तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते स्टॅलिन यांनी भारतातील ब्राम्हणवादी भाजपा सरकारला आणि याच भारतातील विदेशी असलेल्या ब्राम्हणांना प्रश्न विचारला आहे. भारतात 800 कोटी रुपये खर्च करुन नवी...
आदिवासी विकासासाठी व्यावसायिक आणि उच्च पदावरील नोकरदारांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दयावे- नामदेव गंभिरे

आदिवासी विकासासाठी व्यावसायिक आणि उच्च पदावरील नोकरदारांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दयावे- नामदेव गंभिरे

सामाजिक
आदिवासी कृती समिती व आदिवासी स्वप्नदूत संस्थांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, राजूर (प्रतिनिधी )एम .एन .देशमुख कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजूर येथे आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र ,पुणे आणि आदिवासी स्वप्नदूत फाउंडेशन महाराष्ट्र ,मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने “ गुणवंत विद्यार्थी सत्कार 2023“ नुकताच संपन्न झाला .आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पूजन करून, दीप प्रज्वलन करून आणि वृक्षास जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात अली. कार्यक्रमाच्या सुरूवातीस आदरांजली-स्व .अशोकराव भांगरे जिल्हा परिषद अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत हरी नरके, इर्शाळवाडी येथे डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या आदिवासी बांधवांस त्याच प्रमाणे मणिपूर येथे अमानुष नरसंहार, आदिवासी स्त्रीयांवर झालेला अत्याचार आणि क्रूर हत्या, कुकी व नागा या आदिवा...
राज्यात ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये 11 टक्के वाढ; नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी

राज्यात ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये 11 टक्के वाढ; नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी

सामाजिक
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/देशात महाराष्ट्राची पुरोगामी अशी ओळख असली तरी याच पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक विषमता अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या नागरीकांवर जातीय द्व्‌ेषातून अत्याचार करणे, सामाजिक बहिष्कार, बलात्कार आणि हत्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्रात 11 टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे. याबाबत सन 2022 चा अहवाल 28 फेब्रुवारी 2023 रोजी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केला आहे. ॲट्रॉसिटी ॲक्ट हा विशेष कायदा 1989 मध्ये आला. कायद्याचे नियम 1995 मध्ये तयार झाले. सुधारित नियम 2016 ला लागू करण्यात आले. नव्या नियमावली अंतर्गत नियम 16 नुसार मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार या समितीच्या बैठका दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये घेणे बंधनकारक आहे. तरीही अद्याप राज्यस्तरीय दक्षता ...
दिल्लतील महाराष्ट्र सदनातून सावरकर जयंतीसाठी सावित्रीमाई फुले, अहित्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविले, छगन भुजबळांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा – बाळासाहेब आंबेडकर

दिल्लतील महाराष्ट्र सदनातून सावरकर जयंतीसाठी सावित्रीमाई फुले, अहित्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविले, छगन भुजबळांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा – बाळासाहेब आंबेडकर

सामाजिक
दिल्लतील महाराष्ट्र सदनातून सावरकर जयंतीसाठी सावित्रीमाई फुले, अहित्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविले, छगन भुजबळांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा - बाळासाहेब आंबेडकर मुंबई/दि/ प्रतिनिधी/छगन भुजबळ स्वतःला ओबीसीचे नेते म्हणवितात, दिल्लीतील महाराष्ट्र सदन त्यांच्याच कार्यकाळात बांधण्यात आले आहे. आज त्याच महाराष्ट्र सदनातून क्रांतिज्योति सावित्रीमाई फुले व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हटविले गेले याचा निषेध म्हणून छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 29 मे रोजी पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष...
श्री सम्मेद शिखर जी, पालीताना आणि गिरनार जी यांना तीर्थ स्थान घोषित करावे : जैन समाजाची मागणी

श्री सम्मेद शिखर जी, पालीताना आणि गिरनार जी यांना तीर्थ स्थान घोषित करावे : जैन समाजाची मागणी

सामाजिक
पुणे/दि/ नॅशनल फोरम/झारखंडमधील पारसनाथ येथे असलेल्या जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरबाबत केंद्र सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. याच निर्णयाप्रमाणे श्री सम्मेद शिखर जी तीर्थ स्थान घोषित करावे अशी मागणी करीत आणखी एक जैन समाजाचे पवित्र स्थान असलेल्या गुजरातमधील पालीताना तीर्थ आणि गिरनार तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात आले आहे, त्यामुळे हेही तीर्थ स्थान म्हणून घोषित करावे अशी मागणी आज आयोजित पत्रकार परिषदेत जैन समाजासाठी कार्यरत राष्ट्रीय पार्श्व भैरव भक्त परिवार संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोदराज सांकला यांनी केली. पत्रकार परिषदेस अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलनचे नितीन अग्रवाल, अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अन्ड एज्युकेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल उपस्थित होते . यांनीही या मागणीस समर्थन दिले. पुढे विनोदराज सांकला म्हणाले, आमची राष्ट्रीय ...
नॅशनल फोरमच्या सोमवार दि.9 जानेवारी 2023 च्या अंकात…

नॅशनल फोरमच्या सोमवार दि.9 जानेवारी 2023 च्या अंकात…

सामाजिक
लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत भरदिवसा कोयता गँगचा धुडगूसभारतीच्या पोलीसांनी जे शौर्य दाखवलं, ते धाडस लष्करच्या पोलीसांना का दाखविता आले नाही…भारतीच्या पोलीसांनी सिंहगड हद्दीत घुसून कोयतेखोरांना भररस्त्यात रंगवल,कॅम्पमध्ये कोयतेखोरांचे कौर्य सुरू असतांना, लष्करी पोलीस हाताला मेहंदी लावुन बसले होते..? पप्पुभाईच्या नादाला लागाल तर एकेकाला खल्लास करून टाकेन…पप्पुभाई, पिंटूभाई, बब्लुभाईचे लाड आता पुरे झाले,मुंढवा - वानवडी, सिंहगड-भारती, आता लष्कर, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगचा धुडगुस, सम्मेद शिखरजी वाद, जैन धर्मियांना कोण डिवचत आहे. पुणे महापालिकेवरील धरणे आंदोलनांचा आढावा.5.लष्कर नंतर आता शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगची दहशत तरीही पोलीस शांत कसे..यासह… पुणे पोलीसांना काही प्रश्न- सोमवारच्या अंकात. अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे एवढे आकर्षण कसे वाढले… ...