Saturday, April 27 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

नाना पटोलेंनी खोटं बोलण्याचा पराक्रम केला; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची टीका !

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
आमची बाळासाहेब आंबेडकरांसोबत चर्चा सुरू आहे, जागावाटप अजून ठरलेलं नाही, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय हा दिल्लीत होईल अशी माहिती नाना पटोले यांनी एका वाहिनीला दिले. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विट करत हे खोटे असल्याचे सांगितले. कदाचित बातम्यांमध्ये झळकत राहण्यासाठी नाना पटोले खोटं बोलत आहेत, हे काय पहिल्यांदा घडत नाही तर खोटारडे पणाचा हा पराक्रम झाल्याचे आंबेडकरांनी यात म्हटले आहे.

इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या संदर्भात अजून कोणताही कार्यक्रम सुरू झाला नाही, इंडिया आघाडीत किंवा महाविकास आघाडीत आमंत्रित करण्याबाबत काँग्रेस हायकमांडकडून अजून कोणताही संवाद झाला नाही. तर, मग निमंत्रण न देताच जागावाटपाची कोणतीही चर्चा कशी होणार ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी करून घेण्यासाठी नक्की काय अडचणी आहेत ? वंचित बहुजन आघाडीची इंडिया आघाडीत सहभागी होण्याची ईच्छा असताना देखील त्यांचा सामावेश का होत नाही ? काँग्रेसचं नक्की चाललंय काय? असा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे.