Tuesday, March 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतपत्रिकेवर घ्या!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतपत्रिकेवर घ्या!

राजकीय
ajit pawar1 मुंबई/दि/  देशभरात ईव्हीएम घोटाळ्याचे वादळ उठले असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही ईव्हीएमविरोधात सूर लावला आहे. लोकशाही टिकून राहावी आणि लोकांच्या विश्‍वासाला तडा जाऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी, अशी मागणी केली आहे.        केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जनतेत नाराजी असतानाही सतराव्या लोकसभेत एकट्या भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्याने हा ईव्हीएमचा विजय असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यात आता पवार यांनी आज ट्विट करून ईव्हीएमला विरोध केला. ईव्हीएममध्ये तांत्रिक फेरफार केली जाते, अशी नागरिकांच्या मनात शंका आहे. जगातील प्रगत देशांमध्ये निवडणूक मतपत्रिकेवर घेतल्या जातात. त्यामुळे विधानसभेची निवडणूक मतपत्रिकेवरच घेण्यात यावी, अशा मागणीचे ट्विट पवार यांनी केले आहे....
पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडूनच पुणे शहराला धोका,  सिमाभिंती कोसळल्या, आता इमारती कोसळण्याची वाट पहायची काय…

पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडूनच पुणे शहराला धोका, सिमाभिंती कोसळल्या, आता इमारती कोसळण्याची वाट पहायची काय…

सर्व साधारण
pmc pune1 नैसर्गिक आपत्ती, भूकंपाने जेवढे नुकसान होणार नाही तेवढी आपत्ती, पुणे महापालिका आयुक्तांच्या ढिसाळ कारभारामुळे होण्याची शक्यता... आधी दुष्कृत्य नंतर आपत्ती व्यवस्थापन श्रीधर  येवलेकर पुणेकरांवर सुड का उगवत आहेत... पुण्यातील पेठा, उपनगरातही मनमानी कारभार, जे अधिकार मनपा आयुक्तांना नाहीत, त्याही अधिकारांचा येवलेकरांकडून वापर पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/        कोंढवा, धायरी येथील उंच-सखल डोंेगरी भाग व बाणेर,  धानोरी, वडगाव शेरी सारख्या ठिकाणच्या सिमाभिंती, ह्या, तांत्रिक निकष व शास्त्रीय दृष्टीकोनातून बांधल्या नसल्याने ते कोसळल्याचा निष्कर्ष  शासनाच्या अभियांत्रिकी विभागाने काढला आहे. अनेकांचे प्राण गेले तरी पुणे महापालिकेतील आयुक्तस्तरावरील यंत्रणा अद्यापही ठोस कार्यवाहीपर्यंत येत नाहीये. बांधकामा संदर्भात अनेकविध तक्रारी आयुक्त कार्यालयात पडून आहेत, परंतु ज्...
पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती… लबाडी आणि कपटाने सगेसोयर्याना कामे देवून, आर्थिक घोटाळे करणारे, हमाल, अंगमेहनती कष्टकर्यांना न्याय ते काय देणार….

पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती… लबाडी आणि कपटाने सगेसोयर्याना कामे देवून, आर्थिक घोटाळे करणारे, हमाल, अंगमेहनती कष्टकर्यांना न्याय ते काय देणार….

सर्व साधारण
माथाडीच्या नावाखाली नेमका कुणी बाजार मांडलाय..... पुणे/दि/ रिजवान शेख/        राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या म्हणजे, विशिष्ट वर्ग व जातीची मक्तेदारी झाली आहे. भांडवलदार तर पूर्वी पासूनच आहेत. त्यामुळे भांडवलदार+ विशिष्ट जाती + विशिष्ट वर्ग = बाजार समिती. अस्सं काहीस समिकरण राज्यात उभे राहिले आहे. शेतकरी शेतात राब, राब -राबून, घाम गाळून, पिक घेतो. परंतु बाजारातील दलाल आणि आडते मात्र बाजार समितीच्या आडून शेतकर्‍यांना लुटण्यासाठी अखंड उभा असतो. बाजार समित्या म्हणजे लुटीचे अड्डे झाले आहेत. जिथं संचालक मंडळ आहेत, तिथे राजकारणाचे आखाडे तर जिथं प्रशासक नेमले आहेत, तिथं भांडवलदार आणि माथाडीच्या टाळुवरचं लोण खातात त्यांच राज्य सध्या बाजारात पसरले आहे. त्यामुळे बाजार समित्या म्हणजे लबाडी आणि कपटाचे माहेरघर झाले आहे.        दरम्यान पुण्याची कृषी उत्पन्न ब...
बक्षिसाऐवजी शिक्षा -‘चांद्रयान २’ साठी झटणार्या इस्त्रोतील शास्त्रज्ञांचा पगार सरकारने कापला

बक्षिसाऐवजी शिक्षा -‘चांद्रयान २’ साठी झटणार्या इस्त्रोतील शास्त्रज्ञांचा पगार सरकारने कापला

राजकीय
मुंबई/दि/         एकीकडे इस्त्रोचे शास्त्रज्ञ महत्वाकांक्षी प्रकल्प ‘चांद्रयान २’ च्या उड्डाणाची तयारी करत आहेत. या मोहिमेतून देशाचे नाव जगाच्या नकाशावर आणि अंतराळावर कोरण्याचा प्रयत्न इस्त्रोचे वैज्ञानिक अन् इंजिनिअर्स करत आहेत. मात्र, दुसरीकडे केंद्र सरकारने इस्त्रोतील शास्त्रज्ञांच्या पगारात कपात केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने १२ जून २०१९ रोजी एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार १९९६ पासून मिळणार्या दोन अतिरिक्त वेतनवाढ म्हणजेच देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता बंद करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.        देशाच्या अंतराळ जडणघडणमध्ये इस्त्रोचा सिंहाचा वाटा आहे. अग्नि क्षेपणास्त्र असेल, चांद्रयान मोहीम असेल किंवा चांद्रयान २ च्या लॉंचिंगची तयार असेल. इस्त्रोचे शास्त्रज्ञ दिवस-रात्र एक करुन देशाचे नाव जगात रोशन करत आहेत. देशाची अंतराळ ताकद वाढवत आह...
अन्न भेसळीचे राज्यातून समूळ उच्चाटन करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री

अन्न भेसळीचे राज्यातून समूळ उच्चाटन करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री

शासन यंत्रणा
raval मुंबई/दि/ राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व इतर अन्न पदार्थातील भेसळीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्‍यांनी क्शन मोडवर काम करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या अधिकार्‍यांना दिले.        अन्न व औषध प्रशासन विभाग हा समाजातील सर्व घटकांना स्पर्श करणारा विभाग आहे. राज्यातील अन्न व औषधाची सुरक्षितता ही जबाबदारी आपल्या विभागावर आहे.        सुरक्षिततेच्या बाबतीत लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे तितकेच गरजेचे आहे. राज्यातील सर्व अधिकार्‍यांनी विविध विभागाच्या समन्वयाने टाइम बाऊंड पद्धतीने कामाचे नियोजन करून मिथ्याकरण व भेसळीचे उच्चाटन करावे. ते काल झालेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते.         अन्न व औषध प्रशासन विभागा...
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील लोकसेवक ते प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, श्रीधर येवलेकरांचा जुजबी प्रवास.

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील लोकसेवक ते प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, श्रीधर येवलेकरांचा जुजबी प्रवास.

सर्व साधारण
pmc pune yewalkar छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील आणाजी पंत सुरनीस आणि पुणे महापालिकेतील बांधकाम विभागाचे श्रीधरपंत येवलेकर थोडक्यात.............  ते आणाजी पंत आणि हे श्रीधरपंत, दोघात नेमकं साम्य आहे काय...? पुणे/दि/अनिरूद्ध शालन चव्हाण/        पुणे महापालिका आणि राज्य शासनाचं प्रचंड आर्थिक नुकसान करायच. पुणे महापालिकेच्या नागरी सुविधांवर प्रचंड ताण आणायचा. प्रसंगी नगरसेवकांनाही हाताशी धरायचं, विधानसभा/ विधानपरिषद सदस्यांना यामध्ये नाहक गुंतवून ठेवायचं. आणि मुठभर भांडवलदारांचा आर्थिक फायदा करून  दयायचा  व त्यायोगे स्वतःचाही आर्थिक फायदा करून घ्यायचा हे सुत्र भयंकर आहे. पुणे महापालिकेने दिलेल्या पदांचा आणि अधिकारांचा एवढा वापर पुणे महापालिकेच्या इतिहासात कधीचा झाला नव्हता. त्याचा हा इतिहास पुणेकरांपुढे सादर करीत आहोत.        काही लोकांना सांगुन पैसे खाण्याची सवय असते,...
पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्ट्यांतील बेरोजगार युवकांची कृषी उत्पन्न बाजार समितीला कैफियत सनद सादर

पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्ट्यांतील बेरोजगार युवकांची कृषी उत्पन्न बाजार समितीला कैफियत सनद सादर

सर्व साधारण
apmc pune * बाजार समितीचे कर्मचारी- रासकर, कोंडे, कळमकर आणि बिबव्यांकडून वरकमाईचे महाउदयोग.        बाजार समितीला बदलीचा कायदाच लागु नाहीये काय... प्रशासक वर्षानुवर्षे तिथंच, कोंडे, रासकर हे देखील एकाच विभागात वर्षानुवर्षे, इतर अधिकारी व कर्मचारी आहे त्याच विभागात कार्यरत. वरील कर्मचार्‍यांचा विभाग बदली का होत  नाहीये... एकाच कर्मचार्‍याला वर्षानुवर्षे एकाच पदावर कशााठी... पुणे/दि/ प्रतिनिधी/        पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गुळ-भुसार, फळ व भाजीपाला विभाग, डाळींब यार्ड, फुल बाजार तसेच बाजार समितीकडील आऊटसोर्सिंगच्या कामांमध्ये स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच परप्रांतियांना बाजार आवारातून काढुन टाकावे या मागणीचे निवेदन रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र पुरस्कृत मार्केटयार्ड स्थानिक कामगार हक्क परिषदे...
खेकड्यानं धरण फोडलं, ही तर बौद्धिक दिवाळखोरी-विजय पांढरे

खेकड्यानं धरण फोडलं, ही तर बौद्धिक दिवाळखोरी-विजय पांढरे

शासन यंत्रणा
tiware dam पुणे/दि/        रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या ‘खेकडा’ वक्तव्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी जोरदार टीका सुरू झालीय.जलसंधारण विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरेंनी जलसंधारण मंत्र्यांचं ‘खेकडा’ वक्तव्य म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी असल्याचं म्हटलंय.        मोठ्याप्रमाणावर खेकड्यांनी तिवरे धरणं पोखरल्यामुळं ते फुटल्याची प्रतिक्रिया जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली होती. त्यावर विजय पांढरेंनी सावंत यांचं ते वक्तव्य अतिशय हास्यास्पद असून याला केवळ बौद्धिक दिवाळखोरीच म्हटलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिलीय.        तिवरे धरणाचा जो बेस आहे तो जवळपास आठशे ते हजार फूट रुंद आहे. खेकडा साधारणतः तीन ते चार फूट पोखरू शकतो आणि त्यामुळे जलसंधारण मं...
सारथीच्या धर्तीवर मागासवर्गीयांसाठी स्वायत्त संस्था – मंत्री डॉ. संजय कुटे

सारथीच्या धर्तीवर मागासवर्गीयांसाठी स्वायत्त संस्था – मंत्री डॉ. संजय कुटे

शासन यंत्रणा
vidhan bhavan mumbai मुंबई/दि/ विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील समाजाच्या युवक-युवतींसाठी विविध उपक्रम अंमलात आणण्यासाठी सारथीच्या धर्तीवर स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा शासनाचा मानस असून यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती विमुक्त जाती भटक्या जमाती, इमाव व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री तथा कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी आज विधानसभा आणि विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे दिली.        डॉ. कुटे पुढे म्हणाले, ‘बार्टी’ तसेच ‘सारथी’ या दोन्ही संस्थांमार्फत त्या-त्या लक्षित घटकांसाठी अनेक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत आणि त्यामुळे त्या-त्या घटकांच्या युवक युवतींचा विविध माध्यमातून विकास घडविला जात आहे. त्याचप्रकारे, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व ...

देशात दारू पिणार्या १६ कोटी लोकांपैकी ६ कोटी अट्टल बेवडे

सामाजिक
नवी दिल्ली : देशात किती लोकं दारू पितात याचा तपशीलवार आकडा केंद्र सरकारने राज्यसभेत सादर केला आहे. सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी ही आकडेवारी राज्यसभेत मांडली आहे. या आकडेवारीनुसार देशातले १६ कोटी नागरिक दारू पितात तर यातले ६ कोटी अट्टल बेवडे आहेत.        सामाजिक न्यायमंत्रालयाने पहिल्यांदाच व्यसने करणार्‍या नागरिकांचा आकडा कळावा यासाठी सर्वेक्षण केलं होतं. २०१८ साली हे सर्वेक्षण करण्यात आलं असून २ लाख १११ कुटुंबाच्या आधारे हा अभ्यास अहवाल तयार करण्यात आला. देशातील सगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कुटुंबे यासाठी निवडण्यात आली होती. अंमली पदार्थ किती प्रमाणात आणि कसे सेवन केले जातात याचा अभ्यास या सर्वेक्षणात करण्यात आला होता. ४ लाख ७३ हजार ५६९ व्यक्तींना या सर्वेक्षणाअंतर्गत प्रश्‍न विचारण्यात आले होते.       ...