Tuesday, February 4 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्राकडून महाराष्ट्राची बदनामी

गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्राकडून महाराष्ट्राची बदनामी

राजकीय
मुंबई/दि/गुजरातमध्ये मुंद्रा बंदरावर सापडलेल्या ३० हजार कोटी रुपयांच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी २ ग्रॅम, ५ ग्रॅम ड्रग्जची जास्त चर्चा करत महाराष्ट्राची बदनामी केंद्राकडून केली जात आहे, अशा शब्दात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हल्लाबोल केला आहे.दरम्यान, या प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळाला आहे, तर त्याला पकडणारा अधिकारी कायद्याविरोधात काम केल्याने कोर्टकचेर्या करत आहे, असे म्हणत भुजबळांनी मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला. ते पुण्यात बोलत होते. गुजरातमधील मुंद्रा बंदरावर ३० हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले. ते कुणी आणले, कुठून आणले, का आणले याची काही चौकशी नाही. दुसरीकडे २ ग्रॅम सापडले, ५ ग्रॅम सापडले असे करत सर्वांचं लक्ष ३० हजार कोटीच्या ड्रग्जवरून हटवून महाराष्ट्रावर आणले जात आहे. न्यायालयाने हे सर्व ऐकून निर्णय दिला आहे. आता आर्य...
कॉर्पोरेट भांडवलशाहीचं छोट्या उद्योगांवर वर्चस्व वाढल्यास काय होईल?

कॉर्पोरेट भांडवलशाहीचं छोट्या उद्योगांवर वर्चस्व वाढल्यास काय होईल?

सामाजिक
देशातील अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांचं खाजगीकरण होत असताना कॉर्पोरेट भांडववशाहीच्या नव्या रुपाने देशातील छोट्या उद्योगावर काय परिणाम होईल? जाणून घ्या अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांच्याकडून संजीव चांदोरकरओला / उबेर / झोमॅटो / स्विगी / ओयो/ गोबिगो / ऍमेझॉन / फ्लिपकार्ट / युट्युब / विविध प्लॅटफॉर्म्स यांचे राजकीय आर्थिक अन्वयार्थ काय आहे याचा आपण कधी विचार केला आहे का? जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाही आपल्या भांडवलावर जास्तीतजास्त परतावा मिळवण्याचे लाईफ मिशन न विसरता सतत विकसित असते. सतत विकसित होणारी ही प्रणाली समजून घेणे आव्हानात्मक आहे. उदा. मागच्या शतकातील वस्तुमाल उत्पादनाच्या फॉरमॅट मध्ये बडे / कॉर्पोरट भांडवल स्वतः प्रत्येक वस्तुमाल तयार करण्याचे अध्याहृत होते, त्यात अनेक बदल झाले आहेत. वरील बदल त्यापैकीच एक.नफ्यासाठी सतत नवनवीन गुंतवणुकीची क्षेत्रे शोधणे. हा कॉर्पोरेट भांडवलाचा अंगीभूत गुण आहे....
पुणे महापालिकेतील बदल्या आणि बढत्यांत कोट्यवधीची उलाढाल,पुणेकरांना फटका अन् मागासवर्गीय अधिकार्‍यांना विनाकारण रट्टा

पुणे महापालिकेतील बदल्या आणि बढत्यांत कोट्यवधीची उलाढाल,पुणेकरांना फटका अन् मागासवर्गीय अधिकार्‍यांना विनाकारण रट्टा

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेने प्रदीर्घ कालावधीनंतर अभियांत्रिकी संवर्गातील स्थापत्य व विद्युत विभागातील अधिकार्‍यांना पदोन्नती आणि बदल्या केल्या आहेत. पदोन्नतीमध्ये आणि बढत्यांमध्ये कोट्यवधी रूपयांची उलाढाल झाली असून, या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. तथापी गोपनियतेच्या नावाखाली सर्व प्रकरण जाणिवपूर्वक दडपले जात आहे. पुणेकरांना चांगल्या सुविधा देण्यात बदल्या आणि बढत्यामधील अर्थकारण हानीकारक ठरत असून, पुणे महापालिकेतील मागासवर्गीय अधिकार्‍यांना मात्र विनाकारण या अर्थचक्राचा रट्टा बसत आहे. नियमात असतांना देखील पदोन्नती दिली जात नाही. जाणिपूर्वक त्यांचा छळ करण्यात येत असल्याने सगळे अधिकारी हतबल झाले आहेत. पुणे महापालिकेने १. अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग ३ या पदावरून शाखा अभियंता स्थापत्य वर्ग २ या पदावर तदर्थ पदोन्नती आदेश दि. १७/९/२०२१ = १ ते ८...
KoregaonBhima चौकशी आयोगाचे परमबीर सिंह आणि रश्मी शुक्लांना समन्स

KoregaonBhima चौकशी आयोगाचे परमबीर सिंह आणि रश्मी शुक्लांना समन्स

शासन यंत्रणा
मुंबई/दि/कोरेगाव- भीमा दंगलीच्या तपासासाठी नेमलेल्या न्या.पटेल आयोगाने आता परागंदा असलेले पोलिस अधिकारी परमबीर सिंह आणि उठझऋ च्या अतिरीक्त महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या चौकशीसाठी समन्स दिले आहे. एल्गार परीषद पार पडलेल्या विश्रामबाग पोलिस स्टेशनकडून आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपासासाठी कागदपत्रं मागवण्याचे आदेश कालच आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. आज झालेल्या आयोगाच्या सुनावणीमधे तत्कालीन महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमबीर सिंह आणि पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांना ८ नोव्हेंबर रोजी तपासासाठी आणि कागदपत्रं जमा करण्याचे आदेश आयोगानं दिले आहे. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव- भीमा परीसरात उसळलेल्या दंगलीमधे एक जणाचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले होते. दंगलीनंतर राज्यात अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तत्कालीन सरकारने निवृत्त न्यायमुर्ती पटेल...
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरची  सततची भाववाढ नेमकं काय घडवणार आहे ?

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरची सततची भाववाढ नेमकं काय घडवणार आहे ?

राजकीय
पेट्रोलची गरज दुचाकी वापरायला, खाजगी वाहनांना सगळ्यात जास्त लागते. भारतातली ९० टक्के मालवाहतूक डिझेल मालवाहू वाहने, डिझेल रेल्वे इंजिन, डिझेलवर चालणार्‍या जलवाहतूक बोटी याद्वारे होते. डिझेलच्या किमतीत होणारी वाढ थेट सगळ्याच वस्तूंच्या किमती वाढवायला कारणीभूत ठरते. अजूनही मालवाहतूक करणार्‍या टेम्पो, तीन चाकी वाहने, ट्रक यांना डिझेलचे भाव जेवढे वाढलेत त्या प्रमाणात भाडे वाढवून मिळालेले नाहीत. डिझेलच्या भाववाढीच्या नावाखाली सगळा मलिदा आणि मलाई फक्त व्यापारी खात आहेत. या वाहतूक व्यवसायिकांना कमी भाड्यात धंदा करणे अपरिहार्य आहे, नफा अतिशय कमी असला तरीही कर्जाचे हप्ते, वाहनाचे टायर्स, विमा, सरकारी कर या सगळ्यांना पर्याय नाही म्हणून वाहतूकदार अतिशय कमी मार्जिनवर काम करत आहेत, मात्र या कोंडीचा स्फोट कधीही होऊ शकतो आणि वस्तूंच्या किमतीत अजून जास्त आणि मोठी भाववाढ होऊ शकते. ही महागाई अभूतपूर्व असेल,...
पदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका !

पदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका !

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/दि. ७ मे २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत असलेल्या हजारो मागासवर्गीय कर्मचार्‍यांवर अन्याय करणारा हा निर्णय असून राज्य सरकारने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सगळीकडून करण्यात येत आहे.देशातील धर्मांध संघटनांना देशातून आरक्षण संपवायचे आहे त्याचाच एक भाग म्हणून मागासवर्गीय समाजातील कर्मचार्‍यांना पदोन्नती मध्ये आरक्षण मिळू नये याचे प्रयत्न सतत या संघटनांकडून करण्यात येतात. या धर्मांध संघटनांचा हा आरक्षण विरोधी अजेंडा स्वतःला पुरोगामी म्हणवणारे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार का अमलात आणत आहे असा प्रश्न आता मागासवर्गीय समाजातून विचारला जात आहे.पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या या निर्णयाचा वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विटरवर चांगलाच समाचार घे...
समर्थ वाहतुक विभागाच्या पुराणिक दुष्कृत्यामुळे, पुणे शहर पोलीस दलाच्या प्रतिमेला डांबराचा लेप

समर्थ वाहतुक विभागाच्या पुराणिक दुष्कृत्यामुळे, पुणे शहर पोलीस दलाच्या प्रतिमेला डांबराचा लेप

सर्व साधारण
अहो दाजीबा, गावात होईल शोभा हे वागणं बरं नव्हंपुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुण्यात कोरोना महामारी संसर्गाचा प्रादुर्भाव मोठा असून, त्याच्या संहारिक कृत्यामुळे शेकडोंचे जीव गेले आहेत. राज्यातील ठाकरे सरकारने लॉकडाऊन घोषित केले आहे. मुलभूत नागरी व अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्या क्षेत्रात शुकशुकाट आहे. हॉटेल, रेस्टॉरंट,बार, प्रवासी वाहतुकीसारखे आवश्यक परंतु दुय्यम दर्जाचे व्यवसाय बंद झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांची रोजी बंद झाली असली, तरी समर्थ वाहतुक पोलीसांना मात्र लॉकडाऊनचा धक्का बसला आहे. प्रवासी व मालवाहतुक बंद आहे, हॉटेल रेस्टॉरंट-बार सारखी आस्थापना बंद असल्यामुळे सगळ्याच प्रकारचे चलन वलन बंद झाले असल्यामुळे बेभान झालेल्या समर्थ वाहतुक शाखेने आता आपला मोर्चा सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घालण्याचे सत्र सुरू केले आहे. थोडक्यात एखादया दारूड्याला दारू मिळाली नाही तर घरातील वापराची भांडी दे...
पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाकडील बोगस व निकृष्ठ दर्जांच्या कामांची चौकशीची मागणी

पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाकडील बोगस व निकृष्ठ दर्जांच्या कामांची चौकशीची मागणी

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्यासह पुण्यात मागील दोन वर्षांपासून कोविड १९ महामारीचा प्रादूर्भाव झालेला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत पुणे महापालिकेत तिजोरीत खडखडाट होता. यामुळे केवळ अत्यावश्यक कामांसाठी निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने अंदाजपत्रकातील स यादीतील कामांना अधिक प्राधान्य देण्यात आले. तथापी नगरसेवकांनी सुचविलेली बहुतांश कामे देखील तातडीची नसतांना देखील त्यावर निधी खर्च करण्यात आलेला आहे. बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाने करण्यात आलेली बहुतांश कामे अतिशय निकृष्ठ दर्जाची असून, संबधित कामांची तसेच ज्या कामांची तपासणी थर्ड पार्टी एजन्सीने केली त्यांची देखील चौकधी करण्याची मागणी रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्रसह स्थानिक संघटनांनी केली आहे. पुणे महापालिका परिमंडळ क्र. ५ चे उपआयुक्त श्री. अविनाश सकपाळ यांच्याकडे याबाबतचे निवेदन दिले असतांना देखील, क्षेत्रिय अधिकारी श्री. गणेश स...
५० टक्के आरक्षण मर्यादेचा पुनर्विचार करण्याची वेळ- राज्य सरकार

५० टक्के आरक्षण मर्यादेचा पुनर्विचार करण्याची वेळ- राज्य सरकार

राजकीय
पुणे/दि/इंद्रा सहानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ५० टक्के आरक्षण मर्यादेचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असा युक्तीवाद राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू झाली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडण्यात आली. यावेळी इंद्रा साहनी खटल्यानंतर घालून देण्याती आलेली ५० टाक्यांची मर्यादा आ फार काळ धरून बसता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारच्या बाजूने मुकुल रोहतगी यांनी मांडली.याचवेळी राज्य सरकारचे दुसरे वकील पटवाले यांनी सुद्धा युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या रिपोर्टचे वाचन केले. यावेळी न्यायालयाने काही प्रश्नही उपस्थित केले.त्यानंतर पटवाले यांनी पुढील युक्तिवादसाठी सोमवारपर्यंत वेळ मागून घेतला..त्यामुळे आता मुख्य सुनावणीला सुरुवात झाली आहे ...
किती पिढ्या आरक्षण सुरू राहणार असा सवाल सर्वोच्च न्यायालय कसा करू शकते?:

किती पिढ्या आरक्षण सुरू राहणार असा सवाल सर्वोच्च न्यायालय कसा करू शकते?:

सामाजिक
पुणे/दि/ प्रतिनिधी/सर्वोच्च न्यायालयात सध्या मराठा आरक्षणप्रश्नी सुनावणी सुरू असून ‘तुम्ही किती पिढ्या हे आरक्षण सुरू ठेवणार आहात?’ असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान केला. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आक्षेप घेतला असून आरक्षण किती काळ राहणार असा सवाल सर्वोच्च न्यायालय कसा करू शकते?, असा सवाल केला आहे. मराठा आरक्षणावरील सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी मंडल आयोग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय १९३१ च्या जनगणनेवर आधारित होता. आताची बदललेली परिस्थिती पाहता आरक्षणाचा कोटा ठरवण्याची जबाबदारी ही राज्यांवर सोपवली पाहिजे. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला (ईडब्ल्यूएस) १० टक्के आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा निर्णयही ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे उल्लंघन करणारा आहे, असा शुक्रवारी युक्तिवाद केला.रोहतगी यां...