Sunday, April 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

वंचित समुहांना वगळून विजयी होणे महाविकास आघाडीसाठी अशक्य! क्रूर आणि अमानुष जातीय अत्याचाराविरोधात लढा सुरूच राहील, बाळसाहेब आंबेडकरांचा सरकारला इशारा

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
भारताच्या निवडणूक इतिहासातील 2024 ची लोकसभा निवडणूक अगदी वेगळी असणार आहे, अगदी घनघोर राजकीय युद्धच असेल. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आघाडी आणि काँग्रेस आघाडीच्या दृष्टीनेही उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्र महत्त्वाचे ठरणार आहे. देशात राजकीय परिवर्तन घडवून आणायचे असेल तर विरोधकांना, विशेतः काँग्रेसला महाराष्ट्र सर करावा लागेल. मात्र त्यासाठी केवळ राजकीय आघाडी करून चालणार नाही. राज्यात निवडणुकीवर प्रभाव टाकणारे विविध सामाजिक घटक आहेत, त्या राजकीय शक्ती आहेत. ज्यांच्या बाजूने त्या जातील त्यांचा विजय निश्चित आहे, असे आजवरचे निवडणूक निकाल सांगतात. अशांपैकी महाराष्ट्रात वंचित बहुजन समाजाची राजकीय शक्तीचा निवडणुकीवर कायम प्रभाव राहिला आहे, म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीतही तिची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

क्रूर आणि अमानुष जातीय अत्याचाराविरोधात लढा सुरूच राहील, बाळसाहेब आंबेडकरांचा सरकारला इशारा
राज्यात दर दिवशी कुठे ना कुठे जातीय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथे दलित तरुणांना झाडाला उलटे टांगून मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. असं असतानाच साताऱ्यातील माण येथे एका दलित महिलेला रस्त्यात फरफटत नेऊन लाथा बुक्क्यांनी, काठी आणि उसाने अमानुष मारहाण झाल्याची अत्यंत क्रूर घटना उघडकीस आली. याप्रकरणी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत सोडणार नाही,” असं मत ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली.

बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, “साताऱ्यात एका दलित विधवेला 4 पुरुषांनी क्रूरपणे मारहाण केली. तिचा गुन्हा काय? तर तीने वैरणीसाठी म्हणजे गुरांच्या चाऱ्यासाठी पैसे दिले होते. पण चारा न मिळाल्याने तिचे स्वतःचे पैसे ती परत मागत होती म्हणून तिला क्रुरपणे मारहाण झाली. तिला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ इतका विचलित करणारा आहे की, या जातीय अत्याचाराचे वर्णन करण्यासाठी मला शब्दही सापडत नाहीत. अगदीच क्रूर आणि अमानुष.”

मागण्या मान्य करून घेण्यासाठी तीव्र आंदोलन करणार –
या पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला भेटून आधार देणारा आणि मदतीला धाऊन जाणारा वंचित बहुजन आघाडी हा पहिला पक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले. “आम्ही प्रभावीपणे हा मुद्दा मांडल्यामुळे या प्रकरणात अत्याचार कायद्यातंर्गत गुन्हा नोंद करावा लागला आणि त्या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली. आमच्या स्थानिक नेतृत्वाने तहसीलदारांना आमच्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. आजही हा न्यायचा लढा चालू ठेवत या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत, असा इशारा ॲड.आंबेडकर यांनी दिला.