Friday, May 10 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: devendra fadanvis

दरबारी नाव सिंहगड पोलीस स्टेशन, कारभार मात्र निजामशाही- आदिलशाहीसारखा… कॅसिनोला राज्यात बंदी, तरीही सिंहगड हद्दीत मात्र विभागुन कॅसिनो चालविला जातो…

दरबारी नाव सिंहगड पोलीस स्टेशन, कारभार मात्र निजामशाही- आदिलशाहीसारखा… कॅसिनोला राज्यात बंदी, तरीही सिंहगड हद्दीत मात्र विभागुन कॅसिनो चालविला जातो…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर व त्यांच्याही काळात अर्ध्या महाराष्ट्रावर आदिलशाही व निजामशाहीचा कारभार सुरू होता. पुणे, सुपे व बारामती हे तर विजापुरच्या आदिलशाहीचा महसुली परगणा होता. ब्रिटीश भारत व स्वतंत्र भारतात आदिलशाही, निजामशाही संपुष्टात आली तरीही मनांमधील आदिलशाही आणि निजामशाहीचा कारभार अजुन निघालेला नसल्याचे दिसून येत आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीचा कारभार देखील विजापुरच्या आदिलशाहीला साजेसा असाच असल्याचे दिसून येत आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कॅसिनोला बंदी आणलेली आहे. असे असतांना, एका कॅसिनो मध्ये गैरकायदयाच्या ज्या ज्या बाबी असतात त्या त्या सर्व सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत जागोजाग दिसून येतात. कॅसिनो मध्ये असलेले वेगवेगळे विभाग, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. थोडक्यात सिंहगड रोड पोलीस स्टेशन...
वंचित समुहांना वगळून विजयी होणे महाविकास आघाडीसाठी अशक्य! क्रूर आणि अमानुष जातीय अत्याचाराविरोधात लढा सुरूच राहील, बाळसाहेब आंबेडकरांचा सरकारला इशारा

वंचित समुहांना वगळून विजयी होणे महाविकास आघाडीसाठी अशक्य! क्रूर आणि अमानुष जातीय अत्याचाराविरोधात लढा सुरूच राहील, बाळसाहेब आंबेडकरांचा सरकारला इशारा

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भारताच्या निवडणूक इतिहासातील 2024 ची लोकसभा निवडणूक अगदी वेगळी असणार आहे, अगदी घनघोर राजकीय युद्धच असेल. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आघाडी आणि काँग्रेस आघाडीच्या दृष्टीनेही उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्र महत्त्वाचे ठरणार आहे. देशात राजकीय परिवर्तन घडवून आणायचे असेल तर विरोधकांना, विशेतः काँग्रेसला महाराष्ट्र सर करावा लागेल. मात्र त्यासाठी केवळ राजकीय आघाडी करून चालणार नाही. राज्यात निवडणुकीवर प्रभाव टाकणारे विविध सामाजिक घटक आहेत, त्या राजकीय शक्ती आहेत. ज्यांच्या बाजूने त्या जातील त्यांचा विजय निश्चित आहे, असे आजवरचे निवडणूक निकाल सांगतात. अशांपैकी महाराष्ट्रात वंचित बहुजन समाजाची राजकीय शक्तीचा निवडणुकीवर कायम प्रभाव राहिला आहे, म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीतही तिची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. क्रूर आणि अमानुष जातीय अत्याचाराविरोधात लढा सु...
पुणे मनपातील नोकर भरती, पदोन्नतीतील निकष बदल प्रकरणी विक्रम कुमार आणि रविंद्र बिनवडे यांची सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी करा

पुणे मनपातील नोकर भरती, पदोन्नतीतील निकष बदल प्रकरणी विक्रम कुमार आणि रविंद्र बिनवडे यांची सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी करा

सर्व साधारण
पुणे महापालिकेतील नोकर भरती आणि पदोन्नती…. आयुक्त विक्रम कुमार आणि अति. आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्याकडून…पुणे मनपा आकृतीबंधातील बदल, लाखोंची बोली आणि कोट्यवधी रुपयांचे व्यवहार….नोकर भरती आणि पदोन्नतीचे निकष का बदलत आहेत, जो पैसे देईल त्याची भरती आणि त्यालाच पदोन्नती, जो पैसे देणार नाही, त्याच्या भरती आणि पदोन्नतीमध्ये बदल केले… पुणे महापालिकेतील नोकर भरती आणि पदोन्नतीतील खाबुगिरी… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेच्या मागील 25 वर्षाच्या कालावधीत आजपर्यंत कधीच मेगा नोकर भरती झाली नाही किंवा 2014 रोजी पुणे महापालिकेचा आकृतीबंध मंजुर झाल्यानंतर देखील त्यात फारसा बदल केला गेला नाही. परंतु पुणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यापासून, धडाधड नोकर भरती सुरू आहे, पैसे मिळवुन देणाऱ्या अर्थातच महसुली खात्यातील आकृतीबंधामध्ये कमालिच्या दुरूस्त्या केल्या जात आहेत. ...
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना चौकशीला बोलवा, बाळासाहेब आंबेडकरांची आयोगाकडे मागणी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले –

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना चौकशीला बोलवा, बाळासाहेब आंबेडकरांची आयोगाकडे मागणी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले –

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/national forum/पुण्यातील भीमा कोरेगाव येथी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात झालेल्या भीषण दंगली प्रकरणी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, चौकशीसाठी बोलवावे अशी मागणी भीमा कोरेगाव चौकशी आयोगापुढे बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे, त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, याबाबत लोकांनी यापूर्वीही अर्ज केले आहेत. त्यावर आयोगाला जो निर्णय घ्यायचा होता, तो घेतला आहे. आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे. दरम्यान बाळासाहेब आंबेडकर हे एक निष्णात वकील आहेत. आयोगासमोर कोणाला बोलावावे व कोणास बोलवू नये हे आयोग ठरविते असे त्यांनी नमूद केले आहे. ...