पुणे महापालिकेत बदलीचा अधिनियम केवळ काही कर्मचाऱ्यांना लागु होत नाही…आशिष सुपणार 15 वर्षात एकदाही बदली नाही…. डीएसआय माने व नाईक यांची 2 वर्षात 3 वेळा बदली
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात मागील 12 ते 15 वर्षात 20 हजार कोटींचा गार्बेज स्कॅम घडला व आजही घडत आहे. कचरा म्हंटल की, सगळेच नाक मुरडतात त्यामुळे कचराच असल्यामुळे सहज कुणाचेही लक्ष जात नाही. त्याच कचऱ्याने आता पेट घेतला असून, हा वणवा 20 हजार कोटीपर्यंत गेला आहे. तेलगी स्कॅम हा 30 हजार कोटींचा, तो देखील पुण्यात उघडकीस आला, तसाच पुण्यातही गार्बेज स्कॅम घडला आहे. बारामतीतील नेतृत्वाच्या छत्रछायेखाली असलेल्या नेत्यांनी कचऱ्याचे महत्व ओळखले आणि पटापट सगळे प्रकल्प गिळंकृत केले. (ज्यांनी धरणातील आणि कॅनॉलमधील गाळही सोडला नाही, ते कचरा तरी कसे सोडतील..) कचरा वाहतुकीत पुणे मनपाची वाहने कमी परंतु खाजगी कंत्राटदारांचीच जास्त वाहने अभिलेखावर आढळुन येतील. त्यांच्या कचऱ्याच्या फेऱ्याही पुणे मनपापेक्षा तीनपट अधिक असल्याचे अभिलेख्यावरून दिसून येते. गार्डन कटींग मध्ये त...









