Wednesday, January 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

सामाजिक

मुस्लिमांना दुय्यम दर्जाच्या वागणूकीविरूद्ध आयएएस अधिकारी शाह फैजल यांचा राजीनामा

मुस्लिमांना दुय्यम दर्जाच्या वागणूकीविरूद्ध आयएएस अधिकारी शाह फैजल यांचा राजीनामा

सामाजिक
काश्मीर/ दि/                  यूपीएससी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावणारे पहिले काश्मिरी ठरलेले, सन २००९च्या तुकडीतील आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी बुधवारी सेवेचा राजीनामा दिला. काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या हत्या आणि भारतीय मुस्लिमांना दिली जात असलेली दुय्यम वागणूक याच्या निषेधार्थ राजीनामा देत असल्याचे ३५ वर्षीय फैजल यांनी सांगितले.                 फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही घोषणा केली आहे. ‘काश्मीरमध्ये सातत्याने होणार्‍या हत्या, त्या रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून केले जाणारे अपुरे प्रयत्न, ब्राम्हणवादी गटांकडून २० कोटी भारतीय मुस्लिमांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, जम्मू-काश्मीर राजाच्या स्वतंत्र ओळखीवर हल्ले करून ती पुसण्...
खुल्या प्रवर्गात आता दलित- ओबीसी उमेदवारांनाही संधी

खुल्या प्रवर्गात आता दलित- ओबीसी उमेदवारांनाही संधी

सामाजिक
SC-OBC-Promotion मुंबई/दि/ समांतर आरक्षणावरून सुरू असलेला गोंधळ व संभ्रम अखेर राज्य सरकारने बुधवारी (ता. १९) दूर केला. खुल्या प्रवर्गात समाजातील सर्वच गुणवत्ताधारक उमेदवारांना संधी दिली मिळणार आहे. याबाबत राज्य सरकारने बुधवारी जीआर काढला आहे. या निर्णयामुळे एससी, एसटी, एनटी व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेश व सरकारी नोकरीत संधी मिळणार आहे.       ऑगस्ट २०१४ मध्ये सरकारने जीआरद्वारे बदल करताना खुल्या प्रवर्गातील जागांवर दलित व मागास जातील उमेदवारांना आरक्षित प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेश अथवा नोकरी हवी असल्यास ती मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यानुसारच राज्य लोकसेवा आयोगाने आपल्या भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टासह सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिक...
शंभरातून एकाच युवकाला नोकरी, राज्य मागासवर्ग आयोगाचाच अहवाल

शंभरातून एकाच युवकाला नोकरी, राज्य मागासवर्ग आयोगाचाच अहवाल

सामाजिक
Maharashtra -Backward-class-commission-Pune नागपूर: राज्यात वर्षाला फक्त पाच टक्केच नोकर भरती होत असून शंभर पात्र युवकांमधून फक्त एका युवकालाच सरकारी नोकरी मिळते. राज्य मागासवर्गीय आयोगानेच आपल्या अहवालात याचा उल्लेख केला असल्याने आरक्षित आणि आरक्षणासाठी झटणार्‍या समाजाला प्रत्यक्षात काहीच फायदा होत नसल्याचे यावरून स्पष्ट होते.       अलीकडेच राज्य सरकारने मराठा समाजाला सोळा टक्के स्वतंत्र आरक्षण दिले आहे. धनगर, परीट, हलबा समाज अनुसूचित जातीच्या आरक्षणासाठी झटत आहे. ओबीसीमध्ये साडेतीनशे जातींचा आधीच समावेश आहे. मात्र, सरकारी पदभरती आरक्षण केवळ गाजरच ठरत असल्याचे दिसून येते. पाच टक्क्यांमध्ये अर्धा टक्का आरक्षितांच्या वाट्याला जातो.       लोकसेवांमधील आरक्षणाची चेष्टा असून शासकीय नोकरीची आशा बाळगून असलेल्या युवकांशी एक प्रकारचा विश्...
महार समाजाची शौर्यगाथा शिवकाळापासून, अनेकांनी केला कौतुकाचा वर्षाव

महार समाजाची शौर्यगाथा शिवकाळापासून, अनेकांनी केला कौतुकाचा वर्षाव

सामाजिक
Mahar Regiment मुंबई: महार समाजाची शौर्यगाथा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनची आहे. शिवकाळामध्ये स्वराज्यातील किल्ल्यांच्या रक्षणाची जबाबदारी ही महार समाजावर असे, अशा शब्दांत अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला.  शनिवारी महार रेजिमेंट अमृत महोत्सव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.       गेट वे ऑप इंडियासमोर झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व महार रेजिमेंटचे अनेक महत्त्वाचे लष्करी अधिकारी उपस्थित होते. भीमा कोरेगावच्या लढाईचा वर्धापन दिन १ जानेवारी रोजी येत आहे.       गेल्या वर्षी भीमा कोरेगाव येथे झालेला हिंसाचार व त्यातून निर्माण झालेल्या सामाजिक विद्वेषाच्या पार्श्‍वभूमीवर या क...

अनु जाती, मराठा एकत्र आल्यामुळेच भाजपाने घडवली भीमा-कोरेगाव दंगल

सामाजिक
पणजी/ वृत्तसेवा/                  अनु जाती आणि मराठा समाज एकत्र आल्यामुळे भाजपाने धसका घेतला आणि भीमा-कोरगाव प्रकरण घडवून आणले, असे प्रतिपादन भीमा-कोरगाव प्रकरणाचे अभ्यासक प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी येथे शुक्रवारी केले. गोव्यातील विविध संघटनांनी एकत्र येऊन प्रा. तेलतुंबडे यांचे व्याख्यान आयोजिले होते.  लोकशाही, मतभेद आणि आर्थिक वाढ असा त्यांचा विषय होता. या व्याख्यानाच्या शेवटी ते भीमा-कोरगाव प्रकरणावर बोलले. काय घडवले गेले, कसे घडवले गेले ते त्यांनी उलगडले. जात आणि धर्माचा वापर करून ब्राह्मण्यवादी राजसत्तेने कसे डाव साधले असा त्यांच्या कथनाचा सूर होता. भीमा-कोरगावची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी त्यांनी सांगितली.                 यानं...

महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणे घटनाबाह्य

सामाजिक
नवी दिल्ली : शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ‘महिलांना मंदिर प्रवेश नाकारणे हे घटनाबाह्य असून प्रत्येक वयोगटातील महिलेला मंदिर प्रवेशाचा हक्क आहे. त्यांना लिंगभेदावरून प्रवेश नाकारता येणार नाही’, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे देशातील सर्वच मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करण्याचा महिलांचा मार्ग मोकळा झाला आहे.                 शबरीमाला मंदिरात मासिक पाळी सुरू झालेल्या तरुणींना आणि महिलांना प्रवेश नाकारण्याबाबत यंग लॉयर्स असोसिएसनने दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश एम. खानविलकर, आर. एफ. नरीमन, डी. वाय. चंद्रचूड यांनी महिलांच्या बाजूने एकमताने...

भगवे झेंडे घेतलेल्या जमावाकडून दगडफेक-कोरेगाव भीमा हिंसाचार

सामाजिक
मुंबई/दि/ कोरेगाव भीमा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा निष्कर्ष काढणार्या पुण्याच्या सत्यशोधन समितीचे सदस्य भीमराव बनसोड यांनी गुरुवारी चौकशी आयोगापुढे साक्ष नोंदविली. ‘१ जानेवारीला भगवे झेंडे घेऊन हजारोंचा जमाव कोरेगाव भीमा येथे दाखल झाला. हे लोक स्थानिक नव्हते. या जमावाने विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या जमावावर दगडफेक केली,’ असा निष्कर्ष त्यांनी या अहवालात काढला आहे.                 सत्यशोधन समितीने सादर केलेल्या अहवालानुसार, वढूच्या रहिवाशांना १ जानेवारीला काहीतरी अघटित घडणार याची चाहूल लागली होती. कारण गोविंद गोपाळ समाधीच्या शेडची तोडफोड करण्यात आली. तेथील फलकही काढला होता. संभाजी महाराजांच्या समाधीजवळ काहीतरी अघटित घडणार, अशी अफवाही पसरली होती.         &nbs...

आगामी काळात उजव्या विचारसरणीचा अधिक धोका -मा. पोलीस महासंचालक

सामाजिक
पुणे/दि/ प्रतिनिधी/                 डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यासारख्या विचारवंतांच्या हत्या करून त्यांचे विचार संपणार नाहीत. अशाप्रकारची विचारधारा बाळगणेच चुकीचे आहे. कारण प्रत्येक प्रश्न बंदुकीने सुटत नाहीत. या विचारवंतांची हत्या करणारे सापडले तरी उजव्या विचारसरणीचा धोका काही संपणार नाही तर तो आगामी काळात आणखी वाढेल. त्यामुळे सर्वसामान्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत निवृत्त पोलीस महासंचालक एस.एस.विर्क यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आगामी काळात सायबर क्राईमचे मोठे आव्हान                 आगामी काळात देशासमोर सायबर क्राईमचे मोठे आव्हान असणार आ...
मराठा कार्यकर्त्यांना नक्षलवादी बनवू नका

मराठा कार्यकर्त्यांना नक्षलवादी बनवू नका

सामाजिक
मुंबई/दि/ प्रतिनिधी/                 काश्मीरमध्ये दगडफेक करणार्या तरुणांवरील गुन्हे मागे घेतले जात असतील, तर महाराष्ट्र बंदमध्ये सामील झालेल्या कार्यकर्त्यांवरील का नाही, असा सवाल उपस्थित करीत सकल मराठा समाजाच्या महिला कार्यकर्त्यांनी गुरुवारी आझाद मैदानात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.                 उमेदीच्या काळात गुन्हे दाखल करून मराठा कार्यकर्त्यांना नक्षलवादाकडे वळण्यास भाग पाडू नका, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.आंदोलनात विविध जिल्ह्यांतील महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या आहेत.                 रूपाली पाटील म्हणाल्या, न्यायप्रविष्ट मागण्यांवर...
महिला शंकराचार्य बनू शकत नाही – स्वामी स्वरूपानंद

महिला शंकराचार्य बनू शकत नाही – स्वामी स्वरूपानंद

सामाजिक
मथुरा/दि/ महिला राजकारणासह कोणत्याही इतर क्षेत्रात जाऊ शकतात, मात्र त्या शंकराचार्य बनू शकत नाहीत, असे वक्तव्य द्वारका-शारदापीठ आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले आहे.                 इतकेच नाही तर, नेपाळमधील प्रसिद्ध पशुपतिनाथ पीठाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी अखिल भारतीय विद्वत परिषदेवरही आक्षेप नोंदवले आहेत. अखिल भारतीय विद्वत परिषद या नावाने उभी करण्यात आलेली संस्था बनावट शंकराचार्य तयार करण्याचे काम करत आहे. या संस्थेने काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये पशुपतिनाथाच्या नावाने एक नवे पीठच निर्माण केले.                 मात्र अशाप्रकारचे कोणतेही पीठ असू शकत नाही, असे स्वामी स्वरूपानंद म्हण...