Thursday, May 9 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सर्व साधारण

मोदी सरकारच्या  ४ वर्षात भूकबळींमध्ये मोठी वाढ

मोदी सरकारच्या ४ वर्षात भूकबळींमध्ये मोठी वाढ

सर्व साधारण
नवी दिल्ली/दि/ भूकबळी संपविण्यासाठी कटिबद्ध आणि प्रयत्नशील असलेल्या देशांच्या यादीत भारत आता आणखी मागे पडल्याचे दिसत आहे. ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’चा २०१८ सालासाठीचा अहवाल जारी करण्यात आला आहे. त्यानुसार ११९ देशांच्या यादीत भारत १०३ व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी या यादीत भारत १०० व्या स्थानावर होता. विशेष म्हणजे भूकबळी संपविणार्या देशांच्या या यादीत २०१४ साली भारत ५५ व्या स्थानावर होता. आता हे स्थान खूपच पिछाडीवर गेल्यामुळे, मोदी सरकार देशातील भूकबळी कमी करण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.                 केंद्रातील मोदी सरकारला देशातील भूकबळी ही समस्या आव्हान ठरताना दिसत आहे. कारण, ग्लोबल हंगर इंडेक्सच्या अहवालामध्ये भारत सातत्याने मागे पडताना दिसत आहे. या यादीत २०१४ साली भारत ५५ व्या स्थाना...

मतदानासाठी मतदार यादीत छायाचित्र अनिवार्य नाही – डॉ. दीपक म्हैसेकर

सर्व साधारण
पुणे/दि/प्रतिनिधी/                 मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत, या सबबीखाली कोणालाही मतदानापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे स्पष्टीकरण विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.                 ‘मतदार यादीत छायाचित्र नसल्यास मतदानाला मुकावे लागणार’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याबाबत स्पष्टीकरण देताना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले, वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त योग्य नाही. मतदाराचे छायाचित्र असायला हवे, मात्र ते अनिवार्य नाही.              &...
देशात गेल्या २० वर्षात बेराजगारीत सर्वाधिक वाढ

देशात गेल्या २० वर्षात बेराजगारीत सर्वाधिक वाढ

सर्व साधारण
नवी दिल्ली : देशात सध्या बेरोजगारी ही सर्वात भीषण समस्या बनताना दिसत आहे. नुकत्याच आलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालातून ही बाब आणखी नव्याने पुढे आली आहे. गेल्या २० वर्षांच्या कालावधींचा अभ्यास केल्यास, सध्या बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाद्वारे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.                 देशात वाढत्या लोकसंख्येसोबतच बेरोजगारीमध्येही मोठी वाढ होत असल्याचे समोर आला आहे. यापूर्वी जवळपास २.३ टक्क्यांवर सातत्य राखून असलेले बरोजगारीचे प्रमाण २०१५ मध्ये ५ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या सर्वाधिक असून १६ टक्के तरुण बरोजगार आहे.                 &n...

५ हजार कोटींचा घोटाळा करून आणखी एक उद्योजक विदेशात फरार

सर्व साधारण
नवी दिल्ली/दि/  पाच हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला स्टर्लिंग बायोटेकचा मालक नितीन संदेसरा याला दुबईतून ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं उघड झाले आहे.                 मिळालेल्या माहितीनुसार, पाच हजार कोटींचा घोटाळा केल्यामुळे सीबीआय आणि सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) रडारवर असणारा नितीन संदेसरा दुबईत नसून नायजेरियात लपला आहे. सीबीआय आणि ईडीने गुजरातमधील बडोद्यातील स्टार्लिंग बायोटेकचे संचालक नितीन, चेतन आणि दिप्ती संदेसरा, राजभूषण ओमप्रकाश दिक्षित, विलास जोशी, चार्टर्ड अकाऊंटंट हेमंत हठी, आंध्र बँकेचे माजी संचालक अनुप गर्ग आणि काही अज्ञातांविरोधात बँकांची पाच हजार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.             &n...

भारतात डॉक्टरांना ओळखता येत नाही क्षयरोगाची लक्षणे

सर्व साधारण
नवी दिल्ली/दि/ भारतातील खाजगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर हे क्षयरोग या गंभीर आजाराची लक्षणेच ओळखू शकत नाही आणि या कारणाने रुग्णांवर योग्य ते उपचार होऊ शकत नाही, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.                 या अभ्यासात त्या लोकांना सहभागी करुन घेण्यात आले होते जे या आजाराची लक्षणे दाखवण्याचा अभिनय करु शकतील. क्षयरोग हा हवेतून पसरणारा आजार असून भारत, चीन आणि इंडोनेशियासहीत इतरही काही देशांमध्ये चिंतेचा विषय ठरत आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या नुसार, २०१७ मध्ये या आजाराने १७ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. या आजाराला मुळातून नष्ट करण्यासाठी बुधवारी संयुक्त राष्ट्रमध्ये एक वैश्‍विक आरोग्य संमेलन आयोजित केले होते, परंतु हा गंभीर आजार दूर कऱण्यात प्राथमिक उपचार करणारे डॉक्टर कमी पडत आहेत. जे रुग्णांना सुरुवातीला त्...

कमला नेहरू जवळील शारदा स्वीटहोम मधील सामोसा- कचोरीच्या चटणीत आढळला शिजलेला उंदीर

सर्व साधारण
पुणे/दि/                 सामान्यपणे सणांच्या काळात खवा-मावा आणि मिठाईची मागणी वाढते. त्यानुसार आता  गणेशोत्सव सुरू असून त्यानंतर नवरात्र, दसरा आणि मग दिवाळी असे सण ओळीत येणार नि खवा-मावा, मिठाईची मागणी आणखी वाढणार. पण या वाढत्या मागणीचाच फायदा घेत भेसळखोरही या काळात सक्रीय होतात. त्यामुळेच दरवर्षी खवा, मावा, मिठाई, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसह इतर अन्नपदार्थांमधील भेसळीचे प्रमाण वाढते. म्हणूनच सणासुदीच्या काळात असे पदार्थ खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.                 पुण्यात मागील आठवड्यात साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा पुणे शहर गुन्हे शाखा व अन्न व औषधण प्रशासनाच्या मदतीने जप्त करण्यात आला आहे. भावेश पटेल (र...
डिकोल्ड टोटल, सॅरिडॉन सारख्या  ३२७ गोळ्या-औषधांवर बंदी

डिकोल्ड टोटल, सॅरिडॉन सारख्या ३२७ गोळ्या-औषधांवर बंदी

सर्व साधारण
नवी दिल्ली/दि/                 ड्रग टेक्नॉलॉजी ऍडव्हायजरी बोर्ड अर्थात डीटीएबीने दिलेल्या शिफारसींनुसार केंद्र सरकारने डिकोल्ड टोटल आणि सॅरिडॉनसारख्या ३२७ औषधांवर बंदी घातली आहे. ही औषधे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधे आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एबॉट जशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत पिरामल, मॅक्सिऑड्स, सिप्ला आणि ल्यूपिन सारख्या घरगुती औषध निर्मात्या कंपनीच्या औषधांवर प्रभाव होणार आहे. तर, सरकारच्या या निर्णयाविरोधात औषध कंपन्या न्यायालयाचे दार ठोठावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.                 औषधनियंत्रक विभागाकडे आलेल्या या तक्रारींची दखल घेत दोन वर्षांपूर्वी अशा ३४३ फिक्स्ड डोस कॉम्बिने...

टीका करणे सोपे तर व्यवस्थेला मजबूत करणे अवघड

सर्व साधारण
नवी दिल्ली/दि/  मागील अनेक दिवसांपासून टीकेचा मारा सहन करत असलेले सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी अखेर मौन सोडत टीकाकारांवर पलटवार केला. न्यायव्यवस्था किंवा व्यवस्थेवर टीका करणे खूप सोपे आहे. परंतु व्यवस्थेला योग्य दिशेने बदलणे आणि त्यात सातत्य कायम ठेवून ती मजबूत करणे फार अवघड आहे, असे ते म्हणाले.                 ७२ व्या स्वातंत्र्या दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालय परिसरात ध्वजारोहणप्रसंगी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमुर्तींनी पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर टीका केल्यानंतर सुमारे ८ महिन्यानंतर न्या. मिश्रा यांनी सार्वजनिक मंचावरून मौन सोडले.                 ठोस आणि मजबूत सुधारणा तर्कसंगतता, परिप...

प्रसारमाध्यम स्वातंत्र्याची गळचेपी

सर्व साधारण
नवी दिल्ली/दि/ एका हिंदी वृत्तवाहिनीतील दोन वरिष्ठ पत्रकारांना तडकाफडकी द्यावे लागलेले राजीनामे आणि सरकारवर टीका करणार्या कार्यक्रमाच्या प्रसारणात वारंवार आणले गेलेले अडथळे, या प्रकारांची एडिटर्स गील्ड ऑफ इंडियाने गंभीर दखल घेतली असून माध्यम स्वातंत्र्यातील सरकारच्या ढवळाढवळीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.                 माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठी ज्या अपप्रवृत्ती काम करत आहेत त्यांच्यावर योग्यती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एडिटर्स गील्डने केली आहे. माध्यमांच्या मालकांनी सरकार किंवा कोणाच्याही दडपणापुढे नतमस्तक होऊ नये, असे आवाहनही एडिटर्स गील्डने केले आहे.                 जो प्रकार घडला आहे तो माध्यम स्वातंत्र्याच्...
पुरेसे पाणी द्या, संतप्त महिलांचा पालकमंत्री बापटांच्या घरावर मोर्चा

पुरेसे पाणी द्या, संतप्त महिलांचा पालकमंत्री बापटांच्या घरावर मोर्चा

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/                  शिवाजीनगर परिसरातील पोलीस वसाहतीत मागील काही दिवसांपासून एकच तास पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा पुरेसा नसल्याचे कारण देत पोलीस कुटुंबातील महिलांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर मोर्चा काढला.                 गिरिष बापट यांनी आंदोलक महिलांशी बोलताना सायंकाळी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले. परंतु बापट यांच्या आश्वासनाने समाधान न झाल्याने महिलांनी आपल्या लहान मुलांसह रहदारी असलेला फर्ग्युसन रस्ता रोखून धरला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलक महिलांना रस्त्याच्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक महिला काही ऐकण्याच्या मनस्...