Wednesday, May 1 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

एससी-एसटी कायद्यातील बदलाला मंजुरी, जुन्या तरतुदी कायम राहणार

सामाजिक
नवी दिल्ली/दि/                 केंद्रीय मंत्रिमंडळाने एससी-एसटी कायद्यातील बदलाला मंजुरी दिली आहे. परंतु कायद्यातील जुन्या तरतुदी कायम राहणार आहेत. तसेच न्यायालयाने तात्काळ अटकेला दिलेल्या स्थगितीचा निर्णय केंद्र सरकारने बदलला आहे. ऍट्रॉसिटी कायद्यात तात्काळ अटकेला स्थागिती देणार्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाने कायदा ‘जैसे थे’ लागू करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली. जुना ऍट्रॉसिटी कायदा जसा होता तसाच ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासोबतच, केंद्र सरकार संसदेत लवकरच यासंदर्भात कायदा बनवणार आहे असे सांगण्यात येत आहे.                 न्यायालयाला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्यात ...
१२ वर्षांआतील मुलींवरील बलात्कार प्रकरणात मृत्युदंड

१२ वर्षांआतील मुलींवरील बलात्कार प्रकरणात मृत्युदंड

सामाजिक
नवी दिल्ली/दि/  देशातील १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणात मृत्युदंडापर्यंतची शिक्षा असलेल्या आणि १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर अत्याचाराच्या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा देण्याची तरतूद असणार्‍या विधेयकाला सोमवारी लोकसभेत मंजुरी देण्यात आली.                 फौजदारी कायदा (दुरुस्ती) विधेयक, २०१८ लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाले. या विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान उत्तर देताना गृहराज्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले की, मागील काही दिवसात देशात बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्याने १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर आणि १६ वर्षांच्या आतील मुलींवरील अत्याचार प्रकरणात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.              &nb...

७ व्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपावर जाणार

शासन यंत्रणा
मुंबई/दि/ प्रतिनिधी/                  सातव्या वेतन आयोगासाठी सरकारकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केला आहे. राज्यातील दीड लाख राजपात्रित अधिकारी आणि तब्बल १५ लाख शासकीय कर्मचारी, शिक्षक हे ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान संपावर जाणार आहेत. सरकारसोबत कोणत्याही प्रकारची वाटाघाटी न करता हा संप करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ग. दि. कुलथे यांनी दिली.                 सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भात वित्तमंत्र्यानी तीन महीन्यापूर्वीच फाईलवर सही केली असून, ती फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलावर पडून आहे. मात्र, तेच यासाठी दरिंगाई करत असल्याचा आरोप यावेळी संघटनेकडून करण्यात आला. तसेच पाच...

भाजप श्रीमंत पक्ष कसा बनला?

राजकीय
नवी दिल्ली/दि/ कुठल्याही उद्योजकांची कॉंग्रेसने ‘चोर-लुटेरे’ अशी हेटाळणी केलेली नाही. उलट भाजपनेच कुडमुडया भांडवलदारांना हाताशी धरलेले आहे. याच भांडवलदारांकडून उभारलेल्या ट्रस्टचा बहुतांश पैसा भाजपकडे गेला आहे. चार वर्षांत भाजप सर्वात श्रीमंत पक्ष कसा बनला, असा सवाल कॉंग्रेस नेता आनंद शर्मा यांनी सोमवारी पत्रकार परषिदेत केला.                 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लखनौमधील सभेत कॉंग्रेसच्या दुटप्पीपणावर टीका केली होती. ‘उद्योजक म्हणजे कोणी चोर-लुटेरे नाहीत. त्यांच्याशेजारी उभे राहण्याची भीती कशाला बाळगायची?’ अशी टिप्पणी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना आनंद शर्मा म्हणाले की, उद्योगांना प्रोत्साहन देण्याचीच कॉंग्रेसची भूमिका राहिलेली आहे.          &nbs...
पुरेसे पाणी द्या, संतप्त महिलांचा पालकमंत्री बापटांच्या घरावर मोर्चा

पुरेसे पाणी द्या, संतप्त महिलांचा पालकमंत्री बापटांच्या घरावर मोर्चा

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/                  शिवाजीनगर परिसरातील पोलीस वसाहतीत मागील काही दिवसांपासून एकच तास पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा पुरेसा नसल्याचे कारण देत पोलीस कुटुंबातील महिलांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर मोर्चा काढला.                 गिरिष बापट यांनी आंदोलक महिलांशी बोलताना सायंकाळी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले. परंतु बापट यांच्या आश्वासनाने समाधान न झाल्याने महिलांनी आपल्या लहान मुलांसह रहदारी असलेला फर्ग्युसन रस्ता रोखून धरला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलक महिलांना रस्त्याच्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक महिला काही ऐकण्याच्या मनस्...