Tuesday, March 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

बेकायदा बांधकामांना संरक्षण नाहीच

बेकायदा बांधकामांना संरक्षण नाहीच

सर्व साधारण
पुणे व मुंबई/दि/ प्रतिनिधी/                  नवी मुंबईतील दिघा व अन्य ठिकाणच्या एमआयडीसी आणि सिडकोच्या जमिनींवरील सुमारे शंभर बेकायदा इमारतींना कोणतेही संरक्षण मिळणार नसून त्या इमारती पाडण्याचे आदेश कायम राहतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय देतानाच बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्यासाठी सरकारने ‘एमआरटीपी’ कायद्यात दुरुस्ती करून नव्याने समाविष्ट केलेले कलम ५२(ए) न्यायालयाने घटनाबाह्य ठरवले आहे. त्यामुळे राज्यातील बेकायदा बांधकामांना सरसकट संरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.                 बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्यासाठी ‘एमआरटीपी’ कायद्यात दुरुस्ती करून नव्याने समाविष्ट केलेले कलम ५...
छुमक छूम नाचे,  नाचे… नर्तकी…  अन् पब-डान्सबारच्या हिंदोळ्यावर स्वप्निलरावांचे हिंदोळे

छुमक छूम नाचे, नाचे… नर्तकी… अन् पब-डान्सबारच्या हिंदोळ्यावर स्वप्निलरावांचे हिंदोळे

पोलीस क्राइम
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/                 आमी इंद्राच्या घरच्या वारांगणा, नाचुनिया खूष करू, सकलजना...चा ठेका धरत... शृंगारातून आले न्हावून, स्वर्गातल्या मेनके सारखी पर्यंत संध्याकाळी ८ वाजल्यापासून ते पहाटे ४ ते पाच वाजेपर्यंत विमानतळ पोलीसांच्या साक्षीने पब, डान्सबार, हुक्का पार्लरवर भल्या मोठ्या पगारदारांची बैठक रंगलेली असते. याच लेटनाईट पार्ट्यांमध्ये मग हळुच हायप्रोफाईल गर्ल्सचा शिरकाव होतो. बैठक आणखी रंगाला येते. याच पब-डान्सबारच्या हिंदोळ्यावर सध्या विमानतळ पोलीस स्टेशनमधील स्वप्निलरावांच्या हिंदोळ्याला बहर आला आहे. विमाननगरातील फर्माइश, ऍटमोसफेर पासून ते दोराबजीच्या गल्लीतील हुक्का पार्लर व इथुन पुढे डझन दोन डझन ठिकाणी बैठकांचे फड रंगात आलेले असतात. त्याचा त्रास आता विमानतळ पोलीस ठाणे हद्दीतील वसाहती,...
पिकल्या पानाचा, देठ की हो हिरवाऽऽऽ

पिकल्या पानाचा, देठ की हो हिरवाऽऽऽ

पोलीस क्राइम
पुणे- खडकी/दि/                 खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व गैर कारभाराबाबत थेटच गृहमंत्रालयापर्यंत अनेक तक्रारी गेलेल्या आहेत. आपले सरकार पोर्टलपासून ते लोकायुक्तापर्यंत प्रतित्रापत्राव्दारे तक्रारी केल्याने, सध्या खडकीतील अवैध व गैरधंदे अंशतः चालु आहे. सध्या मोहित्यांसारखे वरीष्ठ पोलीस निरीक्षक आल्याने त्यांना काबूत ठेवण्याची कला अजून एकाही वसूलदाराकडे नाहीये. त्यामुळे त्यांचा शब्द म्हणजे शब्दच. बंद म्हणजे बंदच.  त्यामुळे सध्या खडकी बंद असली तरी अप्पा बंद ठेवतील तर नवलच. पिकल्या पानाचा देठ कीहो हिरवा...असे सांगण्यात येते की, सध्या काळा बाजार बंद असला तरी अप्पा पान टपर्‍यांवरून नियमित वसूली करीत असल्याचे दिसून येत आहे. एका एका पान टपरीवाल्याकडून पूर्वी अप्पा ३००० हजार रुपये घ्यायचे म्हणे. धंदे बंद...
स्वारगेट पोलीसांचे क्रुर क्रौर्ये स्वारगेट पोलीसांच्या जबर मारहाणीत युवकाचा कोठडीत मृत्यू

स्वारगेट पोलीसांचे क्रुर क्रौर्ये स्वारगेट पोलीसांच्या जबर मारहाणीत युवकाचा कोठडीत मृत्यू

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/                 पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मिलिंद गायकवाड यांच्या अन्यायकारक बदलीने पुणे शहर पोलीस दल धास्तावले आहे. भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांनी खंडणी मागितल्या प्रकरणी श्री. गायकवाड यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. श्री. गायकवाड यांच्या धाडसी वर्तनामुळे पुणे शहरातील नागरीकांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली होती. दरम्यान अन्यायकारक बदलीने पोलीस आणि नागरीक धास्तावलेले असतांनाच, परवा पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्याने क्रुर व पाशवी कृत्य करून, सर्वसामान्य पुणेकर नागरीक व पोलीस दलास भयंकर धक्का दिला आहे. मोबाईल चोरीच्या संशयावरून एका युवकास मार्केटयार्ड  येथुन उचलण्यात आले. त्यात स्वारगेट पोलीस ठाण्याच्या कोठडीत जबरी मारहाण केल्यामुळे त...

अनु जाती, मराठा एकत्र आल्यामुळेच भाजपाने घडवली भीमा-कोरेगाव दंगल

सामाजिक
पणजी/ वृत्तसेवा/                  अनु जाती आणि मराठा समाज एकत्र आल्यामुळे भाजपाने धसका घेतला आणि भीमा-कोरगाव प्रकरण घडवून आणले, असे प्रतिपादन भीमा-कोरगाव प्रकरणाचे अभ्यासक प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी येथे शुक्रवारी केले. गोव्यातील विविध संघटनांनी एकत्र येऊन प्रा. तेलतुंबडे यांचे व्याख्यान आयोजिले होते.  लोकशाही, मतभेद आणि आर्थिक वाढ असा त्यांचा विषय होता. या व्याख्यानाच्या शेवटी ते भीमा-कोरगाव प्रकरणावर बोलले. काय घडवले गेले, कसे घडवले गेले ते त्यांनी उलगडले. जात आणि धर्माचा वापर करून ब्राह्मण्यवादी राजसत्तेने कसे डाव साधले असा त्यांच्या कथनाचा सूर होता. भीमा-कोरगावची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी त्यांनी सांगितली.                 यानं...
पुण्यातील बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी विशेष मोहीम

पुण्यातील बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी विशेष मोहीम

सर्व साधारण
पुणे/दि/प्रतिनिधी/                 शहरातील वाहनचालकांकडून करण्यात येणा-या वाहतूक नियमभंगामुळे अनेक लहान मोठे अपघात होत असतात. या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागून अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी वाहतूक शाखेतर्फे वेळोवेळी विशेष मोहीम राबवून नियमभंग करणार्‍या चालकांवर कारवाई करण्यात येत असते.                 शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित चालण्यासाठी वाहतूक शाखा, पुणे महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन विभाग, पीएमपीएमएलयांनी एकत्र येत एक मोहीम आखली आहे. या मोहीमअंतर्गत शहरातील गर्दीचे १०० चौक निश्चित केले असून ते चौक, रस्ते नो व्हायोलेशन झोन म्हणून तयार केले आहेत. १९ ऑक्टोबरपासून या मोहिमेची अंमलबजावणी होणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक...
बाळासाहेब आंबेडकरांचा फडणवीसांना सवाल- रास्वसंघाकडे एके ४७ आली कुठून, भागवतांना मोक्का लावणार का?

बाळासाहेब आंबेडकरांचा फडणवीसांना सवाल- रास्वसंघाकडे एके ४७ आली कुठून, भागवतांना मोक्का लावणार का?

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/                 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे (आरएसएस) असलेली शस्त्रास्त्रे सरकारने जप्त करावी. या देशाचा कायदा कोणालाही शस्त्र बाळगण्याची परवानगी देत नाही, मग संघाकडे एके ४७ रायफल कशी आली, असा सवाल करत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी  देवेंद्र फडणवीस सरकारला सवाल केला आहे, की सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करणार की नाही. संघाकडे असलेली शस्त्रे जप्त केली नाही तर महाराष्ट्रात चक्का जाम करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.                 रास्वसंघ दरवर्षी दसयाला नागपूरमध्ये शस्त्रपूजन करत आले आहे. त्यांच्या या शस्त्रपूजनाला शांतताप्रिय संघटनेने विरोध केला आहे. याविरोधात...
मोदी सरकारच्या  ४ वर्षात भूकबळींमध्ये मोठी वाढ

मोदी सरकारच्या ४ वर्षात भूकबळींमध्ये मोठी वाढ

सर्व साधारण
नवी दिल्ली/दि/ भूकबळी संपविण्यासाठी कटिबद्ध आणि प्रयत्नशील असलेल्या देशांच्या यादीत भारत आता आणखी मागे पडल्याचे दिसत आहे. ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’चा २०१८ सालासाठीचा अहवाल जारी करण्यात आला आहे. त्यानुसार ११९ देशांच्या यादीत भारत १०३ व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी या यादीत भारत १०० व्या स्थानावर होता. विशेष म्हणजे भूकबळी संपविणार्या देशांच्या या यादीत २०१४ साली भारत ५५ व्या स्थानावर होता. आता हे स्थान खूपच पिछाडीवर गेल्यामुळे, मोदी सरकार देशातील भूकबळी कमी करण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.                 केंद्रातील मोदी सरकारला देशातील भूकबळी ही समस्या आव्हान ठरताना दिसत आहे. कारण, ग्लोबल हंगर इंडेक्सच्या अहवालामध्ये भारत सातत्याने मागे पडताना दिसत आहे. या यादीत २०१४ साली भारत ५५ व्या स्थानावर हो...
संभाजी महाराजांनंतर आता  संत तुकाराम महाराजांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण

संभाजी महाराजांनंतर आता संत तुकाराम महाराजांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण

राजकीय
मुंबई/दि/प्रतिनिधी/                 छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर आता संत तुकाराम महाराज यांच्या पत्नीबद्दल एका पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण केल्याचे आढळले आहे. आता तर हद्द झाली, सर्व शिक्षा अभियानातली ही पुस्तकं अभ्यासक्रमातून काढून घ्या. संबंधितांवर कारवाई कराच, पण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जबाबदारी पेलवत नसेल तर राजीनामा द्यावा,  असा हल्लाबोल अजितदादा पवार यांनी केला.                 सर्व शिक्षा अभियानाच्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण केल्याचा वाद शमत नाही तोच, या अभियानातील आणखी एका पुस्तकात संत तुकाराम महाराज व त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण असल्याची माहि...

सत्तेतून बाहेर पडा; मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा – विखे पाटील

राजकीय
मुंबई/दि/                 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर शब्दात समाचार घेतला असून, अगोदर या सरकारमधून बाहेर पडा; मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा, असे शिवसेनेला सुनावले आहे.                 कॉंग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याचा फैजपूर येथे प्रारंभ करताना ते बोलत होते. या विशाल सभेला संबोधित करताना विखे पाटील यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौर्यावर बरसताना ते म्हणाले की, शिवसेनेने आजवर २३५ वेळा सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे दिले. पण शेवटपयर्ंत सत्ता सोडली नाही. हे सरकार लोकविरोधी आहे, शेतकरी विरोधी असे वा...