Sunday, March 16 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

सत्तेतून बाहेर पडा; मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा – विखे पाटील

राजकीय
मुंबई/दि/                 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर शब्दात समाचार घेतला असून, अगोदर या सरकारमधून बाहेर पडा; मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा, असे शिवसेनेला सुनावले आहे.                 कॉंग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याचा फैजपूर येथे प्रारंभ करताना ते बोलत होते. या विशाल सभेला संबोधित करताना विखे पाटील यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौर्यावर बरसताना ते म्हणाले की, शिवसेनेने आजवर २३५ वेळा सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे दिले. पण शेवटपयर्ंत सत्ता सोडली नाही. हे सरकार लोकविरोधी आहे, शेतकरी विरोधी असे वा...
राफेल घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा; प्रशांत भूषण व शौरी यांची मागणी

राफेल घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा; प्रशांत भूषण व शौरी यांची मागणी

राजकीय
नवी दिल्ली/ दि/                 राफेल करारात झालेल्या भ्रष्टाचाराचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात यावा, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत भूषण आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी केली आहे. सीबीआय मुख्यालयात जाऊन त्यांनी गुरुवारी सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची भेट घेतली.                 ’हिंदूस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीने यापूर्वीच सुखोईसारख्या ७ अत्याधुनिक लढाऊ विमानांची निर्मिती केलेली आहे. सरकार सध्या त्यांच्या स्वत:च्या भुमिकेवरच ठाम नाही. एक खोटे लपवण्यासाठी त्यांना अनेक खोट्या गोष्टी लोकांसमोर मांडाव्या लागत आहेत, असे अरुण शौरी यांनी म्हटले.     &nbs...

मतदानासाठी मतदार यादीत छायाचित्र अनिवार्य नाही – डॉ. दीपक म्हैसेकर

सर्व साधारण
पुणे/दि/प्रतिनिधी/                 मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत, या सबबीखाली कोणालाही मतदानापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे स्पष्टीकरण विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.                 ‘मतदार यादीत छायाचित्र नसल्यास मतदानाला मुकावे लागणार’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याबाबत स्पष्टीकरण देताना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले, वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त योग्य नाही. मतदाराचे छायाचित्र असायला हवे, मात्र ते अनिवार्य नाही.              &n...
अवैध व्यवसायांच्या प्रतिबंधासाठी अचानक तपासणी करण्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे निर्देश

अवैध व्यवसायांच्या प्रतिबंधासाठी अचानक तपासणी करण्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे निर्देश

राजकीय
मुंबई/दि/  राज्याच्या ग्रामीण भागातील असामाजिक तत्व व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक परिक्षेत्रातील पोलीस महानिरीक्षकांना त्या त्या भागात अचानक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.                 येत्या आठवडाभरात प्रत्येक पोलीस परिक्षेत्रात पोलीस महानिरीक्षकांनी ही अचानक भेटी देऊन प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध व्यवसाय बंद झाले आहे की नाही ते पाहणे. तसेच शाळा, महाविद्यालये व आश्रमशाळा येथे विशेषतः मुलींच्या बाबतीत घडणार्‍या घटनांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांमार्फत सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांना दिले असल्याची माहिती श्री. केसरकर यांनी यावेळी दिली.     &nbs...
आंबेडकरवाद्यांनो सावधान !  ऍड. बाळासाहेब आंबेडकर

आंबेडकरवाद्यांनो सावधान ! ऍड. बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
पुणे/दि/                  ‘आम्ही यापुढे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपाबरोबर जाणार नाही’ असा निर्णय पंढरपूरच्या धनगर मेळाव्यामध्ये धनगर समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन घेतला. याचे काही कारण आहे आणि त्यामागे एक भूमिका आहे. धनगर समाजातील डोळसपणे राजकारण करणार्‍यांना आता असे जाणवत आहे की, गेली ७० वर्ष धनगर समाजाला या पक्षांनी मतदानासाठी वापरले. पण, समाजाचे प्रश्‍न हे सोडवू शकले नाहीत किंवा ते सोडवण्याची त्यांची इच्छासुद्धा नाही. या कारणामुळेच धनगर आणि आदिवासी यांच्यात नाहक भांडण लावून मतभेद निर्माण केले गेले आणि ते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. आता या समूहांनी ठरवले आहे की, आम्ही या पुढे सत्तेचे राजकारण करणार, मागणीचे राजकारण करणार नाहीत. सत्तेमध्ये येवून आम्हीच आदिवासींशी चर्चा करून ‘धनगर आणि ...
प्रकाश आंबेडकरांचा मोदी-भाजपवर घणाघात- पेट्रोल दरवाढ रिलायन्सची दिवाळखोरी घालवण्यासाठी

प्रकाश आंबेडकरांचा मोदी-भाजपवर घणाघात- पेट्रोल दरवाढ रिलायन्सची दिवाळखोरी घालवण्यासाठी

राजकीय
औरंगाबाद/दि/ भाजप सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर रिलायन्सची दिवाळखोरी घालवण्यासाठी आणि त्यातून दलाली खाण्यासाठी वाढविल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शेतक-यांना साले म्हणणारे आणि सालगड्या प्रमाणे वागवणा-या भाजप सरकारने देशात राजेशाही नसल्याचे लक्षात घेण्याचा इशारा आंबेडकरांनी येथील  जंबिंदा मैदानावर आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या शेतकरी मेळाव्यात दिला.                 प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी आणि बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी प्रमुख असलेल्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) यांच्या आघाडीची घोषणा मंगळवारी औरंगाबादमधील जाहीर सभेत करण्यात आली. महाराष्ट्रात या आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर असतील असे खासदार ओवेसींनी स्पष्ट केले. &nbs...

तारिक अन्वर यांचे पवारांविरोधात बंड खासदारकीसह राष्ट्रवादी पक्षाचाही राजीनामा

राजकीय
मुंबई/दि/                  सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाच्या मुद्द्यावरून २० वर्षांपूर्वी शरद पवार यांच्यासोबत कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणारे तारिक अन्वर यांनी आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधातच बंड केले आहे. राफेल विमान करारासंदर्भात पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी दर्शवत अन्वर यांनी खासदारकीसह पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. अन्वर यांच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. राफेल कराराच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसने सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे. या करारात घोटाळा असून त्यास मोदीच जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.                 शरद पवार यांनी या संदर्भात व्यक्तव्य करतान...
देशात गेल्या २० वर्षात बेराजगारीत सर्वाधिक वाढ

देशात गेल्या २० वर्षात बेराजगारीत सर्वाधिक वाढ

सर्व साधारण
नवी दिल्ली : देशात सध्या बेरोजगारी ही सर्वात भीषण समस्या बनताना दिसत आहे. नुकत्याच आलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालातून ही बाब आणखी नव्याने पुढे आली आहे. गेल्या २० वर्षांच्या कालावधींचा अभ्यास केल्यास, सध्या बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाद्वारे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.                 देशात वाढत्या लोकसंख्येसोबतच बेरोजगारीमध्येही मोठी वाढ होत असल्याचे समोर आला आहे. यापूर्वी जवळपास २.३ टक्क्यांवर सातत्य राखून असलेले बरोजगारीचे प्रमाण २०१५ मध्ये ५ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या सर्वाधिक असून १६ टक्के तरुण बरोजगार आहे.                  स...

५ हजार कोटींचा घोटाळा करून आणखी एक उद्योजक विदेशात फरार

सर्व साधारण
नवी दिल्ली/दि/  पाच हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला स्टर्लिंग बायोटेकचा मालक नितीन संदेसरा याला दुबईतून ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं उघड झाले आहे.                 मिळालेल्या माहितीनुसार, पाच हजार कोटींचा घोटाळा केल्यामुळे सीबीआय आणि सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) रडारवर असणारा नितीन संदेसरा दुबईत नसून नायजेरियात लपला आहे. सीबीआय आणि ईडीने गुजरातमधील बडोद्यातील स्टार्लिंग बायोटेकचे संचालक नितीन, चेतन आणि दिप्ती संदेसरा, राजभूषण ओमप्रकाश दिक्षित, विलास जोशी, चार्टर्ड अकाऊंटंट हेमंत हठी, आंध्र बँकेचे माजी संचालक अनुप गर्ग आणि काही अज्ञातांविरोधात बँकांची पाच हजार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.             &nb...

महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणे घटनाबाह्य

सामाजिक
नवी दिल्ली : शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ‘महिलांना मंदिर प्रवेश नाकारणे हे घटनाबाह्य असून प्रत्येक वयोगटातील महिलेला मंदिर प्रवेशाचा हक्क आहे. त्यांना लिंगभेदावरून प्रवेश नाकारता येणार नाही’, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे देशातील सर्वच मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करण्याचा महिलांचा मार्ग मोकळा झाला आहे.                 शबरीमाला मंदिरात मासिक पाळी सुरू झालेल्या तरुणींना आणि महिलांना प्रवेश नाकारण्याबाबत यंग लॉयर्स असोसिएसनने दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश एम. खानविलकर, आर. एफ. नरीमन, डी. वाय. चंद्रचूड यांनी महिलांच्या बाजूने एकमताने...