Wednesday, March 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

लेखापरीक्षकांच्या आक्षेपांची पुर्तता नाही, उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी नाही, बेकायदा बांधकामांवर देखील कारवाई नाही, – आता … मुजोर अभियंत्यांचा सत्कार नेमका कोणत्या शालजोडीने करावा…

लेखापरीक्षकांच्या आक्षेपांची पुर्तता नाही, उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी नाही, बेकायदा बांधकामांवर देखील कारवाई नाही, – आता … मुजोर अभियंत्यांचा सत्कार नेमका कोणत्या शालजोडीने करावा…

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/ पुणे महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या खात्यांचे ऑडीट अर्थात लेखापरीक्षण केले जाते. ज्या खात्यांनी पुणे महापालिकेचे हित लक्षात न धेता विशिष्ठ वर्गाला अधिकचा लाभ देवून, पुणे महापालिकेचे नुकसान केले, त्या बाबतचे आक्षेप नोंदवून त्या रकमा संबधित खात्याने वसुल करण्याबाबतचे निदेश दिले जातात. ज्या बांधकाम व्यावसायिकांकडे कोट्यवधी रुपयांचे येणे आहे, त्या रकमा बांधकाम विभागासह अन्य विभागांनी वसुल केलेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. अनाधिकृत बांधकामाबाबत मागील १५ वर्षांपासून उच्च न्यायालय, राज्य शासनाने वेगवेगळ्या आदेशांव्दारे कारवाईचे आदेश दिले आहेत. तथापी त्याची अंमलबजावणी देखील बांधकाम विभागाकडुन केली जात नाही. नागरीकांनी तक्रारी नोंदविल्यानंतर निव्वळ नोटीसा देण्याचे काम केले जाते, परंतु कारवाई केली जात नाही. महापालिका आयुक्त कार्यालय व शहर अभियंता कार्यालयास दर मंगळवारच्या ...
बिबवेवाडीत बेकायदा मंदिर व बेकायदा बांधकामांना संरक्षण दिल्या प्रकरणी अभियंता राखी चौधरी यांना पुणे महापालिकेतून बडतर्फ करण्याची मागणी

बिबवेवाडीत बेकायदा मंदिर व बेकायदा बांधकामांना संरक्षण दिल्या प्रकरणी अभियंता राखी चौधरी यांना पुणे महापालिकेतून बडतर्फ करण्याची मागणी

सर्व साधारण
unligal mandir pmc पुणे/दि/ प्रतिनिधी/ पुण्यातील बहुतांश सर्व पेठांमध्ये भगवान शंकर, गणपती व मारूतीची अनेक मंदिर आहेत. सोमवार मंगळवार कसब्यात तर जागोजाग शिवमंदिर शिवलिंग आहेत. त्यातील काही समाधीस्थळ आहेत. मारूतीची तर प्रत्येक ठिकाणी मंदिर आहेत. गणपतीसह विविध देवी देवतांची मंदिर आहेत. जुन्या काळातील मस्जिद व दर्गा आहेत. परंतु १९९० नंतर जागतिकीकरणानंतर देवी देवतांचे अधिक महत्व वाढले. त्यामुळे पुण्यातील पूर्वी अस्तित्वात असलेल्या मंदिर - मस्जिदची संख्या पाच हजार पटींनी वाढली. पुण्यातील सोमवार, मंगळवार व रास्तापेठेत जुन्या वाहनांची खरेदी विक्री केली जाते. त्यामुळे त्यांच्या धंद्यासाठी रस्त्यावरच साईबाबा, स्वामी समर्थ व गजानन महाराज व गणपतीची मंदिर उभी करण्यात आली. पुण्यातील ५०० ते ६०० झोपडपट्यांमध्ये तर एका एका गल्ली बोळात विविध देवी देवतांची मंदिर, मस्जिद व इतर धर्मियांची प्...
राज्यातील ७ हजार कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड

राज्यातील ७ हजार कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड

सामाजिक
पुणे/दि/ केंद्र सरकारने बाजार समित्या बरखास्त करण्याचे धोरण अवलंबिले आहे. ‘ई-नाम’वर व्यवहार करण्यासाठी पावले उचलली आहेत. मात्र, बाजार समित्या बरखास्त करून शेतकर्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था व राज्यातील सुमारे ७ हजार बाजार समित्यांच्या कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळणार आहे. बाजार समित्यांमध्ये ‘ई-नाम’सारखी नवीन योजना आणून सुधारणा गरजेची आहे. मात्र, बरखास्त केल्यानंतर कोणती बाजार व्यवस्था अस्तित्वात येणार, याबाबतचे गैरसमज दूर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. शेतकर्‍यांच्या मालाची लुबाडणूक होऊ नये, त्याच्या मालाला योग्य किंमत मिळावी, किंमत मिळण्यासाठी लिलाव पद्धतीत स्पर्धा व्हावी, शेतकर्‍यांच्या मालाचे पसे मिळण्याची हमी देता यावी, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा १९६४ मध्ये करण्यात आला. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी १९६७ मध्ये झाली. या बाज...
केंद्र सरकारच्या नोकर्‍यांमधील  ७ लाख पदे रिक्त

केंद्र सरकारच्या नोकर्‍यांमधील ७ लाख पदे रिक्त

शासन यंत्रणा
नवी दिल्ली/दि/ गेल्या वर्षी १ मार्च रोजीच्या स्थितीनुसार, केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये मिळून सुमारे ७ लाख पदे रिक्त होती, अशी माहिती गुरुवारी राज्यसभेत देण्यात आली. एकूण ६ लाख ८३ हजार ८२३ पदांपैकी, ५७४२८९ पदे गट ‘क’ मधील, ८९६३८ पदे गट ‘ब’मधील, तर १९८९६ पदे गट ‘अ’ मधील आहेत. १ मार्च २०१८ रोजीची ही आकडेवारी आहे, असे कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. संबंधित विभागांनी उपलब्ध करून दिलेल्या या आकडेवारीच्या आधारे कर्मचारी निवड आयोगाने २०१९-२० या वर्षां १०५३३८ पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली असल्याचेही सिंह म्हणाले. नव्या, तसेच येत्या दोन वर्षांमध्ये उद्भवणार्या रिक्त जागा लक्षात घेऊन २०१७-१८ या वर्षांत रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे निवड मंडळ यांनी गट ‘क’ आणि स्तर-१ मिळून एकूण १२७५७३ रिक्त जागांसाठी केंद्रीकृत भरती अ...
महाराष्ट्रातील सत्तेची लंगडीपानी… राजकारण घाला चुलीत…

महाराष्ट्रातील सत्तेची लंगडीपानी… राजकारण घाला चुलीत…

राजकीय
महाराष्ट्रात सध्या सत्तेची लंगडीपानी सुरू आहे. सत्तेची आंधळी कोशिंबीर सुरू आहे. आमदारांना पोरींसारखं इकडुन तिकडं हॉटेलात पाठवलं जात आहे. कधी कोण पळुन जाईल आणि दुसर्‍याबरोबर निकाह करतील ह्याचा काही भरवसा देता येत नसल्याने सर्वजण आमदारांवर लग्नाच्या पोरीसारखं लक्ष देवून आहेत. तिकडं अजितरावांनी मी राष्ट्रवादीतच आहे, नव्हे ती राष्ट्रवादी कॉंग्रेस आहे अस्सं दणकुण सांगितलं आहे. कधी कधी अस्सं वाटतय की, ही खेळी शरद पवार यांची तर नाहीये ना… पण काहीच उत्तर मिळत नाहीये… सध्या राज्यात काही ठिकाणी ओला दुष्काळ पडला आहे तर काही ठिकाणी कोरडा दुष्काळ आहे. शेतकर्‍यांच्या हातातुन पिक निघुन गेले आहे. तिकडे बाजारात भाज्यांसहीत कडधान्याचे भाव वाढत आहेत. व्यापारी साठा करण्याच्या तयारीत आहेत. पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष नेमकं कुठं चाललयं हेच समजत नाहीये. पुण्यातील बाजारपेठांमध्ये धान्याची आवक होत आहे,...
बुधवार व शुक्रवार पेठा हे तर पुणे शहराचं हार्ट- आगरवाल टोळी ही तर विजापुरच्या आदिलशहापेक्षाही भयंकर

बुधवार व शुक्रवार पेठा हे तर पुणे शहराचं हार्ट- आगरवाल टोळी ही तर विजापुरच्या आदिलशहापेक्षाही भयंकर

सर्व साधारण
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/ पुणं शहर हे मूळातच एक सुंदर शहर आहे. एकापेक्षा एक वेगवेगळे वाडे आणि त्यांची रचना, वेगवेगळी आखिव- रेखिव मंदिर, वेगवेगळे दर्गा आणि मस्जिद, चर्च ह्यांची देखील एक सुंदर रचना आहे. प्रत्येक वाड्यात आखिव- रेखीव सुंदर पाण्याच्या विहीरी आहेत. मुळा मुठा नदीवर एक राजा महाराजांची वेगवेगळी बघण्यासारखी समाधीस्थळ आहेत. रस्त्यांची सुबक रचना. तसेच बाजारपेठांचं एक वेगळं अस्तित्व आहे. पुणं शहर भलं मोठ्ठं झालं तरी मंडई, लक्ष्मी रोड वर आल्याशिवाय पुणेकरांचा एक दिवसही जात नाही. निदान सणावाराला तरी पुणेकर ह्या रस्त्यावर येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या पुण्याची मुहूर्तमेढ सोन्याचा नांगर फिरवुन, पुनवडीला पुण्यनगरीचं स्थान निर्माण केलं आहे. अशा ह्या पुणे शहरावर मोघलांसह ब्रिटीशांनी देखील आक्रमणे केली, परंतु पुणे शहर हादरलं नाही, घाबरलं नाही. पानशेतच्या प्रलयानंतर २०११ पासून प...
राज्यातील शिक्षण संस्था ‘ईडी’च्या रडारवर

राज्यातील शिक्षण संस्था ‘ईडी’च्या रडारवर

सामाजिक
ed पुणे/दि/ राज्यातील खासगी शिक्षण संस्था, विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी २०१० ते २०१७ दरम्यान केलेल्या शिष्यवृत्ती वितरणामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या संशयामुळे राज्यातील शिक्षण संस्था अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आल्या आहेत. राज्यातील शिक्षण संस्थांकडून आर्थिक व्यवहाराचा तपशील मागवण्यात आला असून, त्यासाठी १४ नोव्हेंबपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शिक्षण संस्थांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी ईडीकडून होणार असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेष तपास पथकाकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीकडून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाला शिक्षण संस्थांकडून आर्थिक व्यवहाराची माहिती मागवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार शिक्षण संस्थांकडून माहिती मागवण्यात आली आहे. माहिती मागवण्यात आलेल्या संस...
कुपोषणप्रश्‍नी सरकार उदासीन!  ‘शून्य मृत्यू’ हेच सरकारचे लक्ष्य हवे, हायकोर्टाने सुनावले

कुपोषणप्रश्‍नी सरकार उदासीन! ‘शून्य मृत्यू’ हेच सरकारचे लक्ष्य हवे, हायकोर्टाने सुनावले

शासन यंत्रणा
kuposhan maharashtra मुंबई/दि/ मेळघाट कुपोषणप्रकरणी संबंधित अधिकारी समाधानकारक उत्तरे देऊ शकत नसल्याने उच्च न्यायालयाने मंगळवारी भाजप व शिवसेनेला टोला लगावला. ‘मृत्यूचे प्रमाण घटविणे, हे लक्ष्य नाही. एका मुलाचा मृत्यू होणे, हीसुद्धा दुर्दैवी बाब आहे. ‘शून्य मृत्यू’ हेच सरकारचे लक्ष्य हवे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे,’ असे न्यायालयाने यावेळी म्हटले. सध्या काळजीवाहू (सरकार) व्यवस्था असल्याने अधिकार्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. सर्वाधिक आमदार निवडून आलेला पक्ष व त्यांच्या मित्रपक्षाला सरकार स्थापनेबाबत अद्याप निर्णय घ्यायचाच आहे, असा टोला न्यायालयाने भाजप व शिवसेनेला लगावला. मेळघाट व अन्य दुर्गम भागातील कुपोषणाबाबत उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठापुढे ह...
निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना नोकर्‍याच मिळू शकणार नाहीत!

निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना नोकर्‍याच मिळू शकणार नाहीत!

सामाजिक
Unemployment पुणे/दि/प्रतिनिधी/ २०३० साली जवळपास निम्म्याहून अधिक दक्षिण आशियाई विद्यार्थी हे कौशल्याच्या अभावी नोकरी मिळण्यास अपात्र ठरणार असल्याचा धक्कादायक अंदाज युनिसेफ संस्थेने वर्तवला आहे. युनिसेफच्या प्रमुख हेंद्रिटा फोर यांनी ही माहिती दिली आहे. दररोज दक्षिण आशियायी देशांमधून सुमारे १ लाख तरुण हे नोकरी वर्तुळात आशेने प्रवेश करतात. आधीच जागतिक मंदीमुळे दक्षिण आशियातले देश कठीण कालखंडातून जात आहेत. सध्या या देशातले हजारो तरुण बेरोजगारीला तोंड देत आहेत. त्यातच भविष्यात देशातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य अभावामुळे होणारे नुकसान मोठे असणार आहे. फोर यांच्या मते,कुशल तरुणांच्या कौशल्याचा परिणाम हा थेट त्या देशाचा आर्थिक विकासावर होतो. भारतात सध्या अशा तरुणांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यातही बेरोजगारीचा अधिक फटका बसू शकतो असा इशाराही यात देण्यात आलेला आह...
सायबर गुन्ह्यांत महाराष्ट्र दुसरा, एनसीआरबीची आकडेवारी

सायबर गुन्ह्यांत महाराष्ट्र दुसरा, एनसीआरबीची आकडेवारी

पोलीस क्राइम
Police mahasanchalak mumbai पुणे/दि/ प्रतिनिधी/ उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात करण्यात आल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) २०१७ मधील आकडेवारीवरून समोर आले आहे. महाराष्ट्रात २०१७ मध्ये ३६०४ आणि २०१६ मध्ये २३८० सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. उत्तर प्रदेशात याच वर्षांत अनुक्रमे ४९७१ आणि २६३९ सायबर गुन्हे नोंदवण्यात आले. महाराष्ट्रात मागील सहा वर्षांत दाखल झालेल्या १० हजार ४१९ सायबर गुन्ह्यांमधील ७० टक्के प्रकरणांचा गुंता अद्याप सुटलेला नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे केवळ ०.३ टक्के गुन्ह्यांमध्येच दोषींना शिक्षा झाली आहे. महाराष्ट्र पोलिस दलाच्या आकडेवारीनुसार २०१२ ते २०१७ या कालावधीत राज्यात १० हजार ४१९ सायबर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी तब्बल ७२५२ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. या काळात २०७९ गुन्ह्या...