Tuesday, May 13 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी दोन अभियंते निलंबित, लाखनीची खातेनिहाय चौकशी

धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी दोन अभियंते निलंबित, लाखनीची खातेनिहाय चौकशी

सर्व साधारण
उपायुक्त जयंत भोसेकरांकडून होत होती पाठराखण, अखेर गिते आणि परदेशी निलंबित….,रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्रच्या पाठपुराव्याला यश पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण /धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाकडील निविदा कामात झालेल्या भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांनी केलेल्या तक्रार अर्जांवर चौकशी होवून, अखेर शाखा अभियंता अजय परदेशी आणि कनिष्ठ अभियंता गणेश गिते यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच उपअभियंता कन्हैयालाल लाखनी यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिले आहेत. धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाने माहे २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षांच्या कालावधीत निविदा कामांमध्ये कमालिचा भ्रष्टाचार करण्यात आलेला होता. कामे न करताच बिलांची वसूली करण्यात येत होती. एका ठिकाणी कामाचे क्षेत्र दाखवुन दुसर्‍या ठिकाणी कामे ...
अबबऽऽ कचराच कचरा… गणेश पेठ दुधभट्टी, सदा सर्वदा कचराच कचरा

अबबऽऽ कचराच कचरा… गणेश पेठ दुधभट्टी, सदा सर्वदा कचराच कचरा

शासन यंत्रणा
पुण्यातील मध्यवर्ती पुणे शहरातील गणेश पेठ येथील दुध भट्टी जवळील नाल्यावर कचरा, नाल्यात कचरा, पुलावर कचरा, सगळीकडे कचर्‍याचे ढिग दिसून येतात. पुणे महापालिकेने व्यापार्‍यांना विनंती करून कचरा टाकण्यास मनाई करणारा फलक लावला असून त्याकडे कुणाचेही लक्षच नसते. आता कचरा टाकणार्‍यांवर आणि कचरा होऊ देणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारल्या शिवाय कचर्‍याची समस्या सुटणार नाही....
ST कर्मचार्‍यांच्या संपावर  Media गप्प का?

ST कर्मचार्‍यांच्या संपावर Media गप्प का?

राजकीय
कर्मचार्‍यांचा संप माध्यमांनी जास्त कव्हर का केला नाही, माध्यमांची नेमकी काय भूमिका आहे. जवळपास सर्वच माध्यमे गोदी मिडिया आहेत, ही माध्यमं जनसामान्यांचे प्रश्न का कव्हर करत नाहीत. एस टी कर्मचारी जीवाच्या आकांताने लढतोय, मग माध्यमांना त्यासाठी जागा का द्यावीशी वाटत नाहीय. माध्यमांचं नेमकं काय चुकतंय. आर्यन खान साठी दहा बारा टीम लावणारी माध्यमे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी कमी का पडतायत?जीवावर उदार होऊन एसटी कर्मचारी शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी आंदोलन करत आहेत. नक्कीच माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक पार पडली. राज्य शासनाने यापूर्वीही महामंडळाचे शासकीय विलीनीकरण शक्य नसल्याची भूमिका घेतली आहे.कार्यकर्ते एसटी कर्मचार्‍यांच्या इतर मागण्या मान्य करून हा संपवु शकतो का? प्रसार माध्यमांचे या आंदोलनाकडे दुर्लक्ष का? प्रसारमाध्यमं ज...
पगार वाढीचे गाजर नको, विलीनीकरण करा, एसटी कर्मचारी भूमिकेवर ठाम

पगार वाढीचे गाजर नको, विलीनीकरण करा, एसटी कर्मचारी भूमिकेवर ठाम

शासन यंत्रणा
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संपावर तोडगा म्हणून परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचार्‍यांच्या पगारवाढीची घोषणा केली आहे. परंतु आम्हाला पगार वाढ नको, अशी भूमिका संपकरी एसटी कर्मचार्‍यांनी घेतली आहे. विलीनीकरणचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमचा संप असाच सुरू राहील असे नंदुरबार आगारातील कर्मचार्‍यांनी सांगितले. पगार वाढ करून परिवहनमंत्री अनिल परब यांनी कर्मचार्‍यांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील काही संघटनांना हा निर्णय मान्य आहे परंतु राज्यातील सर्व कर्मचारी एकत्र असून हा संप कर्मचार्‍यांचा आहे, कुठल्या संघटनेचा नाही अशी भूमिका या कर्मचार्‍यांनी मांडली आहे. राज्यातील सर्व कर्मचारी एकत्र असून पगारवाढीचा निर्णय आम्हाला अमान्य असून जोपर्यंत विलिनीकरणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कर्मचार्‍याचा संप असाच सुरू राहिल असा निर्धार या कर्मचार्‍यांनी केला आहे....
पेठेपुणे शहरातील रास्ता-सोमवार त अनाधिकृत बांधकामांचा धडाका,बांधकाम नियमांची एैशी की तैशी – पैसे फेको तमाशा देखा…

पेठेपुणे शहरातील रास्ता-सोमवार त अनाधिकृत बांधकामांचा धडाका,बांधकाम नियमांची एैशी की तैशी – पैसे फेको तमाशा देखा…

सर्व साधारण
पुणे महापालिकेचं बांधकाम विभाग पुणेकरांच्या जीवावर उठलय…अबबऽऽ… दीड गुंठ्यावर ११ मजली इमारतधन्य ते पुणे महापालिकेचे बांधकाम विभाग… पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे शहरातील जुने वाडे आणि अंतर्गत रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लोकसंख्या वाढली परंतु अंतर्गत रस्त्यांची लांबी आणि रूंदी आहे तेवढीच आहे. त्यामुळे बांधकाम नियमानुसार रस्तारूंदी क्षेत्र सोडून बांधकामांना परवानगी देण्यात येत असली तरी, नियमानुसार कुणीही बांधकाम परवानगी घेत नाही. बांधकाम व्यावसायिक रस्तारूंदी क्षेत्र शून्य ठेवून अनाधिकृत बांधकामे करीत आहेत. मध्यवर्ती पुण्यातील रास्तापेठ व सोमवार पेठेत सध्या दर आठवड्याला एक स्लॅब पडत आहे, दिवस-रात्र बांधकामे केली जात आहेत. तरी देखील बांधकाम विभागातील अभियंते अनाधिकृत बांधकामांना अटकाव न करता बघ्याची भूमिका घेत आहेत. तक्रार अर्जांवर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. स...
पतीचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी पत्नीचा राडा, २०० कोटीचा गैरव्यवहार – शासकीय कामातील अडथळा आणल्याचे प्रकरण दडपून टाकण्याचे पुणे महापालिकेतील अधिकार्‍यांचे प्रयत्न

पतीचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी पत्नीचा राडा, २०० कोटीचा गैरव्यवहार – शासकीय कामातील अडथळा आणल्याचे प्रकरण दडपून टाकण्याचे पुणे महापालिकेतील अधिकार्‍यांचे प्रयत्न

सर्व साधारण
कनिष्ठ अभियंत्यांची बदली… हाकलपट्टी की प्रकरण दाबुन टाकण्यासाठी करण्यात आलेले नाटक….. पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/माहितीच्या अधिकारात अपिल सुनावणी सुरू असतांना, कनिष्ठ अभियंत्यांच्या पत्नीने प्रथम अपिल सुनावणीत अर्जदाराला धक्का मारल्याचा बहाणा करून, त्यांना शासकीय कार्यालयात गलिच्छ शिवीगाळ करून चल इथून निघुन जा म्हटल्याचे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले आहे. पतीचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी पत्नीने पुणे महापालिकेत राडा घातल्याने सगळीकडे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत अर्जदार श्री. दीक्षित यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे महापालिकेकडे करण्यात आलेली असतांना, आज एक आठवडा उलटून गेला तरी कनिष्ठ अभियंत्याच्या बदलीखेरीज कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने, पत्नीचे राडा प्रकरण दाबुन टाकण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. रामचंद्र शिंदे यांची बदली ...
मोदीजी आणि भाजप नेते माफी मागणार का?

मोदीजी आणि भाजप नेते माफी मागणार का?

राजकीय
शेतकर्‍यांच्या लढ्यापुढे सपशेल माघार घेत पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी माफी मागत असल्याचेही सांगितले. शेतकर्‍यांपुढे सरकारने माघार घेतल्याची ब्रेकिंग न्यूज सर्वत्र चालली…. शेतकर्‍यांनी, विरोधी राजकीय पक्षांनी जल्लोष केला, तर भाजपचे नेते मोदींच्या माघार घेण्याला ग्लॅमर मिळवून देण्याच्या प्रयत्नात दिसले. पण एकीकडे शेतकर्‍यांना समजावण्यात आम्ही कमी पडलो असे म्हणणार्‍या मोदींनी याच शेतकर्‍यांनी आंदोलनजीवी म्हटले होते, त्याबद्दल ते माफी मागणार का, हा प्रश्न आहे.केवळ मोदीच नाही तर भाजपच्या अनेक नेत्यांनी आंदोलक शेतकर्‍यांवर असभ्य टीका करण्यापासून ते त्यांना दहशतवादी ठरवण्यापर्यंत वक्तव्य केली होती. यापैकी काही वक्तव्ये खालील प्रमाणे * पंतप्रधान नरेंद्र मोदी -शेतकरी आंदोलनामागे आंदोलनजीवी नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय कृषीमंत्री - गर्दी जमली म्...
समीर वानखेडे हिंदू की मुस्लिम? बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला दाखला

समीर वानखेडे हिंदू की मुस्लिम? बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला दाखला

सामाजिक
मुंबई/दि/छउइ चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी धर्म लपवून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे समीर वानखेडे संकटात सापडले असताना आता वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी मात्र समीर वानखेडे हे कायदेशीर दृष्ट्या अडचणीत येऊ शकत नाहीत, असे मत व्यक्त केले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा दाखला दिला आहे. समीर वानखेडे यांनी वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर वडिलांचा मुस्लीम धर्म न स्वीकारता वडिलोपार्जित हिंदू धर्म स्विकारल्याचं दिसते आहे, समीर वानखेडेंबाबत आपण माध्यमांमधून जे वाचतो आहे त्याचा विचार केला तर प्रमाणपत्र रद्द होईल असे वाटत नाही असे बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर यांनी म्हटले आहे.मुलगा किंवा मुलगी सज्ञान होईपर्यंत म्हणजेच वयाच्या १८ वर्षांपर्यंत आई-वडील यांच्या ताब्यात असतात. त्या...
देखभालीसाठी ५८ कोटी – सर्वच राजकीय पक्ष व नगरसेवकांचे मिले सुर मेरा तुम्हारा

देखभालीसाठी ५८ कोटी – सर्वच राजकीय पक्ष व नगरसेवकांचे मिले सुर मेरा तुम्हारा

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/देखभालीसाठी ५८ कोटी रुपये देणे म्हणजे पुणेकरांच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या टाकलेला हा दरोडा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणेकरांची अशी ही लुट कधीही होऊ देणार नाही त्यााठी वाट्टेल तो त्रास सहन करण्याची आमची तयारी असल्याची असल्याची राणाभिमादेवी थाटात वल्गना करणार्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेस सहित कॉंग्रेसने आजच्या सर्वसाधारण सभेत यु टर्न घेतला. कोणत्याही अडथळ्याविना ५८ कोटी ९४ लाख रुपयांची निविदा मंजुर करण्यात आली. शिवेसेनेच नगरसेवक तटस्थ राहिले तर आरडा ओरडा बहाद्दर नगरसेवक ऐनवेळी सभागृहातून गायब झाल्याने ५८ कोटी निविदेसाठी सर्वच राजकीय पक्षांचे मिले सुर मेरा तुम्हारा असल्याचे दिसून आले आहे. ५८ कोटी रुपयांच्या केवळ देखभाल निविदेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे त्याची तक्रार ईडीकडे करण्यात येणार असल्याची भाषा कालपर्यंत बोलली जात होती. मिडीया समोर देखील अशा प्रकारच्या आणाभाका ...
बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांचे कारण

बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांचे कारण

राजकीय
पुणे/दि/राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवर दहशतवादी आणि अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून एलबीएस रोडवरील ३ एकर जागा खरेदी केली असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.ऍड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री असताना मलिकांनी जमीन घेतल्याची माहिती होती. त्यावेळी त्यांनी हे प्रकरण समोर का आणले नाही? त्यांनीच कारवाई का केली नाही? आता स्वतःचं प्रकरण दाबण्यासाठीच मलिकांचे प्रकरण काढले. आपल्यावर शेकले जाते त्यावेळी त्या प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी दुसरी माहिती द्यायची. आपल्यावर झालेले आरोप दाबण्यासाठी फडणवीसांनी हे सर्व केले आहे. आता न्यायालयाची भूमिका महत्वाची आहे. न्यायालयाने फडणवीसांवर दाखल असलेले सर्व प्रकरणे निकाली काढावी, असेही आंबेडकर म्हणाले....