
पुणे महापालिका पथ विभाग व बिबवेवाडी पोलीसांचा असहकार, धार्मिक- जातीय सहिष्णुतेला तडा मुख्यमंत्र्यांकडील नगरविकास – गृहविभागाने उचललाय बदनामीचा विडा
Rajabaug-Darga
पुणे/दि/ प्रतिनिधी/
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, मॉंसाहेब जिजाऊँ यांनी अन्याय आणि अत्याचाराविरूद्ध रणशिंग फुंकले. अत्याचार करणार्यांना आणि अत्याचारी यंत्रणांना त्यांच्या तळपत्या तलवारीने कापुन काढल्याचा इतिहास आहे. शिवकाळात धर्म वा जातीभेद हा प्रकारच नव्हता. अत्याचार करणारा मुघल सैनिक आहे की, रांज्याचा पाटील. सर्वांनाच एकसमान दंड दिला. छत्रपतींच्या स्वराज्या विरूद्ध मराठे सरदार मुघलांच्या बाजूने लढत असले तरी शिवरायांच्या किल्यांची जबाबदारी ही तत्कालिन महार समाजाकडे होती. तोफखाना, दारूगोळा विभागाचे प्रमुख मुस्लिमच होते. त्याच छत्रपती शिवरायांच्या राज्याला एकसंघ कायदयाचे स्वरूप देवून भारतीय संविधान या देशात लागु झाले. कायदयाने सर्व समान झाले. परंतु इथल्या शासन यंत्रणेतील मंडळीच्या सडक्या डोक्यातून आजही उच्च-निच, भेदभाव जायला तयार नाह...