Tuesday, May 13 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई, राजकीय पाठबळ, सत्तेची हवा आणि पैशाचा माज, गुन्हेगारी अधिक वाढवित आहे

पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई, राजकीय पाठबळ, सत्तेची हवा आणि पैशाचा माज, गुन्हेगारी अधिक वाढवित आहे

पोलीस क्राइम
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुण्यात दोन वरून ३५ वर आणि ३५ वरून २०२१ मध्ये हीच गुन्हेगारी टोळ्यांची संख्या दिडशे ते २०० च्या आसपास आलेली आहे. एका टोळीतून दुसरी टोळी आणि दुसरीतून तिसरी टोळी निर्माण झाली आहे. जुने गुन्हेगार गब्बर/ कोट्यवधी/ अब्जाधीश झाले, त्यामुळे त्यांचे अनुकरणं करीत नव नवीन गुन्हेगार तयार होत राहिले, धंदयाचा कल, राजकीय वारं आणि सत्तेची हवा मिळाल्यामुळे अनेक जुन्या टोळ्यांतून नवीन टोळ्या निर्माण झालेल्या आहेत. परंतु गुन्हेगारी टोळ्या एवढ्या मोठ्या संख्येने पुण्यामुंबई सारख्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरात कशा उभ्या राहिल्या याचाही विचार होणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांना निवडणूका लढवायच्या असतात. निवडणूका जिंकण्यासाठी आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी गुन्हेगारांचा आणि गुन्हेगारी टोळ्यांचा वापर केला आहे व ते ह्यांचा वापर करीत आहेत. गुन्हेगार हे काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या...
गुन्हेगारांचे आर्थिक साम्राज्य –

गुन्हेगारांचे आर्थिक साम्राज्य –

पोलीस क्राइम
गुन्हेगारी मंडळी केवळ मटका, जुगार अड्डे, गुटखा तस्करी, अवैध विदेशी मद्याची तस्करी करतात हे खरे असले तरी त्यांचे अनेकही प्रताप आहेत. आजही राजकीय पक्षांच्या आशिर्वादाने पुण्या मुंबईतील कॉल सेंटर, मॉल, मोठ्या सोसायट्या, व्हीआयपी सोसायट्या, स्थानिक स्वराज्य संस्था, बँका, यामध्ये खाजगी सुरक्षा रक्षक, हाऊस किपिंग सारखी कामे तसेच मॉल व व्यावसायिक आस्थापनेतील स्क्रॅपचे टेंडरही याच गुन्हेगारी टोळ्यांना दिले आहे. आजकाल खाजगी फायनान्स करणार्‍या कंपन्या शेकडोंनी कार्यरत आहेत. पुण्यातही अनेक खाजगी फायनान्स कंपन्यांची कार्यालये आहेत. या खाजगी फायनान्स कंपन्या, दुचाकी वाहन खरेदी, तीन चाकी वाहन, टेम्पो, ट्रक खरेदी, घर जमिन खरेदीसाठी फायनान्स पुरविते. मात्र एखादा कर्जाचा हप्ता थकला तरी ह्याच कंपन्या दिवसात चार/पाच फोन करून कर्जदारांना धमकावित असतात. त्यांची वाहने ओढुन आणतात. टोळ्या घेवून कर्जदारांच्या घरी ...
लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुढे ढकलल्याने वंचित कडून जाहीर निषेध -आंबेडकर

लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुढे ढकलल्याने वंचित कडून जाहीर निषेध -आंबेडकर

सामाजिक
पुणे/दि/ राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलल्या आहेत. याबाबत त्यांनी कोरोना वाढत असल्याचे कारण दिले आहे. राज्य शासन श्रीमंत मराठा याला बळी पडत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी केला.राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्याने ओबीसी, एससी, एसटी या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य शासनाच्या या निर्णयाचा निषेध करीत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी कणा दाखवला पाहिजे व परीक्षा घेतल्या पाहिजे असेही आंबेडकर यांनी सांगितले....
देवेंद्र फडणवीस सरकारमुळेच मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्या’त सापडले, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस सरकारमुळेच मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्या’त सापडले, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप

राजकीय
मुंबई/दि/मराठा आरक्षण संदर्भात केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केल्यानंतरही तब्बल तीन महिने उशिरा फडणवीस सरकारने राज्यात आरक्षण कायदा मंजूर केला होता, आणि त्यामुळेच आज हा मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात सापडले असल्याचा आरोप करत सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभेत निवेदन दिले. यावेळी चव्हाण यांनी केंद्र सरकारने ऑगस्ट २०१८ मध्ये आरक्षण संदर्भात १०२ वी घटना दुरुस्ती करत, राज्य सरकारला अशा प्रकारे आरक्षण देता येणार नाही. हे स्पष्ट केले. तसेच असे आरक्षण या घटना दुरुस्तीनंतर केवळ राष्ट्रपतींना देता येते असेही स्पष्ट केले.त्यानंतर फडणवीस सरकारने आरक्षण कायदा राज्यात ३० नोव्हेंबर २०१८ मंजूर केला. मात्र, घटनादुरुस्ती आधीच केली असतानाही फडणवीस सरकारने राज्यात मराठा आरक्षण कायदा तीन महिने उशिरा संमत केला. त्यामुळे मराठा आरक्षण कायदाच्या कचाट्यात सापड...
शहरांमध्ये बेरोजगारी  २१ टक्क्यांनी वाढली

शहरांमध्ये बेरोजगारी २१ टक्क्यांनी वाढली

शासन यंत्रणा
पुणे/दि/ कोरोनाचा बाऊ करत कुठलाही विचार न करता लावण्यात आलेला लॉकडाऊन गरीबाच्या जीवावर आला असून त्याचा भीषण परिणाम समोर आला आहे. लॉकडाऊनमुळे शहरांमध्ये बेरोजगारी २१ टक्क्यांनी वाढली असा प्रकारची आकडेवारी सरकारनेच दिली आहे.लॉकडाऊनचा सर्वात मोठा परिणाम १५ ते २९ वर्षे वयोगटातील तरुण कामगारांच्या कमाईवर झाला. यातून महिलांच्या रोजगारावरही गंभीर संकट निर्माण झाले. सरकारी आकडेवारीनुसार शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण एप्रिल-जून (आर्थिक वर्ष २०१९-२०) दरम्यान २०.९ टक्क्यांनी वाढले आहे. तर जानेवारी-मार्च दरम्यान (आर्थिक वर्ष २०१८-१९) ते फक्त ९.१ टक्के होते. या सर्वेक्षणानुसार शहरांमध्ये ट्रान्सजेंडरसह पुरुषांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण २०.८ टक्के तर महिलांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण २१.२ टक्के आहे. याचा परिणाम तरुण कामगारांवर झाला. शहरांमध्ये १५ ते २९ वर्षांच्या दरम्यान बेरोजगारीचे प्रमाण ३४.७ टक्के होते....
पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

सर्व साधारण
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि परिमंडळ एकच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे यांची कारवाई -मोक्का ची मंडळी आज नाहीतर उद्या बाहेर येणार, परंतु गुन्हेगारांचे बोलाविते धनी कधी जेरबंद होणार… अवैध धंदे करणार्‍यांविरूद्ध प्रथमच मोक्का अंतर्गत कारवाई,कुटंणखान्यांवर वारंवार कारवाई करून पोलीस थकले, पण कुंटणखाने बंद होत नव्हते, आता थेटच कुंटणखाने सीलबंद केले,मध्यवर्ती शहरातील छोट्या मोठ्या टोळ्यांविरूद्ध जबरी कारवाईगुन्हेगारी टोळ्या सक्रिय होवून साम्राज्य वाढवित होत्या, एका टोळीतून दुसरी टोळी निर्माण होत होती, आता नव्या जुन्यांवर थेटच मोक्का - नवीन टोळी निर्माण होणार नाही अशा प्रकारची जबरी कारवाई पुणे/दि/ प्रतिनिधी/सन १९७४ साली प्रसिद्ध झालेला रोटी, कपडा और मकान या हिंदी चित्रपटात मनोज कुमार, अमिताभ बच्चन, शशि कपुर, मदन पुरी, प्रेमनाथ यांच्या अदाकारीने सर्वांच्या मनावर भुरळ पाडली. महँगाई मार गई हे ...
पुणे महापालिका महसुली खात्यातील लोकसेवक गव्हाणे यांच्याकडुन असहकाराचं अग्निशस्त्र

पुणे महापालिका महसुली खात्यातील लोकसेवक गव्हाणे यांच्याकडुन असहकाराचं अग्निशस्त्र

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या सीई कार्यालयासहित, पुणे महापालिकेतील संपूर्ण सेवेच्या कालावधीत शंभर टक्के काळ हा टेबलवर्क कामांसाठी ज्यांनी खर्ची पाडला, ते कार्यकारी अभियंता श्री. रोहितदास गव्हाणे यांच्याकडे बांधकाम विकास विभागातील महत्वाचे विभाग देण्यात आले आहेत. बांधकाम विभागातील क्र. १ व ४ ची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. टेबल वर्क आणि फिल्ड वर्क मधील ज्यांना फरक कळत नाही, त्यातील श्री. गव्हाणे यांचा क्रमांक अगदी वरचा लागत असल्याचा अंदाज आहे. त्यांच्या विभागातील बहुतांश लोकसेवक कर्मचार्‍यांविरूद्ध त्यांचा राग असल्याचा अविर्भाव त्यांच्यात दिसून येत आहे. त्यांच्या अख्त्यारितील अभियंते कामच करीत नाहीत. ते एकटेच काम करतात असा त्यांना आभास निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांचे वर्तन एखाद्या सरावलेल्या गुन्हेगारासारखे असून, पुणे महापालिकेतील लोकसेवक कर्मचार्‍यांना गोडीत ढोस देण्यात त्य...
ओबीसींच्या जागांवर घाला घालण्याचं काम सरकारने केलं

ओबीसींच्या जागांवर घाला घालण्याचं काम सरकारने केलं

सामाजिक
मुंबई/दि/शासनाने १८ फेब्रुवारीला एक आदेश काढला. ज्यामध्ये आरक्षणाचा कोणताही विचार न करता १०० टक्के जागा भरल्या जातील, असं म्हटलं. म्हणजेच आरक्षित ३३ टक्के जागांवर घाला घालण्याचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं पर्यायने महाविकास आघाडीने केलं, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. सरकार जाणीवपूर्वक ओबीसींवर अन्याय करतंयमहाविकास आघाडीला गोर गरीब, दीन दुबळ्या मागासवर्गीय लोकांवर अन्याय करायचाय. नुसतंच एवढचं करुन थांबायचं नाही तर त्यांना तो अन्याय जाणीवपूर्वक करायचाय. मंत्रिगटाची एक बैठक होते. १६ तारखेला एक निर्णय येतो आणि लगेच १८ तारखेला दुसरा निर्णय मागासवर्गीयांच्या विरोधात येतो, याला जाणीवपूर्वक म्हणायचं नाही तर आणखी काय म्हणायचं?, असा सवाल पडळकर यांनी विचारला.संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मागासवर्गीयांना पदोन्नती दिली जात नाहीमहापुरुषांच्या नावानं राजकारण करणारे सरकार मागासवर्गीं...
देवेंद्र फडणवीसांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचा खळबळजनक दावा करणारा गजाआड

देवेंद्र फडणवीसांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचा खळबळजनक दावा करणारा गजाआड

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचा दावा करणार्‍या पिंपरी चिंचवड येथील युवराज दाखले या व्यक्तीस वाकड पोलिसांनी अटक केली आहे. फडणवीस यांनी तृतीयपंथीय व्यक्तीस खोटे आश्वासन देऊन त्याच्याशी समलैंगिक संबंध ठेवले, असा खळबळजनक दावा युवराज दाखले या व्यक्तीने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत केला होता. या व्हिडीओमुळे राज्यात खळबळ उडाली होती. विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले होते.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना एका तृतीयपंथी व्यक्तीस खोटे आश्वासन देऊन त्याच्याशी समलैंगिक संबंध ठेवले, असा दावा युवराज दाखले या व्यक्तीने पोस्ट केलेल्या व्हिडीओत केला होता.हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र राजकीय पडसादही उमटले होते. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या सदस्या कोमल शिंदे या...
देशातील आंदोलनांना दाबण्यासाठी २०२० मध्ये भारतात १०९ वेळा इंटरनेट शटडाऊन

देशातील आंदोलनांना दाबण्यासाठी २०२० मध्ये भारतात १०९ वेळा इंटरनेट शटडाऊन

शासन यंत्रणा
पुणे/दि/इंटरनेट लोकांचा अविभाज्य अंग बनला आहे. कारण इंटरनेटद्वारे जगातील कुठलीही बाब पाहू शकतो किंवा माहिती मिळवू शकतो. परंतु केंद्र सरकारने माहिती अधिकारावरच गदा आणत लोकांना माहितीपासून वंचित ठेवले. देशातील आंदोलनांना दाबण्यासाठी २०२० या मध्ये भारतात १०९ वेळा इंटरनेट शटडाऊन करण्यात आले होते. देशात विविध ठिकाणी अनेक मुद्यांवर केंद्र सरकारविरोधात आंदोलने होत होती. ही आंदोलने होऊ नये त्यांना माहितीची अदान-प्रदान होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. परंतु हिंसक आंदोलने होत असल्याचा कांगावा करत सेवा खंडीत करण्यात आली होती. एका अहवालानुसार, २०२० मध्ये इंटरनेट खंडीत करण्यात आलेल्या २९ देशांच्या यादीत भारताने अव्वल स्थान गाठले आहे. सर्वाधिक अशा घटना भारतात घडल्या आहेत. त्याचबरोबर मध्य-पूर्वेतील काही देश आणि आफ्रिकेच्या काही भागांचा या यादीमध्ये समावेश आहे.डिजिटल राइट्स अँड प्रायव्...