
भाजप सरकारचा देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्नः आ. शरद रणपिसे
Congress-vardhapan-din
मुंबई/दि/ कॉंग्रेस पक्षाने इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त केले व देशात लोकशाहीची बीजे रोवून ती बळकट केली. पण विद्यमान भाजप सरकार देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला पराभूत करून देशाचे संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी कॉंग्रेस पक्ष कटिबद्ध आहे असे प्रतिपादन विधान परिषदेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे यांनी केले.
कॉंग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापनादिनामित्त आज महाराष्ट्र प्रदेश मुख्यालय टिळक भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. रणपिसे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, विद्यमान सरकारच्या काळात देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे. जाती- जातीत, धर्मा-धर्मात तेढ वाढवून दंगली घडवल्या जात आहेत. राजकीय फायद्यासाठी ध्रुवीकर...