Saturday, August 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Author: national forum

भाजप सरकारचा देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्नः आ. शरद रणपिसे

भाजप सरकारचा देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्नः आ. शरद रणपिसे

राजकीय
Congress-vardhapan-din मुंबई/दि/  कॉंग्रेस पक्षाने इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त केले व देशात लोकशाहीची बीजे रोवून ती बळकट केली. पण विद्यमान भाजप सरकार देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला पराभूत करून देशाचे संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी कॉंग्रेस पक्ष कटिबद्ध आहे असे प्रतिपादन विधान परिषदेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे यांनी केले.       कॉंग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापनादिनामित्त आज महाराष्ट्र प्रदेश मुख्यालय टिळक भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. रणपिसे बोलत होते.       ते पुढे म्हणाले की, विद्यमान सरकारच्या काळात देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे. जाती- जातीत, धर्मा-धर्मात तेढ वाढवून दंगली घडवल्या जात आहेत. राजकीय फायद्यासाठी ध्रुवीकर...
राज्यातील १२ हजार कोतवाल दीड महिन्यापासून संपावर, शासनस्तरावर मात्र बेदखल

राज्यातील १२ हजार कोतवाल दीड महिन्यापासून संपावर, शासनस्तरावर मात्र बेदखल

शासन यंत्रणा
Kotwal Samp नांदेड / वृत्तसेवा/  महसूल विभागात गावकामगार म्हणून काम करणारे कोतवाल गेल्या दीड महिन्यापासून संपावर गेले आहेत. मात्र, अद्यापही शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कोतवाल कामगारातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासनाने दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी केली जात आहे.       गाव कामगार म्हणून कोतवालांचा समावेश होतो. रोजगार मिळत नसल्यामुळे कोतवाल म्हणून उच्चशिक्षित तरूण काम करत आहेत. त्यांना मिळणारे मानधन अल्प असून या मानधनातून कुटुंबाचा गाडा कसा हाकावा? असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. शेतावर तसेच इतर ठिकाणी काम करणार्‍या कामगारांना ३०० ते ५०० रुपये मिळते. मात्र, कोतवालांना १६० रूपये रोज मिळतो. या कोतवालांकडून महसूल प्रशासन विविध कामे करून घेत असतात. यामध्ये टपाल वितरण करणे, तलाठी, मंडळ अधिकारी यांना कामात सहकार्य करणे, तहसील...
कॉंग्रेसला मुस्लिमांची मते हवी, नेते नको-आंबेडकर

कॉंग्रेसला मुस्लिमांची मते हवी, नेते नको-आंबेडकर

राजकीय
Prakash-Ambedkar अकोला/दि/  मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न कॉंग्रेसने निरंतर प्रलंबित ठेवला आहे. कॉंग्रेसला मुस्लिमांची मते हवी आहेत. मात्र, त्यांना मुस्लिमांचे नेते नको आहेत, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला. अकोला येथे मुस्लीम आरक्षण महामोर्चादरम्यान ते बोलत होते.       कॉंग्रेस मुस्लिमांचा फक्त निवडणुकीसाठी उपयोग करीत आहे. त्यामुळे त्यांना १९ टक्के आरक्षण देण्यासाठी कॉंग्रेसने कुठलीच पावले उचलली नाही. मुस्लीम आरक्षणासाठी लढा उभा केलेला आहे. वंचित आघाडीच्या माध्यमातून मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले. राज्य सरकारने मराठा आरक्षण दिले. मात्र, १९ टक्के असलेल्या मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदरांनी कुठलाच दबाव आणला नसल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी कॉ...
फडणवीस सरकारचा स्चच्छतेचा बुरखा टराटर्रर्र फाटला..

फडणवीस सरकारचा स्चच्छतेचा बुरखा टराटर्रर्र फाटला..

सर्व साधारण
Tukaram-Mundhe-Transfer कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकार्‍याची एड्स नियंत्रण सोसायटीतील दुय्यम दर्जाच्या कार्यालयात पाठवणी मुंबई/दि/ प्रतिनिधी/        कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रियतेसोबतच भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्यासाठी कायम चर्चेत राहणार्‍या तुकाराम मुंढे यांची शासनाने पुन्हा एकदा बदली केली आहे. मुंढे यांच्यासह शासनाकडून इतर ३ अधिकार्‍यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली यांचीही आज बदली करण्यात आली. उगले यांच्याकडे नागपूर प्रदेश प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर रुबल अगरवाल यांची पुणे महापालिका आयुक्तपदी  तर बालाजी मंजुळे यांची पुणे अपंग कल्याण विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.       एक महिन्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची नाशिक...
खुल्या प्रवर्गात आता दलित- ओबीसी उमेदवारांनाही संधी

खुल्या प्रवर्गात आता दलित- ओबीसी उमेदवारांनाही संधी

सामाजिक
SC-OBC-Promotion मुंबई/दि/ समांतर आरक्षणावरून सुरू असलेला गोंधळ व संभ्रम अखेर राज्य सरकारने बुधवारी (ता. १९) दूर केला. खुल्या प्रवर्गात समाजातील सर्वच गुणवत्ताधारक उमेदवारांना संधी दिली मिळणार आहे. याबाबत राज्य सरकारने बुधवारी जीआर काढला आहे. या निर्णयामुळे एससी, एसटी, एनटी व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेश व सरकारी नोकरीत संधी मिळणार आहे.       ऑगस्ट २०१४ मध्ये सरकारने जीआरद्वारे बदल करताना खुल्या प्रवर्गातील जागांवर दलित व मागास जातील उमेदवारांना आरक्षित प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेश अथवा नोकरी हवी असल्यास ती मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यानुसारच राज्य लोकसेवा आयोगाने आपल्या भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टासह सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिक...
सडक्या मेंदूतील बावचळलेले…

सडक्या मेंदूतील बावचळलेले…

पोलीस क्राइम
Police SP Mrs. Navrtake. पुणे/दि/ प्रतिनिधी/       आरक्षणाचा आणि ऍट्रॉसिटीचा राग आम्ही दलितांवर काढतो असं सांगणार्‍या भाग्यश्री नवटाके सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहेत. नवटाके जे काही बोलल्या हे त्यांच्यावर लहानपणापासून झालेल्या कु-संस्काराबरहुकूमच बोलतायत. त्या जे काही बोलल्या हा त्यांचा कबुली जबाब मानून त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. एरवी, सोशल मिडीयावर सतत व्हायरल असणार्‍या सरकारच्या कानावर अजून ही गोष्ट पडली नाही आणि नवटाके यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही, त्यामुळे त्यांच्या एकूण बोलण्याला सरकारचं समर्थन तर नाही ना अशी शंका उपस्थित झाली आहे.       नवटाके जे काही बोलल्या त्यात खोटं काहीच नाही. पत्रकार सुहास बिर्‍हाडे यांनी त्यांच्या फेसबुक वॉल वर एका अधिकार्‍याचं वक्तव्य पोस्ट केलंय. बिर्‍हाडे म्हणतात की सध्या पुण्यात पोस्...
शेतकर्यांना कर्जमाफी आणि मेगा भरती म्हणजे राजकीय पक्षांची एक गाव अन् बारा भानगडी

शेतकर्यांना कर्जमाफी आणि मेगा भरती म्हणजे राजकीय पक्षांची एक गाव अन् बारा भानगडी

सर्व साधारण
शेतकर्यांना कर्जमाफी आणि मेगा भरती * शासनातील ७० टक्के पदे कंत्राटी तत्वावर भरण्याचा शासनाचा निर्णय...!!! * शासनात ६० व्या वर्षी रिटायर्ड झाल्यानंतर पुन्हा ५ वर्ष शासनात कंत्राटी तत्वावर नियुक्ती होणार... म्हणजे ६५ वर्षापर्यंत नोकरीत कायम राहणार..! * बेरोजगारांच्या मेगा भरतीचं गाजर दाखवलंय..! * पण जिथं ७० टक्के पदं कंत्राटी तत्वावर भरण्याचे शासनादेश असतांना, मेगा भरती करून, शासनात कायम नोकरी देणार की ११ महिन्यांच्या नोकरीचे गाजर देवून बेरोजगारांचे हसे करणार..!?* भाजपाने सत्तेत येण्यापूर्वी शेतकर्‍यांना कर्जमाफीचे आश्‍वासन दिले होते, कर्जमाफीचा बट्टयाबोळ काय झालाय हे सर्वांना ठाऊक आहे. आता कॉंग्रेसही शेतकर्‍यांना कर्जमाफीचे आश्‍वासन देत आहे..!! त्यांनी शेतकर्‍यांना कारल्याचा ज्युस पाजलाय, कॉंग्रेसवाले आता काय शेतकर्‍यांना दोडक्याचा ज्यूस पाजून, दोन्ही पक्ष शेतकरी आणि बेरोजगारा...
केंद्राचा अजेंडा आरएसएसचाच उपेंद्र कुशवाह यांना सुचले उशिरा शहाणपण

केंद्राचा अजेंडा आरएसएसचाच उपेंद्र कुशवाह यांना सुचले उशिरा शहाणपण

राजकीय
Upendra-Kushwah पुणे: विकासाच्या अजेंड्यावर सरकार असेल, अशी चर्चा केली गेली. मात्र सरकार आल्यावर विकासाऐवजी भाजपने त्यांचा अजेंडा राबविण्यास सुरुवात केली. त्यांचा अजेंडा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. तो आमच्यासाठी नव्हे, तर देशातील लोकांसाठीही योग्य नाही.त्यामुळे सरकारमधून बाहेर पडलो अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेले बिहारमधील ’राष्ट्रीय लोक समता पार्टी’चे नेते उपेंद्र कुशवाह यांनी केली.       छगन भुजबळ यांच्यासमवेत कुशवाह यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे कुशवाह विरोधकांच्या गोटात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत कुशवाह म्हणाले, पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भेटलो. भुजबळ गेल्या १२ वर्षांपासून माझे मित्र आहेत. भुजबळ यांच्याशी कौटुंबिक संबंध असून, राजकारणात त्यांचे ...
शंभरातून एकाच युवकाला नोकरी, राज्य मागासवर्ग आयोगाचाच अहवाल

शंभरातून एकाच युवकाला नोकरी, राज्य मागासवर्ग आयोगाचाच अहवाल

सामाजिक
Maharashtra -Backward-class-commission-Pune नागपूर: राज्यात वर्षाला फक्त पाच टक्केच नोकर भरती होत असून शंभर पात्र युवकांमधून फक्त एका युवकालाच सरकारी नोकरी मिळते. राज्य मागासवर्गीय आयोगानेच आपल्या अहवालात याचा उल्लेख केला असल्याने आरक्षित आणि आरक्षणासाठी झटणार्‍या समाजाला प्रत्यक्षात काहीच फायदा होत नसल्याचे यावरून स्पष्ट होते.       अलीकडेच राज्य सरकारने मराठा समाजाला सोळा टक्के स्वतंत्र आरक्षण दिले आहे. धनगर, परीट, हलबा समाज अनुसूचित जातीच्या आरक्षणासाठी झटत आहे. ओबीसीमध्ये साडेतीनशे जातींचा आधीच समावेश आहे. मात्र, सरकारी पदभरती आरक्षण केवळ गाजरच ठरत असल्याचे दिसून येते. पाच टक्क्यांमध्ये अर्धा टक्का आरक्षितांच्या वाट्याला जातो.       लोकसेवांमधील आरक्षणाची चेष्टा असून शासकीय नोकरीची आशा बाळगून असलेल्या युवकांशी एक प्रकारचा विश्...
महार समाजाची शौर्यगाथा शिवकाळापासून, अनेकांनी केला कौतुकाचा वर्षाव

महार समाजाची शौर्यगाथा शिवकाळापासून, अनेकांनी केला कौतुकाचा वर्षाव

सामाजिक
Mahar Regiment मुंबई: महार समाजाची शौर्यगाथा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनची आहे. शिवकाळामध्ये स्वराज्यातील किल्ल्यांच्या रक्षणाची जबाबदारी ही महार समाजावर असे, अशा शब्दांत अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला.  शनिवारी महार रेजिमेंट अमृत महोत्सव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.       गेट वे ऑप इंडियासमोर झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व महार रेजिमेंटचे अनेक महत्त्वाचे लष्करी अधिकारी उपस्थित होते. भीमा कोरेगावच्या लढाईचा वर्धापन दिन १ जानेवारी रोजी येत आहे.       गेल्या वर्षी भीमा कोरेगाव येथे झालेला हिंसाचार व त्यातून निर्माण झालेल्या सामाजिक विद्वेषाच्या पार्श्‍वभूमीवर या क...