Tuesday, March 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

“दिवाळीनंतर देशात कत्तल की रात”, बाळासाहेब आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

“दिवाळीनंतर देशात कत्तल की रात”, बाळासाहेब आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या सर्व 48 जागा लढवणार आहे. पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, वंचितने निवडणुकीच्या प्रचाराला आत्तापासूनच सुरुवात केली आहे. तसेच राज्यभरात पक्षाची मोर्चेबांधणी केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर युती केली आहे. अद्याप या दोन्ही पक्षांमध्ये किंवा महाविकास आघाडीतही (ठाकरे गट महाविकास आघाडीचा भाग आहे) जागा वाटपाबाबत चर्चा झालेली नाही. दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात अराजकता वाढेल असं वक्तव्य ॲड. आंबेडकर यांनी केलं आहे. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, मी या अगोदरही म्हटलं आहे की इथे दिवाळीनंतर कत्तल की रात होईल. सगळीकडे पूर्णपणे अराजकता माजलेली असेल. या देशात निवडणुकीच्या अगोदर जी परिस्थिती याआधी कधीच झाली नाह...
पुणे शहर पोलिसांकडून गुन्हेगारीचे उदत्तीकरण

पुणे शहर पोलिसांकडून गुन्हेगारीचे उदत्तीकरण

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी मकोका या कायद्याअंतर्गत आतापर्यंत 65 गुन्हेगारांवर व त्यांच्या टोळक्यांवर कारवाई करण्यात आलेल आहे. तसेच एमपीडीए अंतर्गत 50 पेक्षा अधिक गुन्हेगारांवर कारवाया करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान तत्कालीन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी गुन्ह्यांची आकडेवारी प्रथमच सुरू केली. त्यात मोक्का व एमपीडीएच्या किती कारवाया केल्या याचे जाहीर प्रगटन करणे सुरू केले. त्यांनी त्यांच्या दोन वर्षाच्या कालावधीत मोक्का व एमपीडीएचे प्रत्येकी शतक पूर्ण केले आहे. सध्या कार्यरत असलेले पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत शतक गाठले आहे. पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता व श्री. रितेश कुमार यांच्यापूर्वी मागील 50 वर्षाचा रेकॉर्ड पाहिला असता कोणत्याही पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने अशा प्रकारे किती, कुठे, ग...
कैलास वाळेकर नियुक्ती प्रकरणांत आयुक्त विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय, ईडीसह ॲन्टी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करा , मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदासाठी 50 लाख नाय, कोट्यवधी रुपयांची उड्डाणे…

कैलास वाळेकर नियुक्ती प्रकरणांत आयुक्त विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय, ईडीसह ॲन्टी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करा , मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदासाठी 50 लाख नाय, कोट्यवधी रुपयांची उड्डाणे…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावर कार्यरत असलेले श्री. कैलास वाळेकर हे पुणे महापालिकेच्या सेवेत 2011 साली नेमणूक झाली. परंतु ते रुजु झाले नाहीत. त्यांच्या 16/12/2011 च्या आज्ञापत्रकात अट क्र. 8 मध्ये नमूद आहे की, संबंधित उमेदवार हे आज्ञापत्रकाच्या दिनांकापासून 15 दिवसांचे आत कामावर हजर न झाल्यास त्यांची नेमणूक रद्द समजण्यात येईल असे नमूद केले आहे. तरी देखील श्री. वाळेकर हे रुजु झाले नाहीत. आज्ञापत्रकाच्या चार वर्षानंतर त्यांना पुणे महापालिकेत रुजु करून घेण्यात आले. तथापी वाळेकर यांनी पुणे महापालिका नियमभंग केलेला असतांना देखील तसेच प्रोव्हिबिशन परियड पूर्ण केलेला नसतांना देखील त्यांची सेवा विलोपित करून सेवेत कायम करून घेवून त्यांना थेट टॅक्स विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. तत्कालिन अति. आयुक्त श्री. राजेंद्र जगताप व उपआयुक्त सामान्य प्रशास...
पुणे महापालिकेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा 50 लाखात सौदा, 50 लाखातील वाटप कुणाला किती…विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय-ईडी- अेसीबी मार्फत चौकशी करा

पुणे महापालिकेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा 50 लाखात सौदा, 50 लाखातील वाटप कुणाला किती…विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांची सीबीआय-ईडी- अेसीबी मार्फत चौकशी करा

सर्व साधारण
अनु. जाती आदिवासी समाजातील अधिकाऱ्याला जातीव्देषातून पदोन्नतीपासून रोखणाऱ्या….आयुक्त-प्रशासक विक्रम कुमार, अति. आयुक्त रविंद्र बिनवडे, उपआयुक्त सचिन इथापे, सहआयुक्त उल्का कळसकर, मुख्य लेखापरीक्षक अंबरिष गालिंदे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करा, आर.आर.मध्ये मनमानी बदल, ठराविक सेवकांना डोळ्यासमोर ठेवून आकृतीबंधाची रचना, मुळात आकृतीबंधच सदोष असतांना, पुनः त्यात दोष वाढविण्याचा गुन्हा का केला जात आहे…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी सेवकवर्ग विभागाकडून अधिकाऱ्यांच्या बदली व पदोन्नती प्रकरणातील भ्रष्टाचाराबाबत आरोप केले आहेत. नगरविकास मंत्र्यांना दिलेल्या दि. 6 एप्रिल 2023 च्या पत्रात त्यांनी पुणे महापालिकेतील प्रत्येक बदली व पदोन्नती प्रकरणांत पदनिहाय लाखोंची बोली लावली जात असून, 10 लाख, 20 लाख व 30 लाख रुपये घेतल्याशिवाय बदली ...
तामिळनाडू मंत्रीमंडळातील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासंदर्भात ब्राम्हण धर्मावर विधान, म्हणाले…

तामिळनाडू मंत्रीमंडळातील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासंदर्भात ब्राम्हण धर्मावर विधान, म्हणाले…

सामाजिक
राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आमंत्रित न करण्यासंदर्भात उदयनिधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. स्टॅलिन यांनी, द्रौपदी मूर्मू या विधवा आहेत आणि त्या आदिवासी समाजातून येतात म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं असं म्हटलं आहे. यालाच आपण ब्राम्हण धर्म असं म्हणायचं का? कारण भारतातील ब्राम्हणवादी धर्म हा जातीयवाद व धार्मिकवाद करत आहे हे सिध्द झाले आहे. व असा भारतात जातीयवाद व धार्मिवाद वाद वाढवणारा व राज्यात व भारत देशात भेदाभेद करणारा , वंशवाद करणारा , जातीधर्मावर भांडणे लावणारा , वर्णवाद करणारा असा भारतातील ब्राम्हणांचा धर्म आहे का? असा सवालही तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते स्टॅलिन यांनी भारतातील ब्राम्हणवादी भाजपा सरकारला आणि याच भारतातील विदेशी असलेल्या ब्राम्हणांना प्रश्न विचारला आहे. भारतात 800 कोटी रुपये खर्च करुन नवीन भारत...
संसदेत मुस्लीम खासदाराला शिवीगाळ, काँग्रेस खासदार गप्प का होते -बाळासाहेब आंबेडकर

संसदेत मुस्लीम खासदाराला शिवीगाळ, काँग्रेस खासदार गप्प का होते -बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/लोकसभेचे भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी बहूजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली. यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी गंभीर आरोप केला आहे. संसदेत मुस्लीम खासदाराला शिवीगाळ होत असताना काँग्रेसचे खासदार गप्प होते असं म्हणत त्यांनी काँग्रेस खासदार गप्प का होते असा प्रश्न विचारला आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत हा आरोप केला. ॲड.आंबेडकर म्हणाले, “लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत एका भाजप खासदाराने मुस्लीम खासदारासाठी भडवा, कटवा (खंता झालेला), मुल्ला दहशतवादी आणि कट्टरवादी अशा अत्यंत अपमानास्पद शब्दांचा वापर केला आणि अपमान केला. मला आश्चर्य वाटते की, विरोधी बाकावरील एका मुस्लीम खासदाराला शिवीगाळ होत असताना काँग्रेस खासदा...
पुणे महापालिकेत माहिती अधिकार अर्जदाराला पुन्हा मारहाण, हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष तुषार गाडे यांचे आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन

पुणे महापालिकेत माहिती अधिकार अर्जदाराला पुन्हा मारहाण, हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष तुषार गाडे यांचे आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन

शासन यंत्रणा
कोण हे अभिमन्यू गाडे, दहशतवाद्यांना मदत केली हे खरे आहे काय?नॅशनल फोरम/ पुणे/दि./ प्रतिनिधी/पथारी व्यवसायिकांच्या संदर्भामध्ये श्रमशक्ती विकास संस्थेचे पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष तुषार गाडे यांना पुढे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. दरम्यान पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग झोन क्रमांक 7 मधील तत्कालीन माहिती अधिकारी कनिष्ठ अभियंता रामचंद्र शिंदे यांनी नाकारलेल्या माहिती संदर्भात, माहिती अधिकार कायद्यांतर्गत अपिलिय अधिकारी उपाभियंता श्री. गायकवाड यांचे समोर प्रथम अपिलाची सुनावणी, सुरू असताना माहिती अधिकार कार्यकर्ते श्री.शैलेंद्र दीक्षित यांना रामचंद्र शिंदे यांच्या पत्नीने कार्यालयात घुसून मारहाण केल्याचा प्रकार 12 नोव्हेंबर 2021 रोजी घडला होता. ही बातमी पुढे शहरातील सर्व वृत्तपत्रांसह संपूर्ण राज्यात वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केली होती. आज त...
गणेशोत्सवापूर्वी पुणे शहरात लुटा-लूट, कोंढवा, शिवाजीनगर, स्वारगेट व लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत लुटीच्या घटना

गणेशोत्सवापूर्वी पुणे शहरात लुटा-लूट, कोंढवा, शिवाजीनगर, स्वारगेट व लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत लुटीच्या घटना

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने कोंबिंग ऑपरेशन केले. त्यात शेकडो गुन्हेगार डिटेक्ट करण्यात आले. असे असताना देखील पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अधिनस्त असलेल्या बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी, लुटालुटीचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. कोंढवा पोलीस स्टेशन -कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील एक 47 वर्षीय नागरिक रा- कोंढवा खुर्द हे कौसरबाग मज्जिद कोंढवा येथे, दोन अनोळखी इसमांनी आपसात संगनमत करून 47 वर्षीय नागरिका जवळ येऊन त्यांना आम्ही पोलीस असल्याचे सांगून, एक ओळखपत्रासारखे असणारे कार्ड फिर्यादीस दाखवून त्यांच्या सोबत अरबी भाषेत बोलून फिर्यादी यांच्याकडे 4000 डॉलर (भारतीय चलनाप्रमाणे 3 लाख 20 हजार रुपये) रोख रक्कम तपासणीसाठी मागून फसवणूक करून घेऊन गेले आहेत. कोंढवा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे अधिक तपास करीत आह...
दे दणादण नोकर भरती करणाऱ्या पुणे महापालिकेत, सुरक्षा अधिकारी व जनसंपर्क पदासाठी एकही पात्र सेवक उपलब्ध नाही? पुणे महापालिकेत आरआरचा घोळ- आता सेवकांमधुन उठलाय आगीचा लोळ

दे दणादण नोकर भरती करणाऱ्या पुणे महापालिकेत, सुरक्षा अधिकारी व जनसंपर्क पदासाठी एकही पात्र सेवक उपलब्ध नाही? पुणे महापालिकेत आरआरचा घोळ- आता सेवकांमधुन उठलाय आगीचा लोळ

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील नगरसेवक प्रशासकीय अधिकाऱ्यांना नियमानुसार काम करू देत नाहीत, सतत दबाव सहन करावा लागतो म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सतत ओरड होत होती. मागील दोन अडीज वर्षात पुणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. या कालावधीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायदयातील तरतुदीनुसार काम करण्यासाठी त्यांचे कुणी हात धरले आहेत काय, ते आता नियमानुसार काम का करीत नाहीत. त्या उलट पुणे महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यापासून बाहेरून अर्थात सरळसेवेने नोकर भरतीचा धडाका सुरू आहे. परंतु 15/20 वर्ष कार्यरत सेवकांना पदोन्नती देत नाहीत, पदोन्नतीची साखळी खिळखिळी केली आहे. त्यामुळे पुढील किमान 10 वर्ष याचा फटका पुणे महापालिकेतील सेवकांना बसणार आहे. दरम्यान माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी तर पुणे महापालिकेतील बदली आणि पदोन्नतीसाठी संवर्गनिहाय 10 लाख, 20 लाख व काही प्रकरणांत तर 3...
बाळासाहेब आंबेडकर यांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले ‘आता मंत्रिमंडळही काँट्रॅक्टवर भरा’

बाळासाहेब आंबेडकर यांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले ‘आता मंत्रिमंडळही काँट्रॅक्टवर भरा’

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कोविड नसता तर आतापर्यंत भीमा कोरेगाव प्रकरणाची सुनावणी झाली असती. पण ही सुनावणी एका बाजूनेच सुरू आहे. माझी उलट तपासणी झाली. संभाजी महाराज यांची समाधी, त्याची तपासणी झाली. पण, जशी हवी तशी तपासणी होत नाही. योग्य रीतीने कामकाज होत नाही असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. भीमा कोरेगाव प्रकरणाची सुनावणी होत आहे. परंतु आयोगाच्या हातात काहीही नाही. पुढील सुनावणी 19 ऑक्टोबरला होणार आहे. मात्र, महत्वाच्या व्यक्तींची साक्ष झाल्याशिवाय ही सुनावणी पूर्ण होणार नाही. पूर्वीच्या अनेक गोष्टी परत नव्याने काढल्या जात आहे असे ते म्हणाले. मराठवाड्यातील दुष्काळाकडे सरकार काळजीपूर्वक बघत नाही. कल्पकता असल्याशिवाय इथला दुष्काळ संपणार नाही. पाणी वळवले तर दुष्काळ संपेल अशी येथील परिस्थिती आहे. इंडिया आघाडीवर बहिष्कार घातला. कारण, प्रत्...