Tuesday, March 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

शिवभोजन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली बाळासाहेब आंबेडकर यांची भेट

शिवभोजन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली बाळासाहेब आंबेडकर यांची भेट

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/शिवभोजन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली. सरकारने ही योजना बंद करू नये अशी या समितीची मुख्य मागणी आहे.दरम्यान राज्य शासनाकडून शिवभोजन थाळी बंद करण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना सांगितले. तसेच या या योजनेमुळे दररोज दोन लक्ष लोकांना याचा लाभ होतो.यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की, संबंधित खात्याच्या मंत्र्याशी आणि राज्य सरकारशी या संदर्भात चर्चा करू असे यावेही शिष्टमंडळाला आश्वासित केले आहे....
कुंभमेळ्यात 1000 पेक्षा अधिक लोक चेंगराचेंगरीत मेले, शासनाने फक्त 38 लोक मयत झाल्याचे जाहीर केलं; बाळासाहेब आंबेडकरांचा गंभीर आरोप

कुंभमेळ्यात 1000 पेक्षा अधिक लोक चेंगराचेंगरीत मेले, शासनाने फक्त 38 लोक मयत झाल्याचे जाहीर केलं; बाळासाहेब आंबेडकरांचा गंभीर आरोप

सर्व साधारण
नॅशनल फोरम/ सांगली/दि/ प्रतिनिधी/पंतप्रधान अमेरिकेला जाऊन आल्यापासून शेअर मार्केट पूर्णपणे कोसळत गेलं. धर्माच्या राजकारणाने देशाला आता धोक्याच्या घटकेपर्यत पोहोचवलं आहे. आज विरोधी पक्ष लकवा मारलेल्या परिस्थितीत असून त्यातून त्यांनी स्वतःला सावरत दुरुस्त करावे आणि हिटलरशाहीच्या सरकारचा विरोध करावा, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. आंबेडकर यांनी आज सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र सरकारसह महाराष्ट्रातील सरकार आणि विरोधी पक्षावर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळावरूनही आंबेडकर यांनी मृत्यूच्या आकड्यावरून गंभीर आरोप सरकारवर केला. कुंभमेळाव्यात 1 हजारांवर लोक चेंगराचेंगरीत मयत-ॲड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, कुंभमेळा हा लोकांचा भावनिक, वैयक्तिक प्रश्न आहे. या कुंभमेळाव्याची उत्तर प्रदेश सरकारने सोय केली, पण ज्या पद्धत...
पुण्यात खुन करून पश्चिम बंगाल मध्ये पळुन गेलेल्या आरोपीस,थेट बंगालमध्ये जावून भारती विद्यापीठ पोलीसांनी ठोकल्या बेडया

पुण्यात खुन करून पश्चिम बंगाल मध्ये पळुन गेलेल्या आरोपीस,थेट बंगालमध्ये जावून भारती विद्यापीठ पोलीसांनी ठोकल्या बेडया

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/खुन झालेला इसम मूळचा बिहारचा… खुन करणारा पश्चिम बंगालचा…तपास पुण्यासह पश्चिम बंगालमध्ये… हावडा रेल्वे स्टेशनवर खुनी सापडला… बंगाल मधील गोलाबारी पोलीस स्टेशन, हावडा येथून आरोपीस अटक… सर्व कथानक एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच आहे. परंतु महत्वाचे म्हणजे खुन झालेला इसम व खुनी इसम याची कोणतीही माहिती या भागात नव्हती. परंतु भारती विद्यापीठ पोलीसांनी खुन झालेला इसम व खुनी इसम याचा माग काढत… खऱ्या आरोपीस जेरबंद केले त्याची ही हकीकत… दि. 10 फेब्रुवारी 2025 रोजी रात्रौ साडेबारा वाजता 28 तोरणा मोहर विल्डिंग, चिंतामणी चौकाजवळ आंबेगाव पठार पुणे येथील बांधकाम चालू असलेल्या साईटच्या पहील्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक 104 मध्ये कोणीतरी अज्ञान इसमाने सदरचे अनोळखी इसमास, कोणत्यावरी अज्ञात कारणावरुन, कोणत्यातरी हत्याराने, त्याचे डोक्यात मारून, त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून के...
काँग्रेस,भाजपा, दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेससह मनसे या पक्षाकडून पुण्यातील वृत्तपत्रे व टिव्ही चॅनेलला कोट्यवधी रुपयांच्या जाहीराती, यांचे उमेदवारही कोट्याधीश-अब्जाधीश…

काँग्रेस,भाजपा, दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेससह मनसे या पक्षाकडून पुण्यातील वृत्तपत्रे व टिव्ही चॅनेलला कोट्यवधी रुपयांच्या जाहीराती, यांचे उमेदवारही कोट्याधीश-अब्जाधीश…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण-पुण्यातील नामांकित असलेल्या सकाळ, लोकमत, लोकसत्ता, सामना या बिग बजेट वृत्तपत्रांमध्ये काँग्रेस, भाजपा, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याच्यासह राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षांने कोट्यवधी रुपयांच्या जाहीराती दिल्या असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणूकीची रंगत वाढत चालली आहे. त्यात टिव्ही चॅनेलवर दर दोन पाच मिनटांनी ह्याच पक्षांच्या जाहीराती सुरू आहेत. महायुती व महाविकास आघाडीच्या राज्यातील सर्वच मोठ्या वृत्तपत्रांमध्ये व टिव्ही चॅनेलवर जाहीराती सुरू आहेत. त्यातच वृत्तपत्रांच्या ऑनलाईन न्युजवर देखील याच राजकीय पक्षांच्या जाहीराती सुरू आहेत. बहुतांश यु-ट्युब वरील एंटरटेन्मेंट व बातम्यां मध्ये ह्यांच्या जाहीरातील सुरू आहेत. ह्या जाहीराती फुकट दिल्या जात नाहीत. जाहीर...
फुटपाथवर बसून दारू पिणाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या काळात महाभकास आघाडीच्या उमेदवारांना पुरोगामी उमेदवार म्हणून प्रमोशन करू नये

फुटपाथवर बसून दारू पिणाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या काळात महाभकास आघाडीच्या उमेदवारांना पुरोगामी उमेदवार म्हणून प्रमोशन करू नये

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/ aniruddha shlan chavan-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरत असताना प्रत्येक उमेदवाराला त्याच्याकडील सर्व संपत्तीसह त्याच्यावरील गुन्हे, कोर्ट खटले याची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे कोणाकडे किती अधिकृत संपत्ती आहे त्याची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून पाहायला मिळत आहे. प्रत्येक प्रस्थापित पक्षाचा उमेदवार हा कोट्याधीश, अब्जाधीश असल्याचे दिसून आले आहे. कुणाची 100 कोटीची प्रॉपर्टी, कोणाची 500 कोटीची प्रॉपर्टी, कोणाचे 800 कोटीची प्रॉपर्टी…. ही झाली अधिकृत संपत्तीची आकडेवारी…दरम्यान बेनामी संपत्ती किती असेल याचा अंदाज न केलेलाच बरा. राज्यातील काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार,...
आरक्षणवाद्यांनी आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवावी, महायुती व महाभकास आघाडीच्या कटकारस्थानांपासून दूर रहा

आरक्षणवाद्यांनी आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवावी, महायुती व महाभकास आघाडीच्या कटकारस्थानांपासून दूर रहा

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आपण दलित आहोत की आदिवासी, ओबीसी आहोत की, भटके विमुक्त हे सर्व आरक्षणाच्या कक्षेत येतात. ज्या ज्या समाज घटकांनी, ज्या ज्या लहान मोठ्या पक्षांनी काँग्रेस किंवा भाजपाला आजपर्यंत समर्थन दिले ते सर्व पक्ष, संघटना नेस्तनाबुत झाले आहेत. नामशेष झाले आहेत. मुस्लिम समाजाने आजपर्यंत काँग्रेसला साथ दिली, आज त्याच मुसलमानांना काँग्रेसने 288 पैकी 3 जागा दिल्या आहेत, शिवसेना ठाकरे गटाने 288 पैकी एकाही मुसलमानाला उमेदवारी दिली नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाने 288 पैकी केवळ 2 ठिकाणी मुसलमानांना उमेदवारी दिली आहे. राज्यात मुस्लिमांची संख्या दोन ते अडीज कोटी आहे. एवढ्या मोठ्या समाजाला एकाही पक्षाने आमदारकीसाठी आणि खासदारकीसाठी उमेदवारी देत नाहीत. महाराष्ट्रातून मुस्लिम आणि ओबीसीचा एकही खासदार नसावा ही मोठी शोकांतिका आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिमांची मते आम्हालाच...
राजकीय हस्तक्षेप व गुन्हेगारी व्यावसायिकांचा बिमोड करून, वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाची धडक अतिक्रमण कारवाई, वाहतुक कोंडीतून नागरीकांची सुटका

राजकीय हस्तक्षेप व गुन्हेगारी व्यावसायिकांचा बिमोड करून, वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाची धडक अतिक्रमण कारवाई, वाहतुक कोंडीतून नागरीकांची सुटका

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गणपती माथा ते शिंदे पूल हा एनडीए कडे जाणारा रस्ता कायमच अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या वाहनांनी गजबजलेला असतो. नागरिकांना रस्त्यावरून जाताना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. दरम्यान गेली अनेक वर्ष नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रारी येत होत्या, परंतु काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यवसायिक व राजकीय हस्तक्षेपामुळे या ठिकाणी कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्याने, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यावसायिकांचा बिमोड करून अतिक्रमण विभाग व मध्यवर्ती पथकाकडून धाडसी कारववाई आज करण्यात आली. कारवाई करत असीतारंना, वाहनांची पळापळ, कर्मचाऱ्यांच्या अंगावरही धावुन आले-या कारवाईत 16 व्यावसायिक टेम्पो, 06 बिगर टप हातगाडी, 1 टप हात गाडी, 3 नग होजिअरी, 3 लोखंडी काउंटर, 3 गॅस सिलेंडर, 1 फ्रीज, 1 लोखंडी बाकडा व ...
दलित-मुस्लिम समाजाने आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवावी, धर्मनिरपेक्षतेचा ठेका आम्हीच घेतला नाही!

दलित-मुस्लिम समाजाने आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवावी, धर्मनिरपेक्षतेचा ठेका आम्हीच घेतला नाही!

राजकीय
धर्मनिरपेक्षतेचा ठेका आम्हीच घेतला नाही, धर्मनिरपेक्ष म्हणून ज्यांना मतदान केले, ते भाजपा शिवसेनेसोबत गेले. आपल्या उमेदवाराला दिलेले मत वाया जात नाही, समाजाची एकजुट दाखविल्यास, प्रस्थापित पक्षही आपल्या पायाशी येतील… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्यातील काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी आणि भाजपा प्रणित महायुतीतील सर्वच राजकीय पक्ष हे केवळ एकाच जातीचे आहेत. वर्षानुवर्षे तेच आमदार, तेच खासदार होतात. कधी ह्या पक्षात तर कधी त्या पक्षात अशा कोलांटउड्या मारून कायम सत्तेत राहण्याची जादू करून दाखवित असतात. प्रत्येक निवडणूकीत दलित व मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना कधीच उमेदवारी दिली जात नाही, तसेच या समाजातील मतदारांना कधीच विश्वासात घेतले जात नाही. केवळ जाती जाती व धर्माधर्मात भांडण लावले की यांचे काम झाले. भितीपोटी हा समाजा एकतर काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीतील पक्षांना मतदान करतो नाहीतर भा...
सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष मतदारांना मुर्ख समजतात, निवडणूक काळात मतदार देखील मुर्ख होतात… आता काय करू…हसु की रडू…

सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष मतदारांना मुर्ख समजतात, निवडणूक काळात मतदार देखील मुर्ख होतात… आता काय करू…हसु की रडू…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण -राज्यात विधानसभा निवडणूकीचे वातावरण तापले आहे. सगळीकडे निवडणूकीचा ज्वर चढला आहे. राज्यात कायम सत्तेत असलेले पक्ष म्हणजे काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे गट हे आहेत. याच पक्षात सर्वाधिक सधन मराठा समाज आहे. त्यांना त्यांची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतात. प्रत्येक निवडणूकीत कोट्यवधी रुपये खर्च करतात. मतदार आणि कार्यकर्ते विकत घेण्याची त्यांची खुमखुमी आजही आहे. जाती जातीत भांडण लावणे, धर्माधर्मात भांडण लावणे हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम असतो. विकासाच्या मुद्यावर यांची निवडणूक कधीच नसते. कारण तेच आमदार, तेच खासदार असल्याने त्यांनी 5 वर्षात काय दिवे लावले आहेत, ते मतदारांना माहिती असते. त्यामुळे विकासाच्या मुद्यावर निवडणूक न लढविता ते थेट जाती आणि धर्मावर वाता...
विधानसभेनंतर शिक्षण आणि नोकऱ्यांतील आरक्षण जाणार, ओबीसींनो, आरक्षण वाचवायचे असेल वंचितच्या उमेदवारांना निवडून द्या : बाळासाहेब आंबेडकर

विधानसभेनंतर शिक्षण आणि नोकऱ्यांतील आरक्षण जाणार, ओबीसींनो, आरक्षण वाचवायचे असेल वंचितच्या उमेदवारांना निवडून द्या : बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने थांबवण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर माध्यमातून शिक्षण आणि नोकऱ्या यामधील आरक्षण थांबवले जाईल असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं. हे आपल्याला मान्य आहे का? मान्य नसल्यास किंतु, परंतुची चर्चा न करता वंचित बहुजन आघाडीने उभे केलेले ओबीसींचे, एससी, एसटी आणि मुस्लीम उमेदवार की ज्यांची निशाणी गॅस सिलिंडर आहे त्यांना डोळे झाकून मतदान करा, असे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं. मराठा आमदार कसे निवडूण येतील याचीच रचना आखली आहे-मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवार यांची जी घोषणा आहे की, 200 आमदार विधानसभेत असतील, या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरा असे म्हणून सर्वांना अर्ज भरायला लावले. निजामी मराठ्यांच्या बैठका झाल्या. निजामी मरा...