Thursday, August 14 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Author: nationalforum

बाळासाहेब आंबेडकरांचा फडणवीसांना सवाल- रास्वसंघाकडे एके ४७ आली कुठून, भागवतांना मोक्का लावणार का?

बाळासाहेब आंबेडकरांचा फडणवीसांना सवाल- रास्वसंघाकडे एके ४७ आली कुठून, भागवतांना मोक्का लावणार का?

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/                 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे (आरएसएस) असलेली शस्त्रास्त्रे सरकारने जप्त करावी. या देशाचा कायदा कोणालाही शस्त्र बाळगण्याची परवानगी देत नाही, मग संघाकडे एके ४७ रायफल कशी आली, असा सवाल करत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी  देवेंद्र फडणवीस सरकारला सवाल केला आहे, की सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करणार की नाही. संघाकडे असलेली शस्त्रे जप्त केली नाही तर महाराष्ट्रात चक्का जाम करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.                 रास्वसंघ दरवर्षी दसयाला नागपूरमध्ये शस्त्रपूजन करत आले आहे. त्यांच्या या शस्त्रपूजनाला शांतताप्रिय संघटनेने विरोध केला आहे. याविरोधात...
मोदी सरकारच्या  ४ वर्षात भूकबळींमध्ये मोठी वाढ

मोदी सरकारच्या ४ वर्षात भूकबळींमध्ये मोठी वाढ

सर्व साधारण
नवी दिल्ली/दि/ भूकबळी संपविण्यासाठी कटिबद्ध आणि प्रयत्नशील असलेल्या देशांच्या यादीत भारत आता आणखी मागे पडल्याचे दिसत आहे. ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’चा २०१८ सालासाठीचा अहवाल जारी करण्यात आला आहे. त्यानुसार ११९ देशांच्या यादीत भारत १०३ व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी या यादीत भारत १०० व्या स्थानावर होता. विशेष म्हणजे भूकबळी संपविणार्या देशांच्या या यादीत २०१४ साली भारत ५५ व्या स्थानावर होता. आता हे स्थान खूपच पिछाडीवर गेल्यामुळे, मोदी सरकार देशातील भूकबळी कमी करण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.                 केंद्रातील मोदी सरकारला देशातील भूकबळी ही समस्या आव्हान ठरताना दिसत आहे. कारण, ग्लोबल हंगर इंडेक्सच्या अहवालामध्ये भारत सातत्याने मागे पडताना दिसत आहे. या यादीत २०१४ साली भारत ५५ व्या स्थानावर हो...
संभाजी महाराजांनंतर आता  संत तुकाराम महाराजांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण

संभाजी महाराजांनंतर आता संत तुकाराम महाराजांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण

राजकीय
मुंबई/दि/प्रतिनिधी/                 छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर आता संत तुकाराम महाराज यांच्या पत्नीबद्दल एका पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण केल्याचे आढळले आहे. आता तर हद्द झाली, सर्व शिक्षा अभियानातली ही पुस्तकं अभ्यासक्रमातून काढून घ्या. संबंधितांवर कारवाई कराच, पण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जबाबदारी पेलवत नसेल तर राजीनामा द्यावा,  असा हल्लाबोल अजितदादा पवार यांनी केला.                 सर्व शिक्षा अभियानाच्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण केल्याचा वाद शमत नाही तोच, या अभियानातील आणखी एका पुस्तकात संत तुकाराम महाराज व त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण असल्याची माहि...

सत्तेतून बाहेर पडा; मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा – विखे पाटील

राजकीय
मुंबई/दि/                 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर शब्दात समाचार घेतला असून, अगोदर या सरकारमधून बाहेर पडा; मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा, असे शिवसेनेला सुनावले आहे.                 कॉंग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याचा फैजपूर येथे प्रारंभ करताना ते बोलत होते. या विशाल सभेला संबोधित करताना विखे पाटील यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौर्यावर बरसताना ते म्हणाले की, शिवसेनेने आजवर २३५ वेळा सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे दिले. पण शेवटपयर्ंत सत्ता सोडली नाही. हे सरकार लोकविरोधी आहे, शेतकरी विरोधी असे वा...
राफेल घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा; प्रशांत भूषण व शौरी यांची मागणी

राफेल घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा; प्रशांत भूषण व शौरी यांची मागणी

राजकीय
नवी दिल्ली/ दि/                 राफेल करारात झालेल्या भ्रष्टाचाराचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात यावा, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत भूषण आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी केली आहे. सीबीआय मुख्यालयात जाऊन त्यांनी गुरुवारी सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची भेट घेतली.                 ’हिंदूस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीने यापूर्वीच सुखोईसारख्या ७ अत्याधुनिक लढाऊ विमानांची निर्मिती केलेली आहे. सरकार सध्या त्यांच्या स्वत:च्या भुमिकेवरच ठाम नाही. एक खोटे लपवण्यासाठी त्यांना अनेक खोट्या गोष्टी लोकांसमोर मांडाव्या लागत आहेत, असे अरुण शौरी यांनी म्हटले.     &nbs...

मतदानासाठी मतदार यादीत छायाचित्र अनिवार्य नाही – डॉ. दीपक म्हैसेकर

सर्व साधारण
पुणे/दि/प्रतिनिधी/                 मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत, या सबबीखाली कोणालाही मतदानापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे स्पष्टीकरण विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.                 ‘मतदार यादीत छायाचित्र नसल्यास मतदानाला मुकावे लागणार’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याबाबत स्पष्टीकरण देताना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले, वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त योग्य नाही. मतदाराचे छायाचित्र असायला हवे, मात्र ते अनिवार्य नाही.              &n...
अवैध व्यवसायांच्या प्रतिबंधासाठी अचानक तपासणी करण्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे निर्देश

अवैध व्यवसायांच्या प्रतिबंधासाठी अचानक तपासणी करण्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे निर्देश

राजकीय
मुंबई/दि/  राज्याच्या ग्रामीण भागातील असामाजिक तत्व व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक परिक्षेत्रातील पोलीस महानिरीक्षकांना त्या त्या भागात अचानक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.                 येत्या आठवडाभरात प्रत्येक पोलीस परिक्षेत्रात पोलीस महानिरीक्षकांनी ही अचानक भेटी देऊन प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध व्यवसाय बंद झाले आहे की नाही ते पाहणे. तसेच शाळा, महाविद्यालये व आश्रमशाळा येथे विशेषतः मुलींच्या बाबतीत घडणार्‍या घटनांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांमार्फत सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांना दिले असल्याची माहिती श्री. केसरकर यांनी यावेळी दिली.     &nbs...
आंबेडकरवाद्यांनो सावधान !  ऍड. बाळासाहेब आंबेडकर

आंबेडकरवाद्यांनो सावधान ! ऍड. बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
पुणे/दि/                  ‘आम्ही यापुढे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपाबरोबर जाणार नाही’ असा निर्णय पंढरपूरच्या धनगर मेळाव्यामध्ये धनगर समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन घेतला. याचे काही कारण आहे आणि त्यामागे एक भूमिका आहे. धनगर समाजातील डोळसपणे राजकारण करणार्‍यांना आता असे जाणवत आहे की, गेली ७० वर्ष धनगर समाजाला या पक्षांनी मतदानासाठी वापरले. पण, समाजाचे प्रश्‍न हे सोडवू शकले नाहीत किंवा ते सोडवण्याची त्यांची इच्छासुद्धा नाही. या कारणामुळेच धनगर आणि आदिवासी यांच्यात नाहक भांडण लावून मतभेद निर्माण केले गेले आणि ते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. आता या समूहांनी ठरवले आहे की, आम्ही या पुढे सत्तेचे राजकारण करणार, मागणीचे राजकारण करणार नाहीत. सत्तेमध्ये येवून आम्हीच आदिवासींशी चर्चा करून ‘धनगर आणि ...
प्रकाश आंबेडकरांचा मोदी-भाजपवर घणाघात- पेट्रोल दरवाढ रिलायन्सची दिवाळखोरी घालवण्यासाठी

प्रकाश आंबेडकरांचा मोदी-भाजपवर घणाघात- पेट्रोल दरवाढ रिलायन्सची दिवाळखोरी घालवण्यासाठी

राजकीय
औरंगाबाद/दि/ भाजप सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर रिलायन्सची दिवाळखोरी घालवण्यासाठी आणि त्यातून दलाली खाण्यासाठी वाढविल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शेतक-यांना साले म्हणणारे आणि सालगड्या प्रमाणे वागवणा-या भाजप सरकारने देशात राजेशाही नसल्याचे लक्षात घेण्याचा इशारा आंबेडकरांनी येथील  जंबिंदा मैदानावर आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या शेतकरी मेळाव्यात दिला.                 प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी आणि बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी प्रमुख असलेल्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) यांच्या आघाडीची घोषणा मंगळवारी औरंगाबादमधील जाहीर सभेत करण्यात आली. महाराष्ट्रात या आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर असतील असे खासदार ओवेसींनी स्पष्ट केले. &nbs...

तारिक अन्वर यांचे पवारांविरोधात बंड खासदारकीसह राष्ट्रवादी पक्षाचाही राजीनामा

राजकीय
मुंबई/दि/                  सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाच्या मुद्द्यावरून २० वर्षांपूर्वी शरद पवार यांच्यासोबत कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणारे तारिक अन्वर यांनी आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधातच बंड केले आहे. राफेल विमान करारासंदर्भात पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी दर्शवत अन्वर यांनी खासदारकीसह पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. अन्वर यांच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. राफेल कराराच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसने सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे. या करारात घोटाळा असून त्यास मोदीच जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.                 शरद पवार यांनी या संदर्भात व्यक्तव्य करतान...